शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
7
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
8
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
9
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
10
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
11
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
12
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
13
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
14
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
15
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
16
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
17
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
18
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
19
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
20
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल

दहावीचे विद्यार्थी मुक्त, पाचवीचे मात्र तणावात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:13 IST

अमरावती : इयत्ता दहावीचे विद्यार्थी परीक्षा रद्द झाल्याने टेन्शनमुक्त झाले आहे. त्यामुळे मुक्तपणे बागडत आहे. परंतु इयत्ता पाचवीचे ...

अमरावती : इयत्ता दहावीचे विद्यार्थी परीक्षा रद्द झाल्याने टेन्शनमुक्त झाले आहे. त्यामुळे मुक्तपणे बागडत आहे. परंतु इयत्ता पाचवीचे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी वाढत्या तापमानातदेखील ताणतणावात अभ्यास करीत आहेत. परीक्षा कधी होणार? की, होणारच नाही, हे ठामपणे सांगता येत नाही, अशी आजची स्थिती आहे.

शिष्यवृत्तीबरोबर चौथीची प्रज्ञाशोध, नवोदय व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा प्रलंबित आहेत. खरे तर प्रत्येक वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये प्रज्ञाशोध, शिष्यवृत्ती, नवोदय या परीक्षा व्हायच्या व विद्यार्थी एप्रिल, मे महिन्याच्या उन्हाळी सुटीचा मनसोक्त आनंद घ्यायये. पण, कोरोनाने जसे अनेक क्षेत्राला व्यापले यात शैक्षणिक क्षेत्रही अपवाद ठरले नाही. अन्य क्षेत्रात झालेले आर्थिक नुकसान कदाचित भरून निघू शकेल. पण शिक्षणक्षेत्रात विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान भरून निघणे कठीण आहे. मे महिन्या उत्तरार्धात तरी देखील आठवीपर्यंतच्या स्पर्धा परीक्षा यांचे भवितव्य अधांतरी आहे. पहिल्या कोरोना लाटीनंतर शाळा डिसेंबर-जानेवारीत सुरू झाल्या. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण झालेला नसेल तर परीक्षा कशा घ्यायच्या? या भूमिकेने शिष्यवृत्ती परीक्षा २५ एप्रिल रोजी जाहीर झाल्या. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव प्रचंड वाढल्याने ही परीक्षा २३ मे रोजी जाहीर झाली. मात्र, अजून कोरोनाचा कहर वाढताच अल्याने पुन्हा ही तारीख रद्द केली गेली. पुढील तारीख यथावकाश कळविली जाईल, असे नव्या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे या परीक्षार्थी व मार्गदर्शकांमध्ये संभ्रम व गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

बॉक्स

परीक्षेची अनिश्चितता

वाढत्या उष्णतामानाचा विचार करता शाळा एक मार्चपासून सकाळी भरविण्याची परंपरा आहे. परंतु, आता मे महिना ४० तापमानाची पातळी असतानाही विद्यार्थी मात्र मेटाकुटीला येऊन अभ्यास करताना दिसत आहे. मार्गदर्शक शिक्षक, शिक्षिकादेखील फोन किंवा ऑनलाईन पद्धतीने या विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर लक्ष ठेवून आहेत. कोरोनाच्या आजच्या भीषण स्थितीत या स्पर्धा परीक्षा कशा होतील, याबद्दल ठाम कोणी सांगू शकत नाही.