शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर अजित पवारांची माफी मागा; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला
2
Rishabh Pant Has Been Ruled Out : रिषभ पंतची न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेतून माघार; कारण...
3
'ठाकरे ब्रँड'चा फायदा उद्धव-राजना होणार? मराठी मतं 'गेम' फिरवणार? सर्व्हेची टक्केवारी समोर
4
WPL 2026 : हरमनप्रीतच्या MI चा विजयी कल्ला! DC ची कॅप्टन जेमिमावर आली स्मृतीसारखी वेळ
5
"उत्तर भारतीयांकडे वाकड्या नजरेने कुणी पाहिले तर..."; भाजपा मंत्री नितेश राणे काय बोलून गेले?
6
शिंदेसेनेला मतदान करा, जैन व्यापाऱ्याच्या मुलाची पोस्ट; भाजपा उमेदवाराच्या पत्नीने दिली धमकी
7
'गणेश नाईक यांची मनस्थिती बिघडली, त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जा', शिंदेसेनेची बोचरी टीका
8
बांगलादेशला लागणार जॅकपॉट! ५०० टक्के टॅरिफच्या टांगत्या तलवारीनं का वाढली भारताची डोकेदुखी?
9
राम मंदिराजवळ नमाज पढणारा अब्दुल अहद शेख कोण? बॅगेत सापडलं असं काही, कुटुंबीय म्हणाले...  
10
PCMC Election 2026: निवडणुका जवळ आल्या की, अनेकांचा कंठ फुटून काहीही बोलतात, दादा आपण रागवायचं नाही - देवेंद्र फडणवीस
11
सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबईहून पालघरला आले, पोहायला पाण्यात उतरले आणि एकावर मृत्युने घातली झडप
12
ठाकरे बंधूंच्या 'शिवगर्जनेची' तारीख ठरली! शिवाजी पार्कवर राज ठाकरे कोणता गौप्यस्फोट करणार?
13
शरद पवार अन् अजित पवार एकत्र येणार नाहीत?; प्रफुल पटेल यांच्या विधानानं नव्या चर्चांना उधाण
14
WPL 2026 : अनुष्का शर्माचा ‘पायगुण’! GG ची ‘साडेसाती’ संपली; UP वॉरियर्सकडून ‘ती’ एकटीच लढली
15
मोदी सरकारविरोधात लिखाण करणाऱ्या डॉ. संग्राम पाटील यांना मुंबईत येताच पोलिसांनी घेतलं ताब्यात
16
Holiday for Election: मतदानासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर, कोणाला लागू असणार?
17
"आमचा जीव घेतला तरीही..."; सुप्रिया सुळे कडाडल्या; भाजपाला इशारा, मुंबईबाबत काय म्हणाल्या?
18
चौफेर टीका, भाजपाची नाचक्की, अखेरीस स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे याने दिला राजीनामा
19
Video - ओडिशामध्ये ९ सीटर चार्टर्ड प्लेन क्रॅश; पायलटसह ६ जण गंभीर जखमी
20
ICC U19 World Cup Warm up Matches : वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी! शतक अवघ्या ४ धावांनी हुकलं
Daily Top 2Weekly Top 5

गाव झाले काळेकुट्ट ! रतन इंडिया औष्णिक प्रकल्पाच्या विळख्यात वाघोली; प्रदूषण नियंत्रण मंडळ करते तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 17:34 IST

Amravati : सन २००८ मध्ये वाघोली स्थित निर्माण झालेला (सोफिया) रतन इंडिया औष्णिक प्रकल्प हा वाघोलीवासीयांसाठी शाप ठरत आहे. प्रकल्पातील प्रदूषणाने गाव काळेकुट्ट झाले असून गावातील आबालवृद्धांच्या आरोग्यावर प्रदूषणाचा विपरीत परिणाम होत असल्याने येथील नागरिकांकडून पुनर्वसनाची मागणी करण्यात येत आहे.

संदीप राऊत लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : सन २००८ मध्ये वाघोली स्थित निर्माण झालेला (सोफिया) रतन इंडिया औष्णिक प्रकल्प हा वाघोलीवासीयांसाठी शाप ठरत आहे. प्रकल्पातील प्रदूषणाने गाव काळेकुट्ट झाले असून गावातील आबालवृद्धांच्या आरोग्यावर प्रदूषणाचा विपरीत परिणाम होत असल्याने येथील नागरिकांकडून पुनर्वसनाची मागणी करण्यात येत आहे.

नांदगावपेठ पंचतारांकित एमआयडीसीत (सोफिया) रतन इंडिया औष्णिक प्रकल्पासाठी वाघोलीवासीयांची सर्वाधिक जमीन अधिग्रहित करण्यात आली. त्यामुळे येथील नव्वद टक्के शेतकरी भूमिहीन झाले. आदिवासी तथा फासेपारधी समाजाची ही वसाहत आहे. आता बोटावर मोजण्याएवढे शेतकरी शिल्लक आहे. त्यांच्याही शेतजमिनीला प्रकल्पातील प्रदूषणाने ग्रासले असून शेतातील कणाकणांवर व पिकांच्या पानापानांवर राखेचा थर साचल्याने शेतीतून दमडीचेही उत्पन्न होत नाही. पुनर्वसनाचा मुद्दा रेटून धरत येथील ग्रामपंचायत व रहिवाशांनी गेल्या दहा वर्षात अनेकदा प्रशासन तथा लोकप्रतिनिधींकडे पत्रव्यवहार केला.

मात्र, अद्यापही त्याची दखल घेण्यात आली नाही. यादरम्यान नागरिकांना आणखी काही वर्षे येथे वास्तव्य करावे लागले, तर प्रदूषणामुळे नागरिक दुर्धर आजाराचे बळी ठरतील व गाव ओस पडेल, ही भीती सरपंच मनीषा राजेश बारबुद्धे यांनी व्यक्त केली.

गावातील तलावात रसायनयुक्त पाणी

औष्णिक प्रकल्पातील केमिकलयुक्त पाणी तलावात सोडण्यात येत असल्यामुळे तलावातील पाणी पशू-पक्ष्यांनाही पिण्यायोग्य राहिलेले नाही. प्रकल्पाच्या सुरक्षा भिंतीलगत जिल्हा परिषद शाळा आहे. येथील विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनात अप्रत्यक्ष अन्नासह राखेचे कणही जातात.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ करते तरी काय?

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला प्रदूषण दिसत नाही का, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. फ्लाय अॅशवर उपाययोजना करण्यासाठी कंपनीला यापूर्वी अवगत केले आहे. वरिष्ठांशी चर्चा करून या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे मंडळाचे अधिकारी जितेंद्र पुराते म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Pollution shadows Wagholi: Ratan India plant faces scrutiny, villagers suffer.

Web Summary : Wagholi villagers suffer as the Ratan India plant pollutes air and water. Farmlands are ruined, health deteriorates, and relocation demands intensify. Authorities are urged to act.
टॅग्स :Amravatiअमरावती