शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
3
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
4
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
5
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
6
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
7
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
8
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
9
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
10
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
11
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
12
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
13
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
14
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
15
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
16
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
17
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
18
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
19
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
20
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
Daily Top 2Weekly Top 5

इंग्रजांची देण; माखला गावात २०० च्या वर आंब्यांचे वृक्ष असणारी आमराई, गावात दोन हजारपेक्षा जास्त आंब्यांची झाडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 11:26 IST

सातपुडा पर्वत रांगेत समुद्र सपाटीपासून ९७४ मीटर उंचावर वसलेल्या माखला या गावात २०० च्या वर आंब्यांचे वृक्ष असणारी आमराईदेखील इंग्रजांचीच देण आहे. विशेष म्हणजे १७०० लोकसंख्या असणाऱ्या या गावात आजच्या घडीला तब्बल दोन हजारांच्या वर आंब्याची झाडं आहेत, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. 

मनीष तसरे -

अमरावती : इंग्रज भारत सोडून गेले, मात्र जाताना ते अनेक गोष्टी भारतात सोडून गेले. भारत सोडताना त्यांनी अनेक इमारती, उद्योग, रेल्वे, बोगदे, पूल असं बरंच काही भारतात आपली आठवण म्हणून ठेवून गेले. सातपुडा पर्वत रांगेत समुद्र सपाटीपासून ९७४ मीटर उंचावर वसलेल्या माखला या गावात २०० च्या वर आंब्यांचे वृक्ष असणारी आमराईदेखील इंग्रजांचीच देण आहे. विशेष म्हणजे १७०० लोकसंख्या असणाऱ्या या गावात आजच्या घडीला तब्बल दोन हजारांच्या वर आंब्याची झाडं आहेत, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. असे आले इंग्रज माखल्यात :माखला या गावात खुमानसिंह या राजाचं राज्य होतं, असं गावकरी सांगतात. १८५७ च्या राष्ट्रीय उठावादरम्यान तात्या टोपे यांनी माखला गावातील खुमानसिंह राजाच्या राजवाड्यात आश्रय घेतला होता. तात्या टोपेंचा पाठलाग करीत इंग्रज घनदाट जंगल परिसरात असलेल्या माखला गावात पोहोचले. इंग्रजी फौज येत असल्याची चाहूल लागताच तात्या टोपेंनी तिथून पळ काढला. तात्या टोपेंना सहारा दिला म्हणून इंग्रजांनी या परिसरातील एकूण दीडशे कोरकू आदिवासी बांधवांना फाशी दिली आणि त्यांचे मृतदेह पहाडाखाली खोल दरीत फेकून दिले. तेव्हापासून माखला गावापासून काही अंतरावर असणारी दरी ही भूतखोरा या नावानं ओळखली जाते.

इंग्रज माखल्याच्या निसर्गसौंदर्याच्या प्रेमात : मेळघाटातील अतिशय उंच भागांपैकी एक असणारा माखला हा परिसर पाहून इंग्रज भारावून गेले होते. या परिसराचा विकास व्हावा अशी कल्पना इंग्रजांना सुचली. त्यावेळी विविध फळझाडांनी बहरलेल्या या भागात इंग्रजांनी आंब्याची २०० झाडे आणून लावली. काही वर्षांतच इंग्रजांची आमराई बहरली. आज माखला गावात दोन हजारांच्यावर आंब्याची झाडं आहेत.

काेड गावातील प्रत्येक आदिवासी शेतकऱ्याच्या शेतात आंब्याचं झाड आहे. येथील लोकांनी या आंब्याला वेगवेगळी नावेदेखील दिली आहेत. याशिवाय येथील परिसरात कोळशी, कुंकू, आरंग, जांभूळ, वड, हिरडा, मोह, उंबर, आदी प्रकारचे वृक्ष आहेत. शिवाय यासह निळसर पांढऱ्या रंगाची नाजूक फुलं तसंच रानचमेली, कारवी, माहोळ, आदी वेलीही या भागात आढळतात. मेळघाट पर्यटकांनी या ठिकाणी फक्त वाघ पाहायला न येता येथील संस्कृती, येथील झाडेसुद्धा पाहायला यायला हवे. - प्रदीप हिरुळकर (मेळघाटचे जाणकार)

आदिवासींच्या भाषेतील आंब्याचे प्रकारइंग्रजांनी निर्माण केलेल्या माखल्याच्या आमराईमध्ये विविध प्रजातीचे आंबे आहेत. त्यात गोब्या आम, कटर आम, शिकल आम, ढपका आम, डोकोडोको आम, गुरगुटी आम अशा आगळ्यावेगळ्या नावानं या भागातील आंब्याच्या प्रजाती ओळखल्या जात असल्याची माहिती माखला गावातील रहिवासी असणाऱ्या लाडकीबाई जामुनकर यांनी दिली. 

टॅग्स :MangoआंबाAmravatiअमरावती