शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
3
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
11
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
12
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
13
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
14
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
15
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
16
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
17
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
18
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना

संप मिटला, दोन महिन्यांनी अंगणवाडीत झाला किलबिलाट

By जितेंद्र दखने | Updated: January 27, 2024 20:54 IST

५२ दिवसानंतर तिढा सुटला:पोषण आहाराचे वाटप सुरळीत.

अमरावती: अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी उभारलेला संप मिटला असून जिल्ह्यातील सर्व ५२ दिवसानंतर अंगणवाडी सेविका आणि मदतनिस कामावर शनिवारपासून कामावर परतल्या आहेत. त्यामुळे अडीच हजारावर अंगणवाडी केंद्र उघडले असून अंगणवाडी केंद्राची मुले आलेले असून त्यांना आहार वाटप करण्यात आलेला आहे त्यामुळे अंगणवाडी केंद्रात पुन्हा किलबिलिट सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.

अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी ४ डिसेंबरपासून शासकीय सेवेत कायम करण्यासाठी मानधनवाढीच्या मागण्यासाठी संप पुकारला होता. या आंदोलनात जिल्ह्यातील २६४६ अंगणवाडीतील कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील या सर्व अंगणवाड्या बंद होत्या. अखेर ५२ दिवसांनंतर गुरुवार २५ जानेवारी रोजी मुंबई येथे महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थित पार पडलेल्या या बैठकीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन व ग्रॅच्युईटीबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय तसेच नवीन मोबाईल देण्याची मागण्या मान्य करण्यात आला. तर मानधनवाढीसंदर्भात पुढे चर्चा करण्यात येणार आहे.दरम्यान यावर अंगणवाडी कर्मचारी संघटनाचे समाधान झाल्याने तूर्तास कामबंद आंदोलन मागे घेण्यात आल्याचे महाराष्ट्र अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक)चे जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले. अंगणवाडी सेविका,मदतनिसाच्या संपाकऱ्यांच्या मागण्यावर तोडगा निघाल्याने शनिवारपासून जिल्ह्यातील २ हजार ६४६ अंगणवाड्याचे टाळे उघडले आहेत.परिणामी जिल्हाभरातील सर्व अंगणवाडी केंद्रात चिमुकल्याचा ५२ दिवसानंतर किलबिलाट सुरू झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.

आता चिमुकल्यांना नियमित पोषण आहारअंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन तब्बल ५२ दिवस चालले. त्यामुळे एवढे दिवस अंगणवाड्या बंद असल्याने चिमुकल्यांना पोषण आहारापासून वंचित राहावे लागले होते. मात्र आंदोलन मागे झाल्याने शनिवारपासून चिमुकल्यांना नियमित पोषण आहार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शासन सुरुवातीपासूनच अंगणवाडी सेविकांच्या मागण्या बाबत सकारात्मक होते. संप बरेच दिवस सुरू होता. परंतु आता अंगणवाडी सेविकांचा संप मिटल्यामुळे अंगणवाडी केंद्र पूर्ववत सुरू झाल्या आहेत-डॉ.कैलास घोडके उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती

टॅग्स :Amravatiअमरावती