शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
2
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
3
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
4
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
5
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
6
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
7
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
8
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
9
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
10
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
11
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
12
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
13
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
14
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
15
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
16
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
17
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
18
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
19
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
20
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!

'डीपीसी'तून जिल्ह्याला मिळणार ९०० कोटी; १२ पीएम मित्रा पार्कपैकी एक पार्क अमरावतीमध्ये होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 12:01 IST

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे : केंद्रीय अर्थसंकल्पावर फोकस; शहराला सीसीटीव्हीचा विळखा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा विकास समितीच्या माध्यमातून तब्बल ९०० कोटींची तरतूद करण्यात आली असून, ही रक्कम अर्थसंकल्पाच्या मंजुरीनंतर मिळेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती महसूल मंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी येथे दिली. ना. बावनकुळे हे अमरावतीच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रपरिषदेतून केंद्र व राज्य सरकारच्य योजना, निधीच्या तरतुदीची माहिती सांगितली. पालकमंमत्र्यांनी जलसंपदा विभाग, जिल्हा परिषदेत जाऊन बैठक घेतली. यावेळी त्यांनी सिंचन, पुनर्वसन, जलसंधारण, आरोग्य, आदींबाबत आढावा घेतला. त्यांच्या समवेत आमदार रवी राणा, प्रताप अडसड, केवलराम काळे, राजेश वानखडे, प्रवीण तायडे, उमेश ऊर्फ चंदू यावलकर, प्रविण पोटे पाटील, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, सीईओ संजिता महापात्रा आदी उपस्थित होते. सिंचन हा शासनाचा प्रथम प्राधान्याचा विषय असल्याचे पालकमंत्र्यांनी निर्देश दिले.

'आपला दवाखाना' येथे डॉक्टरांची व्यवस्था कराजिल्हा परिषदेत आढावा घेताना सार्वजनिक आरोग्य विभागात डॉक्टर आणि रुग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. डॉक्टरांसाठी कमी मुदतीत मुलाखती घेण्याचे नियोजन करावे. आवश्यकता भासल्यास आयुर्वेदिक डॉक्टरांची भरती करण्यात यावी. प्रामुख्याने 'आपला दवाखाना' येथे डॉक्टरांची व्यवस्था करावी, अशा सुचना त्यांनी केल्या.

डिजिटल शाळांसाठी सीएसआरमधून निधीसर्व शाळा, अंगणवाडीमध्ये वीज पुरवठा करण्यात यावा. याठिकाणी पाणी आणि फिल्टरची व्यवस्था करण्यात यावी. येथे डिजीटल अंगणवाडी आणि शाळा तयार करण्यात येईल. यासाठी एसआरमधून निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

अर्थसंकल्पावरही फोकसअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्राचे अत्यंत महत्त्वाचे बजेट मांडले आहे. हे अतिशय चांगले आहे. आता १२ तास असलेल्या उन्हापासून सोलर प्रकल्पाच्या माध्यमातून वीज निर्मिती तयार केली जाणार आहे. ४.४ टक्के वित्तीय तूट भरून आणण्याकरिता प्रयत्न अर्थसंकल्पात आहे. सर्वसमावेशक विकास करण्यासाठी हा अर्थसंकल्प आहे. भारताची अर्थव्यवस्था ही जगातील तिसऱ्या स्थानी आली पाहिजे, अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प असल्याचे ना. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. 

 

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेAmravatiअमरावती