शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

पावसाचा अन नळाला येणाऱ्या पाण्याचा काही संबध असतो कार रे भाऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:06 IST

जिल्ह्यातील १४ तालुक्यात सरासरी आतापर्यंत ४२३.३ मिमि पाऊस अपेक्षित होता. त्यापैकी प्रत्यक्षात ४२७.३ मिमी पावसाची नोंद झाली असून त्याचे ...

जिल्ह्यातील १४ तालुक्यात सरासरी आतापर्यंत ४२३.३ मिमि पाऊस अपेक्षित होता. त्यापैकी प्रत्यक्षात ४२७.३ मिमी पावसाची नोंद झाली असून त्याचे टक्केवारी ९८.८ आहे. तसेच जिल्ह्यातील एक मोठा पाच मध्यम व ८४ लघु असे एकूण अशा ९० प्रकल्पात सरासरी ५४.४६ टक्के पाणीसाठा आहे. अमरावती शहराला पाणीपुरठा करणारा ५८.२९ टक्के पाणीसाठा असतानाही शहराला एक दिवसआड पाणीसाठा होत असल्याने नागरिकांनी ओरड वाढली आहे.

जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला आहे. प्रकल्पातही चांगला पाणीसाठा साचला आहे. त्यामुळे रबीला सिंचनाकरीता पाणी मिळणार असल्याने शेतकरी वर्गात आनंद आहे. मात्र अनेक तालुक्यात मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येतो. धरणात पाणी असताना नियमीत नळात पाणी का येत नाही असा सवाल नागरिकांचा असून जीवनप्राधीकरण व संबधीत पाणीपुरवठा यंत्रणेने या संदर्भात दखल घ्यावी अशी नागरिकांची मागणी आहे.

जिल्ह्यात झालेला पाऊस (मि. मी)

तालुका अपेक्षित प्रत्यक्षात टक्केवारी

अमरावती ४३९.७ ३८४.४ ८७.४

मोर्शी ३९१.६ ३५५.३ ९०.७

अचलपूर ४१५.३ ४०१.१ ९६.६

चिखलदरा ६५३.५ ४६४.५ ७१.१

धारणी ५३८.३ ४५३.३ ८४.२

अंजनगाव ३०८.५ ५०७.५ १६४.५

धरणांमधील साठा

प्रकल्प संख्या उपयुक्त (दलघमी) टक्केवारी

मोठे १ ३२६.८१ ५८.२९

मध्यम ५ ११०.१५ ५०.६०

लघु ८४ ११०.५६ ४८.३६

बॉक्स:

उर्ध्व वर्धात ५८.२९ टक्के साठा

शहराला एक दिवसाआड पाणी

अमरावती शहराला पाणीपुरठा करणाऱ्या उधर्व वर्धा प्रकल्पात आतापर्यंत सरासरी ५८.२९ टक्के पाणीसाठा साचला आहे. अमरावती शहरातील ९३ हजार नळधारकांना या प्रकल्पातून जीवनप्रधिकरणा मार्फत पाणीपुरठा करण्यात येत आहे. धरणात मोबलक पाणीसाठा असतानाही अमरावतीकरांना एक दिवसाआड पाणीपुरठा करण्याचे धोरण अधिकाऱ्यांनी आखले आहे. त्यामुळे नागरिकांची ओरड वाढली आहे.

कोट

शहरवासीय म्हणतात नळा पाणी का नाही?

कोट

धरणात मोबलक पाणीसाठा असल्याचे वृत्तपत्रातूनच माहिती मिळते मात्र शहरात जीवनप्राधीकरण एकदिवसाआड पाणीपुरठा करते. नळ येण्याची वेळ सुद्धा निश्चित नसते. त्यामुळे नोकरदार वर्गांना त्रास होतो. नियमित पाणीपुरठा करण्यात यावा अशी आमची मागणी आहे.

गजानन कोरे, नागरिक अमरावती

कोट

दर्यापूर शहराला शहानुर धरणातून शहानुर पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरठा करण्यात येते. धरणात यंदा चांगली पाणी आहे. मात्र शहराला एक ते दोन दिवसातून पाणीपुरठा करण्यात आला. काही दिवसापुर्वी नळाला गढूळ पाणी आले. पाणीपुरठा १५ दिवस बिल मात्र महिनाभराचे आकरण्यात येत असून हे चुकीचे आहे.

राजेंद्र गायगोले, नागरिक दर्यापूर

बळीराजा आनंदला

कोट

यंदा पाऊस चांगला झाल्याने जास्त पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र धरणात चांगला पाणीसाठा झाल्याने रबी पिकाला सिंचनाकरीता पाणी मिळणार आहे. तसेच वर्षभराची पिण्याच्या पाण्याची सोय झाल्याने आनंद आहे.

एक शेतकरी