शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

राज्यात बिबट्यांची संख्या वाढली; अधिवासासाठी जंगल अपुरे, आता शहराकडे धाव

By गणेश वासनिक | Updated: January 14, 2024 17:26 IST

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात बिबट्यांची संख्या १६९० इतकी झाल्याची नोंद आहे.

अमरावती : राज्यात चांद्यापासून तर बांध्यापर्यंत जंगल अथवा नागरीवस्तीत सहजतेने बिबट आढळत असल्याच्या घटना निदर्शनास येत आहेत. हल्ली बिबट्यांची संख्या १६९० ईतकी नोंद झाली असून त्यांना अधिवासासाठी जंगल अपुरे ठरत आहे. परिणामी शिकार किंवा अन्नाच्या भटकंतीसाठी बिबट्यांनी शहराकडे धाव घेतल्याचे वास्तव आहे.

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात बिबट्यांची संख्या १६९० इतकी झाल्याची नोंद आहे. त्यात राखीव जंगलाच्या बाहेरील बिबट्याचा समावेश नाही. मात्र नैसर्गिक, रस्ते, रेल्वे अपघात, विहिरीत पडून, शिकार, विजेच्या प्रवाहासह इतर कारणांमुळे सन २०११ ते २०२१ या दरम्यान गत दहा वर्षात ८६२ बिबट्यांचा मृत्यू झाल्याची बाब चिंता वाढवणारी आहे. विशेषत: २०२० मध्ये सर्वाधिक १७२ बिबट्यांचे मृत्यू झाले आहेत. ८६२ बिबट्याच्या मृत्युपैकी ८८ घटना शिकारीच्या २८ घटना विजेचा धक्का लागून, १३ विषबाधा तर २७ बिबटे सापळा आणि फासमध्ये अडकून असे एकूण १५६ घटना शिकार व शिकारजन्य कारणामुळे घडलेल्या आहेत. तर बिबट्यांच्या मृत्यूचे प्रमाण हे ४३ टक्के इतके आहे. राज्य वन्यजीव अपराध नियंत्रण ब्यूरो स्थापन झाल्यास हा आकडा अतिशय कमी प्रमाणावर आणता येऊ शकतो, असा अहवाल राज्याच्या वन्यजीव विभागाने केंद्र शासनाला डिसेंबर २०२३ मध्ये पाठविला आहे. बिबट्याचा नैसर्गिक स्वभाव, वर्तणूक, बदलणाऱ्या परिस्थितीनुसार जुळवून घेण्याची क्षमता व मोठ्या प्रमाणातील प्रजोत्पादनामुळे बिबट्यांच्या संख्या वाढत आहेत. बिबट्यांचा मुक्त संचार सर्वच क्षेत्रात असल्याने राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि जिल्हा मार्गावरही त्याचा मृत्यूच्या घटना घडतात. या कारणामुळेच मानव- बिबट्यांचा संघर्ष वाढतो आणि बिबट्यांचे मृत्यू व मानवहानीच्या घटण्यामध्ये वाढ झाली आहे. - यादव तरटे पाटील, वन्यजीव अभ्यासक अमरावती.नागपूर हिवाळी अधिवेशनातही गाजला बिबट

अमरावती येथील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या परिसरात ऑक्टोंबर ते डिसेंबर या कालावधीत बिबट ठिय्या मांडून होता.त्याच्यापासून नागरिकांना धोका होऊ नये, यासाठी पोलिस आणि वन विभागाची चमू सुरक्षिततेसाठी तैनात होती. मात्र, हा बिबट जेरबंदकरावा म्हणून आमदार सुलभा खोडके यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात लक्षवेधीद्वारे सभागृहाचे लक्ष वेधले होते. अखेर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बिबट जेरबंद करावा, असे आदेश दिले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा बिबट जेरबंद करून मेळघाटच्या जंगलात सोडण्यात आले. तब्बल अडीच महिन्यानंतर अमरावतीकरांना बिबट्यापासून सुटका मिळाली, हे विशेष.

टॅग्स :leopardबिबट्याAmravatiअमरावती