शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

जिल्ह्यातील ७७६ गावांत भेडसावणार पाणीटंचाईची समस्या; २१ कोटींचा आराखडा मंजूर

By जितेंद्र दखने | Updated: January 27, 2024 22:30 IST

२१.१८ कोटींच्या आराखड्यावर जिल्हाधिकाऱ्यांचे शिक्कामोर्तब, जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई निर्माण होणाऱ्या ७७६ गावांचा समावेश आहे. या गावांमधील नागरिकांची तहान भागविण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने टंचाई आराखडा तयार केला आहे.

अमरावती : यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील ७७६ गावांना पाणीटंचाईची समस्या भेडसावण्याची शक्यता आहे. या संभाव्य पाणीटंचाईच्या निवारणार्थ जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने २१ कोटी १८ लाख ४८ हजार रुपयांचा आराखडा पाणीपुरवठा विभागाने तयार केला होता. हा आराखडा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात मान्यतेसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला होता. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी २३ जानेवारी रोजी टंचाई आराखडा मंजूर केला आहे. त्यामुळे पाणीटंचाईची कामे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई निर्माण होणाऱ्या ७७६ गावांचा समावेश आहे. या गावांमधील नागरिकांची तहान भागविण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने टंचाई आराखडा तयार केला आहे. यामध्ये ७७६ गावांत विविध प्रकारच्या एकूण १०३३ योजना प्रस्तावित केल्या आहेत. या गावांमधील नागरिकांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाने पाणीपुरवठा करण्याच्या उपाययोजना, आराखडे तयार केले आहेत. यामध्ये ३३६ गावांमध्ये पाणीपुरवठा ४४६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील २६ गावांना टँकर प्रस्तावित केले आहेत. गतवर्षी अल्प पाऊस पडल्याने यंदा नळ पाणीपुरवठा योजनांची आणि विंधनविहिरींच्या विशेष दुरुस्तीसाठी तरतूद करण्याची पाणीटंचाई कृती आराखड्यातील योजना येत्या जून महिन्यापर्यंत राबविल्या जाणार आहेत.

प्रस्तावित कामे व नियोजनएकूण उपाययोजना -१०३३एकूण गावे -७७६अपेक्षित खर्च -२१ कोटी १८ लाख ४६ हजारविहीर अधिग्रहण -४४६प्रस्तावित टँकर -२६विंधन विहीर, कूपनलिका -३३६

जिल्ह्यात २६ गावांना टँकरने पाणीपुरवठाजिल्ह्यात यंदा अल्प प्रमाणात पाऊस पडल्याने जलसाठा मुबलक समाधानकारक असला तरी त्यात २६ गावे टंचाईग्रस्त आहेत. या गावांतील लोकांना पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाकडून भर दिला जात आहे. त्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने २६ गावांत टँकरने पाणीपुरवठा करण्याची शक्यता वर्तविली आहे.

कृती आराखडा तालुकानिहाय गावेअमरावती ६६, नांदगाव खंडेश्वर ७७, भातकुली ३८, तिवसा ४२, मोर्शी ६५, वरुड ८०, चांदूर रेल्वे ७६, धामणगाव रेल्वे ५३, अचलपूर ३४, चांदूर बाजार ४२, अंजनगाव सुर्जी २१, दर्यापूर ००, धारणी ८२, चिखलदरा १००, एकूण ७७६.

जिल्ह्यात यंदा उन्हाळ्याच्या दिवसात भेडसावणाऱ्या संभाव्य पाणीटंचाई निवारणार्थ पाणीपुरवठा विभागाने २१.१८ कोटींचा टंचाई आराखडा तयार केला. सदर आराखडा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला होता. टंचाई आराखड्याला जिल्हाधिकारी यांची मंजुरी मिळालेली आहे. -सुनील जाधव, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जि. प.

टॅग्स :water shortageपाणीकपात