शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

"...तर मला आमदार होता आलं असतं", बच्चू कडूंनी पराभवानंतर मांडली सडेतोड भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 17:20 IST

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर बच्चू कडू यांनी त्यांची भूमिका मांडली. अजून पडलो तरी पर्वा नाही, असे ते म्हणाले. 

विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचं शल्य माजी आमदार बच्चू कडू यांनी बोलून दाखवलं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना महायुतीचा घटक पक्ष असलेल्या बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवली होती. त्यात बच्चू कडू यांनाही स्वतःची जागाही राखता आली नाही. एका कार्यक्रमात त्यांनी या पराभवाबद्दल भाष्य केले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

अमरावती जिल्ह्यातील पळसखेड येथे शिवजयंती निमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना माजी आमदार बच्चू कडू यांनी निवडणुकीतील पराभवाचा मुद्दा मांडला. 

...तर मलाही आमदार होता आलं असतं -बच्चू कडू

"मी शेतकरी म्हणून बोलत आहे. त्याचा कोणाला राग आला तरी चालेल. पण, बच्चू कडू याची पर्वा करत नाही. ही लाचारी नाहीये. मी कधीही लाचारी पत्करली नाही. तसं केलं असतं तर कोणाचा पाठिंबा घेऊन मला आमदार होता आलं असतं. पण, ती लाचारी आमच्यात नाही", असे बच्चू कडू म्हणाले. 

भाजप-काँग्रेसवर टीका

"छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशामधील वतनदारी बंद केली. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावाल तर कापले जाल असं म्हणणारा राजा आता कोणत्याच पक्षात दिसत नाही. ५० टक्के नफा धरून आम्ही शेतमालाला भाव देऊ असे भाजपने म्हटले होते. काँग्रेसने स्वामीनाथन आयोग लागू करू म्हटलं होतं. पण, काँग्रेसने सुद्धा लागू केला नाही. पक्ष कोणताही असला तरी तो शेतकऱ्यांच्या हिताचा नाही, हे आपण ७५ वर्षात बघितले आहे", अशी टीका बच्चू कडू यांनी भाजप आणि काँग्रेसवर केली. 

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूAmravatiअमरावतीPoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस