शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

गाव झाले काळेकुट्ट ! रतन इंडिया औष्णिक प्रकल्पाच्या विळख्यात वाघोली; प्रदूषण नियंत्रण मंडळ करते तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 17:34 IST

Amravati : सन २००८ मध्ये वाघोली स्थित निर्माण झालेला (सोफिया) रतन इंडिया औष्णिक प्रकल्प हा वाघोलीवासीयांसाठी शाप ठरत आहे. प्रकल्पातील प्रदूषणाने गाव काळेकुट्ट झाले असून गावातील आबालवृद्धांच्या आरोग्यावर प्रदूषणाचा विपरीत परिणाम होत असल्याने येथील नागरिकांकडून पुनर्वसनाची मागणी करण्यात येत आहे.

संदीप राऊत लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : सन २००८ मध्ये वाघोली स्थित निर्माण झालेला (सोफिया) रतन इंडिया औष्णिक प्रकल्प हा वाघोलीवासीयांसाठी शाप ठरत आहे. प्रकल्पातील प्रदूषणाने गाव काळेकुट्ट झाले असून गावातील आबालवृद्धांच्या आरोग्यावर प्रदूषणाचा विपरीत परिणाम होत असल्याने येथील नागरिकांकडून पुनर्वसनाची मागणी करण्यात येत आहे.

नांदगावपेठ पंचतारांकित एमआयडीसीत (सोफिया) रतन इंडिया औष्णिक प्रकल्पासाठी वाघोलीवासीयांची सर्वाधिक जमीन अधिग्रहित करण्यात आली. त्यामुळे येथील नव्वद टक्के शेतकरी भूमिहीन झाले. आदिवासी तथा फासेपारधी समाजाची ही वसाहत आहे. आता बोटावर मोजण्याएवढे शेतकरी शिल्लक आहे. त्यांच्याही शेतजमिनीला प्रकल्पातील प्रदूषणाने ग्रासले असून शेतातील कणाकणांवर व पिकांच्या पानापानांवर राखेचा थर साचल्याने शेतीतून दमडीचेही उत्पन्न होत नाही. पुनर्वसनाचा मुद्दा रेटून धरत येथील ग्रामपंचायत व रहिवाशांनी गेल्या दहा वर्षात अनेकदा प्रशासन तथा लोकप्रतिनिधींकडे पत्रव्यवहार केला.

मात्र, अद्यापही त्याची दखल घेण्यात आली नाही. यादरम्यान नागरिकांना आणखी काही वर्षे येथे वास्तव्य करावे लागले, तर प्रदूषणामुळे नागरिक दुर्धर आजाराचे बळी ठरतील व गाव ओस पडेल, ही भीती सरपंच मनीषा राजेश बारबुद्धे यांनी व्यक्त केली.

गावातील तलावात रसायनयुक्त पाणी

औष्णिक प्रकल्पातील केमिकलयुक्त पाणी तलावात सोडण्यात येत असल्यामुळे तलावातील पाणी पशू-पक्ष्यांनाही पिण्यायोग्य राहिलेले नाही. प्रकल्पाच्या सुरक्षा भिंतीलगत जिल्हा परिषद शाळा आहे. येथील विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनात अप्रत्यक्ष अन्नासह राखेचे कणही जातात.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ करते तरी काय?

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला प्रदूषण दिसत नाही का, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. फ्लाय अॅशवर उपाययोजना करण्यासाठी कंपनीला यापूर्वी अवगत केले आहे. वरिष्ठांशी चर्चा करून या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे मंडळाचे अधिकारी जितेंद्र पुराते म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Pollution shadows Wagholi: Ratan India plant faces scrutiny, villagers suffer.

Web Summary : Wagholi villagers suffer as the Ratan India plant pollutes air and water. Farmlands are ruined, health deteriorates, and relocation demands intensify. Authorities are urged to act.
टॅग्स :Amravatiअमरावती