शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
4
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
5
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
6
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
7
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
8
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
9
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
10
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
11
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
12
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
13
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
14
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
15
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
16
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
17
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
18
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
19
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
20
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 

पावसाचा अन नळाला येणाऱ्या पाण्याचा काही संबध असतो कार रे भाऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:06 IST

जिल्ह्यातील १४ तालुक्यात सरासरी आतापर्यंत ४२३.३ मिमि पाऊस अपेक्षित होता. त्यापैकी प्रत्यक्षात ४२७.३ मिमी पावसाची नोंद झाली असून त्याचे ...

जिल्ह्यातील १४ तालुक्यात सरासरी आतापर्यंत ४२३.३ मिमि पाऊस अपेक्षित होता. त्यापैकी प्रत्यक्षात ४२७.३ मिमी पावसाची नोंद झाली असून त्याचे टक्केवारी ९८.८ आहे. तसेच जिल्ह्यातील एक मोठा पाच मध्यम व ८४ लघु असे एकूण अशा ९० प्रकल्पात सरासरी ५४.४६ टक्के पाणीसाठा आहे. अमरावती शहराला पाणीपुरठा करणारा ५८.२९ टक्के पाणीसाठा असतानाही शहराला एक दिवसआड पाणीसाठा होत असल्याने नागरिकांनी ओरड वाढली आहे.

जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला आहे. प्रकल्पातही चांगला पाणीसाठा साचला आहे. त्यामुळे रबीला सिंचनाकरीता पाणी मिळणार असल्याने शेतकरी वर्गात आनंद आहे. मात्र अनेक तालुक्यात मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येतो. धरणात पाणी असताना नियमीत नळात पाणी का येत नाही असा सवाल नागरिकांचा असून जीवनप्राधीकरण व संबधीत पाणीपुरवठा यंत्रणेने या संदर्भात दखल घ्यावी अशी नागरिकांची मागणी आहे.

जिल्ह्यात झालेला पाऊस (मि. मी)

तालुका अपेक्षित प्रत्यक्षात टक्केवारी

अमरावती ४३९.७ ३८४.४ ८७.४

मोर्शी ३९१.६ ३५५.३ ९०.७

अचलपूर ४१५.३ ४०१.१ ९६.६

चिखलदरा ६५३.५ ४६४.५ ७१.१

धारणी ५३८.३ ४५३.३ ८४.२

अंजनगाव ३०८.५ ५०७.५ १६४.५

धरणांमधील साठा

प्रकल्प संख्या उपयुक्त (दलघमी) टक्केवारी

मोठे १ ३२६.८१ ५८.२९

मध्यम ५ ११०.१५ ५०.६०

लघु ८४ ११०.५६ ४८.३६

बॉक्स:

उर्ध्व वर्धात ५८.२९ टक्के साठा

शहराला एक दिवसाआड पाणी

अमरावती शहराला पाणीपुरठा करणाऱ्या उधर्व वर्धा प्रकल्पात आतापर्यंत सरासरी ५८.२९ टक्के पाणीसाठा साचला आहे. अमरावती शहरातील ९३ हजार नळधारकांना या प्रकल्पातून जीवनप्रधिकरणा मार्फत पाणीपुरठा करण्यात येत आहे. धरणात मोबलक पाणीसाठा असतानाही अमरावतीकरांना एक दिवसाआड पाणीपुरठा करण्याचे धोरण अधिकाऱ्यांनी आखले आहे. त्यामुळे नागरिकांची ओरड वाढली आहे.

कोट

शहरवासीय म्हणतात नळा पाणी का नाही?

कोट

धरणात मोबलक पाणीसाठा असल्याचे वृत्तपत्रातूनच माहिती मिळते मात्र शहरात जीवनप्राधीकरण एकदिवसाआड पाणीपुरठा करते. नळ येण्याची वेळ सुद्धा निश्चित नसते. त्यामुळे नोकरदार वर्गांना त्रास होतो. नियमित पाणीपुरठा करण्यात यावा अशी आमची मागणी आहे.

गजानन कोरे, नागरिक अमरावती

कोट

दर्यापूर शहराला शहानुर धरणातून शहानुर पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरठा करण्यात येते. धरणात यंदा चांगली पाणी आहे. मात्र शहराला एक ते दोन दिवसातून पाणीपुरठा करण्यात आला. काही दिवसापुर्वी नळाला गढूळ पाणी आले. पाणीपुरठा १५ दिवस बिल मात्र महिनाभराचे आकरण्यात येत असून हे चुकीचे आहे.

राजेंद्र गायगोले, नागरिक दर्यापूर

बळीराजा आनंदला

कोट

यंदा पाऊस चांगला झाल्याने जास्त पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र धरणात चांगला पाणीसाठा झाल्याने रबी पिकाला सिंचनाकरीता पाणी मिळणार आहे. तसेच वर्षभराची पिण्याच्या पाण्याची सोय झाल्याने आनंद आहे.

एक शेतकरी