शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

पावसाचा अन नळाला येणाऱ्या पाण्याचा काही संबध असतो कार रे भाऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:06 IST

जिल्ह्यातील १४ तालुक्यात सरासरी आतापर्यंत ४२३.३ मिमि पाऊस अपेक्षित होता. त्यापैकी प्रत्यक्षात ४२७.३ मिमी पावसाची नोंद झाली असून त्याचे ...

जिल्ह्यातील १४ तालुक्यात सरासरी आतापर्यंत ४२३.३ मिमि पाऊस अपेक्षित होता. त्यापैकी प्रत्यक्षात ४२७.३ मिमी पावसाची नोंद झाली असून त्याचे टक्केवारी ९८.८ आहे. तसेच जिल्ह्यातील एक मोठा पाच मध्यम व ८४ लघु असे एकूण अशा ९० प्रकल्पात सरासरी ५४.४६ टक्के पाणीसाठा आहे. अमरावती शहराला पाणीपुरठा करणारा ५८.२९ टक्के पाणीसाठा असतानाही शहराला एक दिवसआड पाणीसाठा होत असल्याने नागरिकांनी ओरड वाढली आहे.

जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला आहे. प्रकल्पातही चांगला पाणीसाठा साचला आहे. त्यामुळे रबीला सिंचनाकरीता पाणी मिळणार असल्याने शेतकरी वर्गात आनंद आहे. मात्र अनेक तालुक्यात मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येतो. धरणात पाणी असताना नियमीत नळात पाणी का येत नाही असा सवाल नागरिकांचा असून जीवनप्राधीकरण व संबधीत पाणीपुरवठा यंत्रणेने या संदर्भात दखल घ्यावी अशी नागरिकांची मागणी आहे.

जिल्ह्यात झालेला पाऊस (मि. मी)

तालुका अपेक्षित प्रत्यक्षात टक्केवारी

अमरावती ४३९.७ ३८४.४ ८७.४

मोर्शी ३९१.६ ३५५.३ ९०.७

अचलपूर ४१५.३ ४०१.१ ९६.६

चिखलदरा ६५३.५ ४६४.५ ७१.१

धारणी ५३८.३ ४५३.३ ८४.२

अंजनगाव ३०८.५ ५०७.५ १६४.५

धरणांमधील साठा

प्रकल्प संख्या उपयुक्त (दलघमी) टक्केवारी

मोठे १ ३२६.८१ ५८.२९

मध्यम ५ ११०.१५ ५०.६०

लघु ८४ ११०.५६ ४८.३६

बॉक्स:

उर्ध्व वर्धात ५८.२९ टक्के साठा

शहराला एक दिवसाआड पाणी

अमरावती शहराला पाणीपुरठा करणाऱ्या उधर्व वर्धा प्रकल्पात आतापर्यंत सरासरी ५८.२९ टक्के पाणीसाठा साचला आहे. अमरावती शहरातील ९३ हजार नळधारकांना या प्रकल्पातून जीवनप्रधिकरणा मार्फत पाणीपुरठा करण्यात येत आहे. धरणात मोबलक पाणीसाठा असतानाही अमरावतीकरांना एक दिवसाआड पाणीपुरठा करण्याचे धोरण अधिकाऱ्यांनी आखले आहे. त्यामुळे नागरिकांची ओरड वाढली आहे.

कोट

शहरवासीय म्हणतात नळा पाणी का नाही?

कोट

धरणात मोबलक पाणीसाठा असल्याचे वृत्तपत्रातूनच माहिती मिळते मात्र शहरात जीवनप्राधीकरण एकदिवसाआड पाणीपुरठा करते. नळ येण्याची वेळ सुद्धा निश्चित नसते. त्यामुळे नोकरदार वर्गांना त्रास होतो. नियमित पाणीपुरठा करण्यात यावा अशी आमची मागणी आहे.

गजानन कोरे, नागरिक अमरावती

कोट

दर्यापूर शहराला शहानुर धरणातून शहानुर पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरठा करण्यात येते. धरणात यंदा चांगली पाणी आहे. मात्र शहराला एक ते दोन दिवसातून पाणीपुरठा करण्यात आला. काही दिवसापुर्वी नळाला गढूळ पाणी आले. पाणीपुरठा १५ दिवस बिल मात्र महिनाभराचे आकरण्यात येत असून हे चुकीचे आहे.

राजेंद्र गायगोले, नागरिक दर्यापूर

बळीराजा आनंदला

कोट

यंदा पाऊस चांगला झाल्याने जास्त पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र धरणात चांगला पाणीसाठा झाल्याने रबी पिकाला सिंचनाकरीता पाणी मिळणार आहे. तसेच वर्षभराची पिण्याच्या पाण्याची सोय झाल्याने आनंद आहे.

एक शेतकरी