शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

वादळासह मान्सूनपूर्व पहिल्याच पावसाने अमरावती शहरात दाणादाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2022 18:01 IST

बाजार समितीमध्ये विक्रीला आणलेली धान्याची पोती पावसामुळे भिजल्याने खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी पावसामुळे सर्वत्र तारांबळ उडाल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देझाडे पडल्याने वाहने दबली, बाजार समितीत शेतकऱ्यांची पोती भिजली

अमरावती : महिनाभरापासून ४३ ते ४४ अंश तापमानामुळे अंगाची काहिली होत असताना बुधवारी दुपारी ३.१५ च्या सुमारास अचानक अर्धा तासपावेतो मान्सूनपूर्व पाऊस कोसळला, पावसासह आलेल्या वादळाने शहरातील काही भागात वाहनांवर झाडे पडली. बाजार समितीमध्ये विक्रीला आणलेली धान्याची पोती पावसामुळे भिजल्याने खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी पावसामुळे सर्वत्र तारांबळ उडाल्याचे दिसून आले.

शहरात दुपारी ३ च्या सुमारास वातावरणात अचानक बदल झाला व १० ते १५ मिनिटांत जोरदार हवेसह मान्सूनपूर्व पावसाची एंट्री झाली. अर्धातासपावेतो पावसाचा जोर वाढतच गेला. या पावसाचा दुचाकीस्वारांनी मनसोक्त भिजत आनंद घेतला तर रस्त्यावरील काही नागरिकांनी आडोसा घेतला. यामध्ये वीजपुरवठा खंडित झाल्याने गोंधळात भर पडली.

शहरातील शासकीय वसाहतीसह काही भागात हवेमुळे झाडे कोसळली. फांद्या तुटून रस्त्यावर, वाहनांवर पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी तारांवर फांद्या पडल्याने वीजपुरवठा खंडित झालेला आहे. त्यात नळही येणार नसल्याचे मजीप्राने अगोदरच जाहीर केले असल्याने नागरिकांना अनेक समस्या उद्भवत आहेत.

मान्सूनपूर्व नियोजनाची पोलखोल

मे महिन्यात महापालिका, महावितरणद्वारा मान्सूनपूर्व कामे करण्यात येतात, किंबहुना आता सुरुवातही करण्यात आलेली आहे. मात्र, उशिराच्या नियोजनाअभावी मान्सूनपूर्व पहिल्याच पावसाने यंत्रणेच्या मान्सूनपूर्व नियोजनाची पोलखोल झाली आहे. विजेच्या तारांवर फांद्या पडल्याने काही भागातील वीजपुरवठा विस्कळीत, खंडित करण्यात आल्याचे दिसून आले.

शासकीत वसाहतीत झाड पडल्याने वाहने दबली

येथील जुन्या बायपास मार्गावर असलेल्या शासकीय वसाहतीमध्ये उपजिल्हा निवडणूक अधिकारी नरेंद्र फूलझेले यांच्या घरासमोरील मोठी झाडे पडल्याने त्यांच्या स्वत:च्या वाहनासह शासकीय वाहन झाडाखाली दबली गेल्याने वाहनांचे मोठे नुकसान झालेले आहे. यासह शहराच्या आऊटस्कड भागात वादळामुळे झाडे पडली व काही ठिकाणी फांद्या तुटून रस्त्यावर पडल्या आहेत.

बाजार समितीत उघड्यावरील शेतमाल भिजला

येथील बाजार समितीत शेतकऱ्यांनी बुधवारी शेतमाल विक्रीला आणला होता. ही पोती उघड्यावर असल्याने अचानक आलेल्या पावसाने भिजली आहेत. यामध्ये हरभरा, तूर व सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. मार्केट यार्डात व्यापाऱ्यांची पोती असल्याने शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल ठेवायला जागा नाही. त्यामुळे पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

टॅग्स :RainपाऊसweatherहवामानAmravatiअमरावती