शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

पूर्णानगरला शासनाचा प्रतिकात्मक अंत्यविधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 11:21 PM

गुलाबी बोंडअळीने संपूर्ण कपाशीचे पीक उद्ध्वस्त झाले असताना शासनस्तरावर कोणताही निर्णय नाही.

ठळक मुद्देशेतकरी आक्रमक : बोंडअळीने कपाशीचे पीक उद्ध्वस्त

आॅनलाईन लोकमतअमरावती : गुलाबी बोंडअळीने संपूर्ण कपाशीचे पीक उद्ध्वस्त झाले असताना शासनस्तरावर कोणताही निर्णय नाही. यामुळे भातकुली तालुक्यातील पूर्णानगर येथील संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत मुख्यमंत्र्यासह कृषिमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन व अंत्यविधी केला.पूर्णानगर व परिसरातील बीटी कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा मोठ्या प्रमाणावर हल्ला झाला. याप्रकरणी कृषी विभागाद्वारा कोणतीही हालचाल न झाल्याने शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे लेखी तक्रारी केल्यात. त्यानंतर जिल्हा समितीने पाहणी केली असता, कपाशीचे ९६ टक्के बोंडे किडली असल्याचा अहवाल शासनाला दिला. मात्र, यानंतरही शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, यासाठी कोणताही शासनादेश झालेला नाही. उत्पादन खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांनी कपाशीच्या उभ्या पिकात नांगर फिरविला. कृषी विभागातील समितीच्या अहवालानुसार या परिसरातील शेतकऱ्यांचे एकरी किमान सव्वा लाख रुपये नुकसान झाले असताना, बियाणे कंपनी किंवा शासनाने शेतकऱ्यांना भरपाई दिली नाही. त्यामुळे संतप्त शेतकºयांनी निषेधाच्या घोषणा देत तत्काळ भरपाईची मागणी केली. आंदोलनात बीटी बोंडअळी त्रस्त समितीचे उमेश महिंगे, संजय माकोडे, प्रमोद इटके, अंकुश जुनघरे, कळसकर गुरूजी, हरिभाऊ तायडे, विजय गुंडाले, छोटू देशमुख आदी उपस्थित होते.बाधित खरीप अन् शेतकऱ्यांचा आक्रोशयंदाचा खरीप हंगाम अपुऱ्या पावसामुळे बाधित झाल्याने मूग, उडीद व सोयाबीन उद्ध्वस्त झाले. यामधून जी पिके वाचलीत, त्या शेतमालास हमीभावही मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची सर्व मदार कपाशीवर होती. मात्र, यंदा बीटी कपाशीवर मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंड अळीचा हल्ला झाल्याने शेतकºयांना उत्पादनखर्चही निघणे मुश्कील झाले आहे.