शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
5
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
8
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
9
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
10
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
11
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
12
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
13
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
14
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
15
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
16
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
17
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
18
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
19
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले

पाऊस आला पाळणा झुलला; पक्ष्यांचे घरटे विणीला वेग

By गणेश वासनिक | Updated: July 19, 2023 14:17 IST

नवरंगांची प्रतीक्षा संपली; मेळघाट, पोहरा जंगलात घरट्यांची भरली शाळा

गणेश वासनिक

अमरावती : बळिराजा दरवर्षी पावसाची आतुरतेने प्रतीक्षा करतो. शेतकऱ्याला पावसाची प्रतीक्षा असते, तशीच पशु-पक्ष्यांनाही पावसाचे वेध लागतात. आता सर्वदूर पाऊस बरसू लागला आहे आणि पक्ष्यांनी घरटे बांधायला घेतली आहेत. मेळघाटसह अन्य जंगलात घरटी बांधून पक्षी आपल्या पिलांचे संगाेपन करीत आहेत.

स्वर्गीय नर्तक, सुगरण, शिंपी, वटवट्या, नवरंग, तितर, मोर, पिवळ्या गालाची टिटवी, चातक, कोतवाल, सिरकीर मलकोहा, खंड्या, वेडा राघू, निळ्या शेपटीचा वेडा राघू, काश्मिरी नीलकंठ, नीलकंठ, हुदहुद, राखी धनेश, मलबारी धनेश, सुतार, चंडोल अशा अनेक पक्ष्यांचा हाच विणीचा काळ आहे. हे सगळे पक्षी कधी आपल्या जोडीदारासोबत, तर कधी एकटेच घरटी बांधायला घेतात आणि पाऊस आला की आपली पुढची पिढी येणार या स्वप्नात रंगून जीव लावून मेहनत करतात.

मेळघाट, पोहरा जंगलात झाडाच्या फांदीवर घरट्यांची शाळा

‘पल्लवपुच्छ कोतवाल’ पक्षी मेळघाट जंगलाच्या वृक्षराजीत आपली पुढील पिढी घडविण्याचा स्वप्नात गुंग होऊन काटक्या आणि मऊ गवताचे तुकडे जमा करून घरटे तयार करीत आहेत. जमिनीपासून अंदाजे २० ते २५ फूट उंच झाडाच्या फांदीवर कपबशीच्या आकाराचे घरटे आहे. उत्तरेकडून ‘नवरंग’ पक्ष्यांचेदेखील आगमन झाले असून, हा पक्षीदेखील नदी किंवा नाल्याच्या ठिकाणी असणाऱ्या आडोशाच्या झाड-झुडपांमध्ये सध्या घरटी करण्यासाठी जागा शोधण्यात मग्न आहे.

पक्ष्यांचं अस्तित्व अन् पावसाचं आगमन हे निसर्गचक्र

पाऊस येताच सुप्तावस्थेतील कीटक जीवन जागे होतात. फुलपाखरे, नाकतोडे, कोळी, बेडूक, मासे, गांडूळ, चतुर अशा अनेक कीटकांची व सजिवांची संख्या वाढली आहे. हाच अंदाज बांधून पक्ष्यांकडून घरट्यांचा सगळा खटाटोप चालला आहे. पक्ष्यांचे अस्तित्व आणि पावसाचं आगमन हा निसर्गचक्राचाच एक भाग आहे.

चातक पक्ष्याचे दर्शन म्हणजे पावसाचे आगमन

चातक आणि मान्सूनचे आगमन याचे नाते अजरामर आहे. सध्या पोहरा जंगल परिसरात चातक पक्ष्याचे दर्शन झाले आहे. चातक पक्ष्याचे आगमन म्हणजे पाऊस येणार हे अगदी पक्के समीकरण आहे. चातक पक्ष्याला ‘रेन व्हिसीटर’ असेही म्हणतात. ‘पावश्या’ या पक्ष्याचा आवाजच मुळात ‘पेरते व्हा.. पेरते व्हा..’ असा येतो आणि मग शेतकरी पेरणीला लागतात.

मान्सूनच्या आगमनाने जंगल हिरवेगार होते. यावर फुलपाखरे, कोळी व इतर कीटकांचे जीवन समृद्ध होते. पर्यायाने पक्ष्यांना मोठ्या प्रमाणात खाद्य मिळते. जंगलातील जैवविविधता व अन्नसाखळी असेच तेथील परिसंस्था संतुलित होते. शेती आणि अर्थकारण तसेच पर्यावरण संतुलन यासाठी मान्सूनचे आगमन अत्यंत महत्त्वाचे आणि लाभदायी आहे.

- यादव तरटे - पाटील, पक्षिमित्र, अमरावती

टॅग्स :environmentपर्यावरणmonsoonमोसमी पाऊसRainपाऊसMelghatमेळघाटAmravatiअमरावती