शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

पाऊस आला पाळणा झुलला; पक्ष्यांचे घरटे विणीला वेग

By गणेश वासनिक | Updated: July 19, 2023 14:17 IST

नवरंगांची प्रतीक्षा संपली; मेळघाट, पोहरा जंगलात घरट्यांची भरली शाळा

गणेश वासनिक

अमरावती : बळिराजा दरवर्षी पावसाची आतुरतेने प्रतीक्षा करतो. शेतकऱ्याला पावसाची प्रतीक्षा असते, तशीच पशु-पक्ष्यांनाही पावसाचे वेध लागतात. आता सर्वदूर पाऊस बरसू लागला आहे आणि पक्ष्यांनी घरटे बांधायला घेतली आहेत. मेळघाटसह अन्य जंगलात घरटी बांधून पक्षी आपल्या पिलांचे संगाेपन करीत आहेत.

स्वर्गीय नर्तक, सुगरण, शिंपी, वटवट्या, नवरंग, तितर, मोर, पिवळ्या गालाची टिटवी, चातक, कोतवाल, सिरकीर मलकोहा, खंड्या, वेडा राघू, निळ्या शेपटीचा वेडा राघू, काश्मिरी नीलकंठ, नीलकंठ, हुदहुद, राखी धनेश, मलबारी धनेश, सुतार, चंडोल अशा अनेक पक्ष्यांचा हाच विणीचा काळ आहे. हे सगळे पक्षी कधी आपल्या जोडीदारासोबत, तर कधी एकटेच घरटी बांधायला घेतात आणि पाऊस आला की आपली पुढची पिढी येणार या स्वप्नात रंगून जीव लावून मेहनत करतात.

मेळघाट, पोहरा जंगलात झाडाच्या फांदीवर घरट्यांची शाळा

‘पल्लवपुच्छ कोतवाल’ पक्षी मेळघाट जंगलाच्या वृक्षराजीत आपली पुढील पिढी घडविण्याचा स्वप्नात गुंग होऊन काटक्या आणि मऊ गवताचे तुकडे जमा करून घरटे तयार करीत आहेत. जमिनीपासून अंदाजे २० ते २५ फूट उंच झाडाच्या फांदीवर कपबशीच्या आकाराचे घरटे आहे. उत्तरेकडून ‘नवरंग’ पक्ष्यांचेदेखील आगमन झाले असून, हा पक्षीदेखील नदी किंवा नाल्याच्या ठिकाणी असणाऱ्या आडोशाच्या झाड-झुडपांमध्ये सध्या घरटी करण्यासाठी जागा शोधण्यात मग्न आहे.

पक्ष्यांचं अस्तित्व अन् पावसाचं आगमन हे निसर्गचक्र

पाऊस येताच सुप्तावस्थेतील कीटक जीवन जागे होतात. फुलपाखरे, नाकतोडे, कोळी, बेडूक, मासे, गांडूळ, चतुर अशा अनेक कीटकांची व सजिवांची संख्या वाढली आहे. हाच अंदाज बांधून पक्ष्यांकडून घरट्यांचा सगळा खटाटोप चालला आहे. पक्ष्यांचे अस्तित्व आणि पावसाचं आगमन हा निसर्गचक्राचाच एक भाग आहे.

चातक पक्ष्याचे दर्शन म्हणजे पावसाचे आगमन

चातक आणि मान्सूनचे आगमन याचे नाते अजरामर आहे. सध्या पोहरा जंगल परिसरात चातक पक्ष्याचे दर्शन झाले आहे. चातक पक्ष्याचे आगमन म्हणजे पाऊस येणार हे अगदी पक्के समीकरण आहे. चातक पक्ष्याला ‘रेन व्हिसीटर’ असेही म्हणतात. ‘पावश्या’ या पक्ष्याचा आवाजच मुळात ‘पेरते व्हा.. पेरते व्हा..’ असा येतो आणि मग शेतकरी पेरणीला लागतात.

मान्सूनच्या आगमनाने जंगल हिरवेगार होते. यावर फुलपाखरे, कोळी व इतर कीटकांचे जीवन समृद्ध होते. पर्यायाने पक्ष्यांना मोठ्या प्रमाणात खाद्य मिळते. जंगलातील जैवविविधता व अन्नसाखळी असेच तेथील परिसंस्था संतुलित होते. शेती आणि अर्थकारण तसेच पर्यावरण संतुलन यासाठी मान्सूनचे आगमन अत्यंत महत्त्वाचे आणि लाभदायी आहे.

- यादव तरटे - पाटील, पक्षिमित्र, अमरावती

टॅग्स :environmentपर्यावरणmonsoonमोसमी पाऊसRainपाऊसMelghatमेळघाटAmravatiअमरावती