शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
3
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
4
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
5
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
6
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
7
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
8
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
9
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
10
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
11
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
12
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
13
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
14
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
15
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
16
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
17
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
18
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
19
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
20
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."

पाऊस आला पाळणा झुलला; पक्ष्यांचे घरटे विणीला वेग

By गणेश वासनिक | Updated: July 19, 2023 14:17 IST

नवरंगांची प्रतीक्षा संपली; मेळघाट, पोहरा जंगलात घरट्यांची भरली शाळा

गणेश वासनिक

अमरावती : बळिराजा दरवर्षी पावसाची आतुरतेने प्रतीक्षा करतो. शेतकऱ्याला पावसाची प्रतीक्षा असते, तशीच पशु-पक्ष्यांनाही पावसाचे वेध लागतात. आता सर्वदूर पाऊस बरसू लागला आहे आणि पक्ष्यांनी घरटे बांधायला घेतली आहेत. मेळघाटसह अन्य जंगलात घरटी बांधून पक्षी आपल्या पिलांचे संगाेपन करीत आहेत.

स्वर्गीय नर्तक, सुगरण, शिंपी, वटवट्या, नवरंग, तितर, मोर, पिवळ्या गालाची टिटवी, चातक, कोतवाल, सिरकीर मलकोहा, खंड्या, वेडा राघू, निळ्या शेपटीचा वेडा राघू, काश्मिरी नीलकंठ, नीलकंठ, हुदहुद, राखी धनेश, मलबारी धनेश, सुतार, चंडोल अशा अनेक पक्ष्यांचा हाच विणीचा काळ आहे. हे सगळे पक्षी कधी आपल्या जोडीदारासोबत, तर कधी एकटेच घरटी बांधायला घेतात आणि पाऊस आला की आपली पुढची पिढी येणार या स्वप्नात रंगून जीव लावून मेहनत करतात.

मेळघाट, पोहरा जंगलात झाडाच्या फांदीवर घरट्यांची शाळा

‘पल्लवपुच्छ कोतवाल’ पक्षी मेळघाट जंगलाच्या वृक्षराजीत आपली पुढील पिढी घडविण्याचा स्वप्नात गुंग होऊन काटक्या आणि मऊ गवताचे तुकडे जमा करून घरटे तयार करीत आहेत. जमिनीपासून अंदाजे २० ते २५ फूट उंच झाडाच्या फांदीवर कपबशीच्या आकाराचे घरटे आहे. उत्तरेकडून ‘नवरंग’ पक्ष्यांचेदेखील आगमन झाले असून, हा पक्षीदेखील नदी किंवा नाल्याच्या ठिकाणी असणाऱ्या आडोशाच्या झाड-झुडपांमध्ये सध्या घरटी करण्यासाठी जागा शोधण्यात मग्न आहे.

पक्ष्यांचं अस्तित्व अन् पावसाचं आगमन हे निसर्गचक्र

पाऊस येताच सुप्तावस्थेतील कीटक जीवन जागे होतात. फुलपाखरे, नाकतोडे, कोळी, बेडूक, मासे, गांडूळ, चतुर अशा अनेक कीटकांची व सजिवांची संख्या वाढली आहे. हाच अंदाज बांधून पक्ष्यांकडून घरट्यांचा सगळा खटाटोप चालला आहे. पक्ष्यांचे अस्तित्व आणि पावसाचं आगमन हा निसर्गचक्राचाच एक भाग आहे.

चातक पक्ष्याचे दर्शन म्हणजे पावसाचे आगमन

चातक आणि मान्सूनचे आगमन याचे नाते अजरामर आहे. सध्या पोहरा जंगल परिसरात चातक पक्ष्याचे दर्शन झाले आहे. चातक पक्ष्याचे आगमन म्हणजे पाऊस येणार हे अगदी पक्के समीकरण आहे. चातक पक्ष्याला ‘रेन व्हिसीटर’ असेही म्हणतात. ‘पावश्या’ या पक्ष्याचा आवाजच मुळात ‘पेरते व्हा.. पेरते व्हा..’ असा येतो आणि मग शेतकरी पेरणीला लागतात.

मान्सूनच्या आगमनाने जंगल हिरवेगार होते. यावर फुलपाखरे, कोळी व इतर कीटकांचे जीवन समृद्ध होते. पर्यायाने पक्ष्यांना मोठ्या प्रमाणात खाद्य मिळते. जंगलातील जैवविविधता व अन्नसाखळी असेच तेथील परिसंस्था संतुलित होते. शेती आणि अर्थकारण तसेच पर्यावरण संतुलन यासाठी मान्सूनचे आगमन अत्यंत महत्त्वाचे आणि लाभदायी आहे.

- यादव तरटे - पाटील, पक्षिमित्र, अमरावती

टॅग्स :environmentपर्यावरणmonsoonमोसमी पाऊसRainपाऊसMelghatमेळघाटAmravatiअमरावती