बाजार समित्यांच्या निवडणुकांना स्थगनादेश
By Admin | Updated: July 25, 2015 01:13 IST2015-07-25T01:13:32+5:302015-07-25T01:13:32+5:30
सहकार क्षेत्रातील महत्त्वाचा घटक असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगूल वाजला असला ...

बाजार समित्यांच्या निवडणुकांना स्थगनादेश
शासन आदेश : सहकार खात्याचा निर्णय, सहा महिन्यांनंतर होणार
अमरावती : सहकार क्षेत्रातील महत्त्वाचा घटक असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगूल वाजला असला तरी ज्या बाजार समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम प्रशासनाने जाहीर केला नाही, अशा बाजार समितींंच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय राज्याच्या सहकार विभागाने घेतला आहे. त्यामुळे या निवडणुका आता सहामहिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर होणार आहेत.
सध्या पावसाळा सुरु झाला असल्याने शेतकरी कामात व्यस्त आहेत. ही बाब लक्षात घेता महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मधील कलम १४(३)(ए) च्या तरतुदीनुसार टंचाईदुष्काळ, पूर, आग किंवा इतर कोणत्याही आपत्तीमुळे राज्य विधानमंडळाचा किंवा संसदेचा अथवा एखाद्या प्राधिकरणाचा कोणताही निवडणूककार्यक्रम एकाचवेळी आल्यामुळे बाजार समित्यांच्या निवडणुुका पुढे ढकलण्याचे अधिकार राज्य शासनाला आहेत. बाजार समिती निवडणुकीसंदर्भात उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्यासंदर्भात निश्चित आदेश दिले आहेत. ज्या बाजार समित्यांच्या निवडणुुकीसंदर्भात जिल्हाधिकारी किंवा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी कृषी पणन नियम १९६७ च्या नियम ४३(१) खाली निवडणुकीसंदर्भात आदेश काढले आहेत, अशा बाजार समित्या वगळून उर्वरित सर्व बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुका आदेशाच्या तारखेपासूून पुढील सहा महिन्यांच्या कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
( प्रतिनिधी)