शहरं
Join us  
Trending Stories
1
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
2
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
3
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
4
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
5
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
6
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
7
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
8
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
9
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
10
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
11
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
12
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
14
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
15
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...
16
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
17
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
18
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
19
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
20
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले

जिल्ह्यातील ७७६ गावांत भेडसावणार पाणीटंचाईची समस्या; २१ कोटींचा आराखडा मंजूर

By जितेंद्र दखने | Updated: January 27, 2024 22:30 IST

२१.१८ कोटींच्या आराखड्यावर जिल्हाधिकाऱ्यांचे शिक्कामोर्तब, जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई निर्माण होणाऱ्या ७७६ गावांचा समावेश आहे. या गावांमधील नागरिकांची तहान भागविण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने टंचाई आराखडा तयार केला आहे.

अमरावती : यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील ७७६ गावांना पाणीटंचाईची समस्या भेडसावण्याची शक्यता आहे. या संभाव्य पाणीटंचाईच्या निवारणार्थ जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने २१ कोटी १८ लाख ४८ हजार रुपयांचा आराखडा पाणीपुरवठा विभागाने तयार केला होता. हा आराखडा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात मान्यतेसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला होता. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी २३ जानेवारी रोजी टंचाई आराखडा मंजूर केला आहे. त्यामुळे पाणीटंचाईची कामे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई निर्माण होणाऱ्या ७७६ गावांचा समावेश आहे. या गावांमधील नागरिकांची तहान भागविण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने टंचाई आराखडा तयार केला आहे. यामध्ये ७७६ गावांत विविध प्रकारच्या एकूण १०३३ योजना प्रस्तावित केल्या आहेत. या गावांमधील नागरिकांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाने पाणीपुरवठा करण्याच्या उपाययोजना, आराखडे तयार केले आहेत. यामध्ये ३३६ गावांमध्ये पाणीपुरवठा ४४६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील २६ गावांना टँकर प्रस्तावित केले आहेत. गतवर्षी अल्प पाऊस पडल्याने यंदा नळ पाणीपुरवठा योजनांची आणि विंधनविहिरींच्या विशेष दुरुस्तीसाठी तरतूद करण्याची पाणीटंचाई कृती आराखड्यातील योजना येत्या जून महिन्यापर्यंत राबविल्या जाणार आहेत.

प्रस्तावित कामे व नियोजनएकूण उपाययोजना -१०३३एकूण गावे -७७६अपेक्षित खर्च -२१ कोटी १८ लाख ४६ हजारविहीर अधिग्रहण -४४६प्रस्तावित टँकर -२६विंधन विहीर, कूपनलिका -३३६

जिल्ह्यात २६ गावांना टँकरने पाणीपुरवठाजिल्ह्यात यंदा अल्प प्रमाणात पाऊस पडल्याने जलसाठा मुबलक समाधानकारक असला तरी त्यात २६ गावे टंचाईग्रस्त आहेत. या गावांतील लोकांना पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाकडून भर दिला जात आहे. त्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने २६ गावांत टँकरने पाणीपुरवठा करण्याची शक्यता वर्तविली आहे.

कृती आराखडा तालुकानिहाय गावेअमरावती ६६, नांदगाव खंडेश्वर ७७, भातकुली ३८, तिवसा ४२, मोर्शी ६५, वरुड ८०, चांदूर रेल्वे ७६, धामणगाव रेल्वे ५३, अचलपूर ३४, चांदूर बाजार ४२, अंजनगाव सुर्जी २१, दर्यापूर ००, धारणी ८२, चिखलदरा १००, एकूण ७७६.

जिल्ह्यात यंदा उन्हाळ्याच्या दिवसात भेडसावणाऱ्या संभाव्य पाणीटंचाई निवारणार्थ पाणीपुरवठा विभागाने २१.१८ कोटींचा टंचाई आराखडा तयार केला. सदर आराखडा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला होता. टंचाई आराखड्याला जिल्हाधिकारी यांची मंजुरी मिळालेली आहे. -सुनील जाधव, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जि. प.

टॅग्स :water shortageपाणीकपात