बाजार समितीच्या भाजी मंडईत फळांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:29 IST2021-02-05T05:29:34+5:302021-02-05T05:29:34+5:30
भाजी मंडईत रोज दूरदुरून फळांसह भाजीपाला विक्रीकरिता येत असे. मात्र, कोरोना काळात गर्दी टाळण्याच्या अनुषंगाने आठवड्यातून तीन दिवस फळांची, ...

बाजार समितीच्या भाजी मंडईत फळांची चोरी
भाजी मंडईत रोज दूरदुरून फळांसह भाजीपाला विक्रीकरिता येत असे. मात्र, कोरोना काळात गर्दी टाळण्याच्या अनुषंगाने आठवड्यातून तीन दिवस फळांची, तर तीन दिवस भाजीपाल्याची आवक होत आहे. त्यातही यंदा पाऊस अधिक प्रमाणात झाल्याने ठिकठिकाणी शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वाहतूक सेवा मध्यंतरी धुसर झाल्यानेदेखील आवकवर परिणाम झाला. त्यामुळे व्यापारी गरजेपेक्षा अधिक फळांची मागणी करून साठवून ठेवतात. दररोज मागणीनुसार विक्री करता यावे, या उद्देशाने माल साठवून ठेवतात. मात्र, मंडईत दुपारच्या वेळेच निरव शांतता राहत असल्याने तेथे यार्डात ठेवलेल्या फळांच्या ठेवलेल्या फळांची चोरी होत असल्याचा संताप सोमवारी तेथील दुकान क्रमांक १९ च्या फळव्यापाऱ्यांनी व्यक्त केला. यावर नुकतेच पदभार स्वीकारलेल्या वाहतूक नियंत्रण अधिकारी व सुरक्षा इंचार्ज आर.पी. वानखडे यांनी संबंधित सुरक्षा रक्षकाला बोलवण्याचे निर्देश सहकाऱ्यांंना दिले व निट कर्तव्य बजावण्यास सांगितले. तसेच तात्काळ फळ यार्डात दोन सुरक्षा रक्षक तैनात केले.
बॉक्स
हमालच नेतात फळ चोरून
आम्ही बाहेर ठिकाणांहून ठोक फळे मागवितो. मात्र, त्याच दिवशी मालाचा उठाव होत नसल्याने फळ यार्डात तो माल क्रेटमध्ये कापडाने झाकून ठेवतो. मात्र, बरेच दिवसांपासून आम्हाला व्यवसायात घाटा येत आहे. त्यामुळे लक्ष ठेवून होतो. सोमवारी सकाळी एक हमाल दोन पपई, दोन टरबूज उचलून घेऊन जाताना दिसला. त्यावरून होत असलेले नुकसानाचे कारण उघड झाले. त्यामुळे तत्क्षण प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला, असे नुकसानग्रस्त फळविक्रेत्याने सांगितले.
कोट
सोमवारीच मी येथील पदभार हाती घेतला. त्यातच फळव्यापारी तक्रार घेऊन आला. त्याबाबत लक्ष ठेवण्याच्या सूचना संबंधित सुरक्षा रक्षकाला दिल्या आहेत.
- आर.पी. वानखडे,
सुरक्षा इंचार्ज, भाजी मंडई, अमरावती