शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

नळाला लागतात ‘टिल्लू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 23:39 IST

वैभव बाबरेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नळालाच मशीन लावून पाणी ओढले जात असल्यामुळे प्रामाणिक ग्राहकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. मशीन लावून पाणी खेचणाऱ्या ग्राहकांवर कारवाई करण्याची जबाबदारी मजीप्रा प्रशासनाची असताना, या विषयातही अधिकारी वर्ग हतबल असल्याचे दिसून येत आहे.सिंभोरा धरणावरून अमरावतीकरांना पाणीपुरवठा होतो, मासोद ...

ठळक मुद्देअधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : पाणीपुरवठ्याचे नियोजन बिघडले

वैभव बाबरेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नळालाच मशीन लावून पाणी ओढले जात असल्यामुळे प्रामाणिक ग्राहकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. मशीन लावून पाणी खेचणाऱ्या ग्राहकांवर कारवाई करण्याची जबाबदारी मजीप्रा प्रशासनाची असताना, या विषयातही अधिकारी वर्ग हतबल असल्याचे दिसून येत आहे.सिंभोरा धरणावरून अमरावतीकरांना पाणीपुरवठा होतो, मासोद येथील जलशुद्धीकरण केंद्राहून ग्राहकांच्या घरापर्यंत शुद्ध पाणीपुरवठा केला जातो. यादरम्यान पाइप लाइनमधून होणारी गळती व पाणीचोरीमुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होतो. मजीप्रा ९० हजारांवर ग्राहकांना पाणीपुरवठा करते. यापैकी ५० टक्क्यांवर ग्राहक मशीनद्वारे पाणी खेचत असल्याचे निदर्शनास आले. त्यातच आता उन्हाळाचे दिवस आहे. एक दिवसाआड अर्थात ७२ तासानंतर तास-दोन तास पाणीपुरवठा केला जातो. त्यातच टिल्लू पंप लावून नळाचे पाणी खेचले जात असल्यामुळे पाण्याची चणचण अधिकच वाढली आहे. मशीनने पाणी खेचणाऱ्यांच्या घरी मोठी धार, तर प्रामाणिकपणे पाणी भरणाºयांच्या घरी बारीक धारेने पाणीपुरवठा होत राहतो.पोलिसांची मदत घेणारमशीनद्वारे पाणी खेचणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी मजीप्रा अधिकाऱ्यांनी अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचे ठोस पाऊले उचलली नाही. एक ते दोन घराआड नळाला थेट मशीन लावून पाणी खेचले जात आहे. ही वस्तुस्थिती माहिती असतानाही मजीप्रा ठोस उचलत नाही. हा एकप्रकारे प्रामाणिक ग्राहकांवर अन्यायच आहे. शुद्ध पाण्याचा पुरवठा करणारी मजीप्रा मशीन लावणाऱ्या ग्राहकांपासून त्रस्त झाली आहे. आधीच मजीप्राकडे मनुष्यबळाचा अभाव आहे. घरोघरी मशीन असल्यामुळे कर्मचारी कुठे-कुठे पाठविणार, अशी स्थिती मजीप्राची झाली आहे. कारवाई करण्यासाठी गेलेल्या मजीप्रा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नागरिक रोष व्यक्त करतात. त्यामुळे आता मजीप्रा पोलीस मदत घेऊन मशीन लावणाऱ्या ग्राहकांवर कारवाईचा बडगा उगारणार आहे.सदनिकांमध्ये सर्वाधिक प्रकारशहर विकासाच्या दिशेने वाटचाल करीत असताना, फ्लॅटमध्ये राहणे दिवसेंदिवस पसंत केले जात आहे. त्यामुळे शहरातील कानाकोपºयात आता फ्लॅट बनले आहेत. या ठिकाणीही मजीप्राद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, फ्लॅटमध्ये राहणारे रहिवासी पाणी वर चढत नसल्याने थेट मजीप्राच्या नळालाच इलेक्ट्रिक मशीन लावून पाणी खेचण्याचा प्रकार सर्रास करतात. त्यामुळे खालच्या भागात राहणाºयांना योग्य व पुरेसा पाणीपुरवठा होत नाही.मजीप्रा करते हवेचेही बिल वसूल!एक दिवसाआड पाणीपुरवठा व टिल्लू मशीनद्वारे पाणी खेचले जात असल्यामुळे ग्राहकांना सुरळीत पाणी मिळत नाही. त्यातच पाणीपुरवठा सुरू होण्यापूर्वी १० ते १५ मिनिटे हवा पास होत राहते. त्यावेळी मीटरचे रीडिंग सुरूच असते. गेल्या कित्येक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे.पाणीपुरवठा करणाऱ्या नळांना मशीन लावून पाणी खेचले जात असल्यामुळे पाणी पुरवठा नियोजन बिघडले आहे. फ्लॅट सिस्टीममध्ये तर हे प्रकार अधिकच वाढले आहेत. याविषयी वरिष्ठांशी चर्चा करून कारवाईची दिशा ठरविण्यात येईल.- किशोर रघुवंशी, उपविभागीय अभियंता