शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

तीन दिवसांत सर्वेक्षण, महिनाभरात नुकसान भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 11:01 PM

आॅनलाईन लोकमतअमरावती : जिल्ह्यातील आठ तालुक्यांत ११ फेब्रुवारी रोजी अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या बाधित क्षेत्राचे तीन दिवसांच्या आत सर्वेक्षण करून संयुक्त स्वाक्षरी अहवाल जिल्हा प्रशासनास आठवड्याच्या आत सादर करा, असे आदेश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी सोमवारी बैठकीत दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत ...

ठळक मुद्देप्रवीण पोटे-पाटील यांचे आदेश

आॅनलाईन लोकमतअमरावती : जिल्ह्यातील आठ तालुक्यांत ११ फेब्रुवारी रोजी अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या बाधित क्षेत्राचे तीन दिवसांच्या आत सर्वेक्षण करून संयुक्त स्वाक्षरी अहवाल जिल्हा प्रशासनास आठवड्याच्या आत सादर करा, असे आदेश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी सोमवारी बैठकीत दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान यांच्यासह गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार, लीड बँक मॅनेजर, पोकराचे समन्वयक आदी उपस्थित होते.जिल्ह्यात मोर्शी, वरूड, चांदूर बाजार, अचलपूर, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, चिखलदरा व धारणी या आठ तालुक्यांत गारपिटीसह पाऊस पडला आहे. या अवकाळी पावसाने हरभरा, गहू, केळी, संत्रापिकांचे प्रचंड नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. एकूण ३८४ गावातील सुमारे ३१ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. कृषी, महसूल विभागाने तातडीने नुकसानग्रस्त क्षेत्राचे सर्वेक्षण व पंचनामे करून संयुक्त स्वाक्षरी अहवाल तीन दिवसांचे आत जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावा, अहवाल करीत असताना बाधित शेतकºयांना अधिकाधिक नुकसान भरपाई मिळायला हवी, या दृष्टीने अहवाल करावा, असे निर्देश पालकमंत्री पोटे यांनी अधिकाऱ्यांना दिले.कृषी संजीवनी योजनेंतर्गत ५३२ गावांची निवडजागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा (पोकरा) आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. या प्रकल्पाविषयी शेतकºयांना माहिती होण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा घेऊन जनजागृती करावी. या प्रकल्पांतर्गत समूह तसेच वैयक्तिक प्रकल्पांसाठी शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी अनुक्रमे ७५ टक्के व ५० टक्के अनुदान दिले जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील ५३२ गावांची निवड करण्यात आली असून सुमारे ५८ क्लस्टर हे खारपाणपट्ट्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. उपरोक्त सर्व गावांत पाच टप्प्यांत कामे पूर्णत्वास जाणार आहे. शेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होण्यासाठी शेतकºयांना सहकार्य करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यासाठी भरीव निधी मिळणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.दलितवस्ती सुधारणा योजनेंतर्गत ३० कोटींचा निधी मंजूरसन २०१७-१८ या वर्षाकरिता सुमारे ३० कोटी निधी दलित वस्ती सुधारणा अंतर्गत मंजूर झाला आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती यांना निधीचे वितरण करण्यात आले आहे. प्राप्त झालेल्या निधीतून प्रत्येक नगरपरिषद, नगरपंचयातींनी रस्ता व नाला बांधणीच्या कामांना प्राधान्य द्यावे. कुठलेही काम करताना ते गुणवत्तापूर्ण व पारदर्शकपणे होईल याची दक्षता घ्यावी. विकासकामात प्रत्येक पदाधिकाºयांना सहभागी करून घ्यावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी सोमवारच्या आढावा बैठकीत दिले.तालुकानिहाय नुकसानमोर्शी तालुक्यात ४० गावांमध्ये २,५०४ हेक्टर, वरूड तालुक्यात ६ गावांमध्ये ५० हेक्टर, चांदूरबाजार तालुक्यात १५४ गावांमध्ये १७,१०३ हेक्टर, अचलपूर तालुक्यात ५७ गावांत ६,३७५ हेक्टर, दर्यापूर तालुक्यात १७ गावांत ४३ हेक्टर, अंजनगाव सुर्जी तालुक्यात ४,५२५ हेक्टर, चिखलदरा तालुक्यात ६ गावांमध्ये १६ हेक्टर, तर धारणी तालुक्यात २० गावांमधील ११० हेक्टरमध्ये नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाला सादर झाला आहे.