शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

दहा तास अनुभवला मृत्यूचा थरार वाटले संपले सारे; पण धीर ठेवला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2022 05:00 IST

युक्रेनच्या व्हिनितसिया नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटी (व्हीएनएमयू) मध्ये स्वराज शिक्षण घेत आहे. हे शहर युक्रेनची राजधानी कीव्हपासून सुमारे ५०० किमी अंतरावर आहे. युक्रेनमधून २४ ला पहिले विमान भारतीयांच्या सुटकेसाठी उडाले. आम्ही राहतो ते होस्टेल तसे सेफ; परंतु २४ तारखेला होस्टेलपासून पाच किमी अंतरावरील केमिकल फॅक्टरीवर बॉम्ब टाकण्यात आला. त्यानंतर सर्व विमानतळे बंद करण्यात आली.

गजानन मोहोडलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : युक्रेनची सीमा पार करून रोमानियात प्रवेश करण्याचे तब्बल दहा तास हा काळ मृत्यूचा थरार होता. सीमेवर एकच गर्दी, अनेक देशांतील नागरिकांचा गोंधळ, उणे सात अंश तापमान, बसायलाही जागा नाही, खायला, प्यायला काहीच नाही. एकमेकांच्या अंगावर बसलो. त्यातच गोंधळामुळे गोळीबारही झाला, काही जण जखमी झाले. क्षणभर वाटले, संपले सारे. एकमेकांना धीर दिला. देवाची कृपा, आई-वडिलांचे आशीर्वाद आणि सर्वांच्या प्रेमामुळे सुखरूप परतल्याची आपबीती युक्रेनवरून जिल्ह्यात परतलेल्या स्वराज पुंड याने ‘लोकमत’ला सांगितली. युक्रेनच्या व्हिनितसिया नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटी (व्हीएनएमयू) मध्ये स्वराज शिक्षण घेत आहे. हे शहर युक्रेनची राजधानी कीव्हपासून सुमारे ५०० किमी अंतरावर आहे. युक्रेनमधून २४ ला पहिले विमान भारतीयांच्या सुटकेसाठी उडाले. आम्ही राहतो ते होस्टेल तसे सेफ; परंतु २४ तारखेला होस्टेलपासून पाच किमी अंतरावरील केमिकल फॅक्टरीवर बॉम्ब टाकण्यात आला. त्यानंतर सर्व विमानतळे बंद करण्यात आली. आमच्या इमारतीखाली तात्पुरते बंकर तयार करण्यात आले होते. त्यामध्ये आम्ही २६ पर्यंत राहिलो. खाण्या-पिण्याची फारशी सुविधा नव्हती. आमच्या जवळ जे काही होते, त्यावरच दोन दिवस काढल्याचे स्वराज याने सांगितले.आम्ही दहा जणांनी मिळून बस केली व रोमानिया सीमेच्या आठ किमी अलीकडे उतरलो. तेथून पुढे पायवाटेने जावे लागले. वरून बर्फवृष्टी सुरू होती. जमिनीवरही बर्फ होता. अशा परिस्थितीत एकमेकांना धीर देत युक्रेनची सीमा गाठली व या दहा तासांच्या जीवघेण्या अनुभवानंतर रोमानियात सेफ झाल्याचे स्वराज म्हणाला.

सीमापारसाठी दहा जणांनी शेअर केली बसयुक्रेनमधून रोमानियाच्या सीमेवर जाण्यासाठी दूतावासाचे सहकार्य मिळाले नाही. दहा जणांनी मिळून बस भाड्याने घेतली. आठ तासांचा बस प्रवास व सहा तास पायी चालून आम्ही रोमानिया सीमेवर पोहोचलो. तिथे आधीच गर्दी असल्याने सीमापार करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली, असे स्वराज म्हणाला.

सीमेवर गोळीबार, नायजेरियन जखमीयुक्रेनच्या सीमेवर आफ्रिकन देशाचे अनेक नागरिक होते. त्यांच्यात सीमापार करण्यासाठी गोंधळ झाला. त्यामुळे हवेत गोळीबार करण्यात आला.  यामध्ये नायजेरियन तरुणाच्या पायाला गोळी लागली, तिथे पळापळही झाली. मी मागे फिरलो अन् ग्रुप विस्कळीत झाला. या गोंधळात अनेकांचे सामान फुटले, तुटले, कपडे फाडल्याचे त्याने सांगितले.

तीन प्रसंगी वाटले - वाचणार नाहीआठ दिवसांच्या काळात ज्यावेळी शहरावर अटॅक झाला, त्यानंतर बंकरमध्ये राहावे लागले व बाॅर्डर पार करण्याच्या वेळी गोळीबार, पळापळ या तीन प्रसंगी मी रडलो. कदाचित आपण वाचणार नाही, असे वाटले. संकटातून निघण्याची मानसिकता केली व आता घरी पोहोचल्याचे स्वराज म्हणाला.

ट्रांझिट व्हिसा पहिल्यास प्राधान्य

- रोमानियात आम्हाला ट्रांझिट व्हिसा देण्यात आला. येथे स्थानिक एनजीओंनी कॅम्प लावले होते. तिथे चांगली व्यवस्था झाली, ‘ऑपरेशन गंगा’सुरु झाल्याने भारताचे विमान आले. त्यामध्ये जे अगोदर पोहोचले त्यांना प्रवेश देण्यात आला. 

 

टॅग्स :warयुद्धStudentविद्यार्थी