भातकुलीत वाॅर्डनिहाय एकही कचराकुंडी नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:19 IST2021-02-23T04:19:44+5:302021-02-23T04:19:44+5:30
गृहिणींची फरफट: ओला-सुका कचरा फेकावा लागतो सार्वजनिक नालीत किशोर लेंडे भातकुली : शहरातील विविध प्रभागांतील अनेक घरांमध्ये डस्टबिन (कचराकुंडी) ...

भातकुलीत वाॅर्डनिहाय एकही कचराकुंडी नाही!
गृहिणींची फरफट: ओला-सुका कचरा फेकावा लागतो सार्वजनिक नालीत
किशोर लेंडे
भातकुली : शहरातील विविध प्रभागांतील अनेक घरांमध्ये डस्टबिन (कचराकुंडी) नसल्याने कचरा सार्वजनिक सांडपाणी वाहून नेणाºया नालीत फेकला जात आहे. त्यामुळे नाल्या उपसल्या तरी लवकरच कचºयाने खचाखच भरत आहे. परिणामी डासांचे प्रमाण वाढत असून, नागरिकांना आजाराला सामोरे जावे लागत आहे. नगरपंचायत प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन वाॅर्डनिहाय खुल्या जागेत कचराकुंडी उभारण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहर स्वच्छ करण्यासाठी कचरागाडी असून, दररोज प्रमुख रस्ते साफ केले जातात. त्यामुळे शहर स्वच्छ दिसत आहे. अनेक घरी डस्टबिन असल्याने तेथील सुका व ओला कचरा कचरागाडीत एकत्र टाकला जातो. परंतु, काही घरी अद्यापही कचराकुंडी नसल्याने सर्वांची नजर चुकवून तेथील कचरा सार्वजनिक सांडपाणी वाहून नेणा०या नालीत टाकला जातो. त्यामुळे नाल्या लवकरच खचाखच भरत आहेत. परिणामी, डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, नागरिकांना आजाराला सामोरे जावे लागत आहे.
नगरपंचायतने वाल्मीकी चौक ते बस स्टॉप मार्गावर सुका व ओला कचºयासाठी सुमारे २० कचराकुंडी ठेवल्या. त्यामुळे बाहेरगावाच्या व परिसरातील लोकांची मोठी सोय झाली असली तरी काही कचराकुंडीत कचराही दिसत नाही. जिथे गरज आहे, तिथे कचराकुंडी लावण्याची आवश्यकता असताना, बस स्थानक मार्गावर मोठ्या प्रमाणात कचराकुंड्या लावण्यात आल्या आहेत. मात्र, शहरातील अनेक वाॅर्डांतील भागात एकही कचराकुंडी नाही. त्यामुळे नागरिक कचरा टाकण्यासाठी सांडपाणी वाहून नेणाºया सार्वजनिक नालीचा वापर करतात.
- तर कडक कारवाई करा
सुका व ओला कचरा टाकण्यासाठी दररोज सकाळी शहरातून कच०याची गाडी फिरत असताना, काही नागरिक जाणीवपूर्वक सार्वजनिक नालीत कचरा फेकतात. अशा नागरिकांवर नगरपंचायत प्रशासनाने कायदेशीर कठोर कारवाई करून दंड वसूल करण्याची गरज आहे.
डस्टबिनची सक्ती करा
भातकुली ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाले. त्यावेळी घरनिहाय सर्वांना घरातील कचरा गोळा करण्यासाठी डस्टबिन देण्यात येणार असल्याची चर्चा होती. गेल्या चार वर्षांत कुणालाही डस्टबिन मिळाली नाही. नागरिकांनीही ती स्वत: विकतही आणली नाही. नगरपंचायत प्रशासनाने डस्टबिन न देता कमीत कमी प्रत्येक वाॅर्डात कचराकुंडी देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
--------------------------------------------