शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

नळाला लागतात ‘टिल्लू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 23:39 IST

वैभव बाबरेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नळालाच मशीन लावून पाणी ओढले जात असल्यामुळे प्रामाणिक ग्राहकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. मशीन लावून पाणी खेचणाऱ्या ग्राहकांवर कारवाई करण्याची जबाबदारी मजीप्रा प्रशासनाची असताना, या विषयातही अधिकारी वर्ग हतबल असल्याचे दिसून येत आहे.सिंभोरा धरणावरून अमरावतीकरांना पाणीपुरवठा होतो, मासोद ...

ठळक मुद्देअधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : पाणीपुरवठ्याचे नियोजन बिघडले

वैभव बाबरेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नळालाच मशीन लावून पाणी ओढले जात असल्यामुळे प्रामाणिक ग्राहकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. मशीन लावून पाणी खेचणाऱ्या ग्राहकांवर कारवाई करण्याची जबाबदारी मजीप्रा प्रशासनाची असताना, या विषयातही अधिकारी वर्ग हतबल असल्याचे दिसून येत आहे.सिंभोरा धरणावरून अमरावतीकरांना पाणीपुरवठा होतो, मासोद येथील जलशुद्धीकरण केंद्राहून ग्राहकांच्या घरापर्यंत शुद्ध पाणीपुरवठा केला जातो. यादरम्यान पाइप लाइनमधून होणारी गळती व पाणीचोरीमुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होतो. मजीप्रा ९० हजारांवर ग्राहकांना पाणीपुरवठा करते. यापैकी ५० टक्क्यांवर ग्राहक मशीनद्वारे पाणी खेचत असल्याचे निदर्शनास आले. त्यातच आता उन्हाळाचे दिवस आहे. एक दिवसाआड अर्थात ७२ तासानंतर तास-दोन तास पाणीपुरवठा केला जातो. त्यातच टिल्लू पंप लावून नळाचे पाणी खेचले जात असल्यामुळे पाण्याची चणचण अधिकच वाढली आहे. मशीनने पाणी खेचणाऱ्यांच्या घरी मोठी धार, तर प्रामाणिकपणे पाणी भरणाºयांच्या घरी बारीक धारेने पाणीपुरवठा होत राहतो.पोलिसांची मदत घेणारमशीनद्वारे पाणी खेचणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी मजीप्रा अधिकाऱ्यांनी अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचे ठोस पाऊले उचलली नाही. एक ते दोन घराआड नळाला थेट मशीन लावून पाणी खेचले जात आहे. ही वस्तुस्थिती माहिती असतानाही मजीप्रा ठोस उचलत नाही. हा एकप्रकारे प्रामाणिक ग्राहकांवर अन्यायच आहे. शुद्ध पाण्याचा पुरवठा करणारी मजीप्रा मशीन लावणाऱ्या ग्राहकांपासून त्रस्त झाली आहे. आधीच मजीप्राकडे मनुष्यबळाचा अभाव आहे. घरोघरी मशीन असल्यामुळे कर्मचारी कुठे-कुठे पाठविणार, अशी स्थिती मजीप्राची झाली आहे. कारवाई करण्यासाठी गेलेल्या मजीप्रा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नागरिक रोष व्यक्त करतात. त्यामुळे आता मजीप्रा पोलीस मदत घेऊन मशीन लावणाऱ्या ग्राहकांवर कारवाईचा बडगा उगारणार आहे.सदनिकांमध्ये सर्वाधिक प्रकारशहर विकासाच्या दिशेने वाटचाल करीत असताना, फ्लॅटमध्ये राहणे दिवसेंदिवस पसंत केले जात आहे. त्यामुळे शहरातील कानाकोपºयात आता फ्लॅट बनले आहेत. या ठिकाणीही मजीप्राद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, फ्लॅटमध्ये राहणारे रहिवासी पाणी वर चढत नसल्याने थेट मजीप्राच्या नळालाच इलेक्ट्रिक मशीन लावून पाणी खेचण्याचा प्रकार सर्रास करतात. त्यामुळे खालच्या भागात राहणाºयांना योग्य व पुरेसा पाणीपुरवठा होत नाही.मजीप्रा करते हवेचेही बिल वसूल!एक दिवसाआड पाणीपुरवठा व टिल्लू मशीनद्वारे पाणी खेचले जात असल्यामुळे ग्राहकांना सुरळीत पाणी मिळत नाही. त्यातच पाणीपुरवठा सुरू होण्यापूर्वी १० ते १५ मिनिटे हवा पास होत राहते. त्यावेळी मीटरचे रीडिंग सुरूच असते. गेल्या कित्येक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे.पाणीपुरवठा करणाऱ्या नळांना मशीन लावून पाणी खेचले जात असल्यामुळे पाणी पुरवठा नियोजन बिघडले आहे. फ्लॅट सिस्टीममध्ये तर हे प्रकार अधिकच वाढले आहेत. याविषयी वरिष्ठांशी चर्चा करून कारवाईची दिशा ठरविण्यात येईल.- किशोर रघुवंशी, उपविभागीय अभियंता