शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

महसूल विभाग म्हणतो; काहीही करा मात्र बांबू लावाच!

By गणेश वासनिक | Updated: June 28, 2024 19:47 IST

मुख्यमंत्र्यांचे १०० कोटींचे बांबू लागवडीचे टार्गेट; ‘महसूल’ विभागाकडून सक्ती, इतर यंत्रणांमध्ये नियोजनाचा अभाव

अमरावती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात १०० कोटी बांबू लागवडीचे मिशन आहे. मात्र, त्यासाठी महसूल विभागाने ‘काहीही करा मात्र बांबू लागवड कराचं’, असे आतताईपणाचे धोरण अवलंबिले आहे. वनविभागावर बांबू लागवडीची सक्ती केली जात असली तरी भरपावसाळ्यात या निर्णयाने संबंधित यंत्रणा बुचकळ्यात पडल्या आहेत. राज्यात बांबू रोपांचा तुटवडा असताना मुख्यमंत्र्यांचे ‘मिशन बांबू’ हे स्वप्न साकार होईल का? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

वनविभागाने सन २०१७ पासून राज्यात टप्प्याटप्प्याने ५० कोटी वृक्ष लागवडीचा नियोजनबद्ध आराखडा तयार केल्यानंतर ही योजना यशस्वी झाली. मात्र, यंदा वृक्ष लागवड कमालीची मागे पडली आहे. परंतु, जिवाश्म इंधानाला पर्याय म्हणून बांबू लागवडीस प्राेत्साहन देण्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टास्क फोर्सचे गठन करून राज्यात १०० कोटी बांबू लागवड करण्याचे निर्देश अगोदरच दिले असताना महसूल विभागाला आता जाग आल्याने बांबू लागवडीसाठी शासनाच्या इतर यंत्रणा बुचकळ्यात सापडल्या आहेत. कारण शेतीच्या हंगामात हे टार्गेट शक्य होणार नसल्याचे चित्र आहे.महसूल विभागाचे तांत्रिक अज्ञानराज्यात बांबू लागवडीचे सूत्रे ही वन विभागाकडून हलविली जात आहेत. मात्र, महसूल विभागाला तांत्रिक बाबींचे ज्ञान नसल्याने पुरता गोंधळ उडाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार बांबू लागवडीचे टार्गेट प्रत्येक जिल्ह्यास १० हजार हेक्टर असताना महसूल विभागाने ही तयारी वेळेवर केली असून हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी अन्य यंत्रणांवर दबाव आणला जात आहे. एवढेच नव्हे तर पावसाळ्यात वेळेवर खड्डे खोदून बांबू लागवड करण्याचा फतवा काढलेला आहे. वृक्ष लागवडीचे तांत्रिक ज्ञान नसल्यामुळे इतर विभागांची तारांबळ उडाल्याचे दिसून येत आहे.निधी नाही, बांबू रोपांचा तुटवडामुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १०० कोटी बांबू लागवडीचे निर्देश दिल्यानंतर महसूल, वने, सामाजिक वनीकरण, कृषी विभाग आणि जिल्हा परिषद या प्रमुख विभागांनी समन्वय साधून योजना राबविण्याचे धोरण ठरविणे आवश्यक होते. याकरिता अगोदर महसूल विभागाने आवश्यक निधी उपलब्ध करून दिला असता तर टार्गेटप्रमाणे १०० कोटी बांबू रोपे निर्माण झाली असती. तथापि, याकडे महसूल विभागाने फारसे लक्ष दिले नाही. परिणामी या उन्हाळ्यात बांबू निर्मितीचे क्षेत्र ८० टक्क्यांनी घटले आहे. बांबू रोपे तयार नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांचे मिशन कसे पूर्ण होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.