शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

सर्वोच्च न्यायालयाने विनाकारण वाद उकरून काढू नये, प्रकाश आंबेडकरांचे ताशेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2022 15:39 IST

ॲड. आंबेडकर हे अमरावतीत वंचित बहुजन वंचित आघाडीच्या पदाधिकारी मेळाव्यासाठी आले असता त्यांनी पत्रपरिषदेतून केंद्र व राज्य सरकारसह सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजावरही टीका केली.

ठळक मुद्देदेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा

अमरावती : सध्या देशात वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा गाजत आहे, यात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मात्र, अशा प्रकारचे विनाकारण वाद सर्वोच्च न्यायालयाने उकरून काढू नये, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. 

ॲड. आंबेडकर हे आज (दि. २१) अमरावतीत वंचित बहुजन वंचित आघाडीच्या पदाधिकारी मेळाव्यासाठी आले असता त्यांनी पत्रपरिषदेतून केंद्र व राज्य सरकारसह सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजावरही ताशेरे ओढले.

हल्ली जाती, धर्मात तेढ निर्माण होईल, असे नेत्यांचे व्यक्तव्य आहेत. कधी मंदिर, मशीद, तर कधी हनुमान चालिसा असे अनावश्यक मुद्दे आणले जात आहेत. ज्ञानवापी मशीदचा मुद्दा देशभरात वादग्रस्त ठेवण्याचे षडयंत्र रचले जात आहे. मग काय, सम्राट अशोकाच्या काळात बांधलेले बौद्ध विहार कुठे गेले? असा सवाल आंबेडकर यांनी उपस्थित केला. वाद उकरून काढणे हे सर्वोच्च न्यायालयाचे काम नाही. देशात शांतता पाहिजे की अशांतता हे लोकांनी ठरवलं पाहिजे असेही ते म्हणाले.

शरद पवारांनी ब्राम्हण विरोधी नाही हे सिद्ध करण्यासाठी बैठक बोलावली 

अभिनेत्री केतकी चितळे प्रकरण आता वेगळ्या वळणार गेले आहे, राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांनी आणि काही कार्यकर्त्यांनी  ब्राम्हण समाजाच्या विरोधात वक्तव्य केले आणि केतकी हे प्रकरण वेगळ्या वळणावर गेले. त्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना मी ब्राम्हण विरोधी नाही, हे सिध्द करण्यासाठी बैठक बोलावली, अशी  टीका ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. 

शरद पवार यांच्यावर ब्राम्हण समाजाने बहिष्कार घातल्याने या बैठकीत ब्राम्हण समाजाच्या विविध संघटनांना आमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे काही जणांनी त्याच्यावरती बहिष्कार घातला याचे उत्तर शरद पवार देतील, असे ॲड. आंबेडकर म्हणाले.

दम असेल तर मला उचलून दाखवावं

देशात भाजपने दडपशाहीचे राजकारण सुरू केलं आहे, उठ सूट कोणालाही ईडीच्या नोटीस दिल्या जात आहे. भाजपने देशात मोकळं वातावरण ठेवलं नाही. मलाही ईडीची नोटीस दिली होती. त्यामुळे दम असेल मला उचलून दाखवून कारवाई करावी,असे थेट आव्हान प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला दिले. मात्र यावेळी भाजपवर टीका करताना त्यांची  जीभ घरसली होती, हे विशेष.

टॅग्स :PoliticsराजकारणPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीSharad Pawarशरद पवारKetaki Chitaleकेतकी चितळेBJPभाजपा