शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

‘शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा’ हा डाग निघणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 13:18 IST

राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात आहे. ही बाब निश्चित भूषणावह नाही.

ठळक मुद्देउपाययोजनांचा अंमल नाही दर ३० तासांत एक शेतकरी मृत्यू

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सलग चार वर्षे दुष्काळ, नापिकी यामुळे खासगी सावकारांच्या कर्जाच्या दुष्टचक्रात शेतकरी गुरफटला आहे. शेतकऱ्यांच्या संघर्षावर नैराश्य मात करीत असताना, त्यांना जगण्याचे बळ देण्यास शासन व त्यासाठी पाठपुरावा करण्यास लोकप्रतिनिधी कमी पडले आहेत. दर ३० तासांत एक शेतकरी मृत्यूला कवटाळतो. राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात आहे. ही बाब निश्चित भूषणावह नाही.जानेवारी ते मार्च २०१९ अखेरपर्यंत जिल्ह्यात ५३ शेतकऱ्यांनी फास जवळ केला. निवडणुकीच्या तोंडावर केंद्र व राज्य शसनाने आश्वासनांची खैरात केली; मात्र शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच नाही. यंदा मार्च महिन्यात २४ शेतकरी आत्महत्या झाल्या. शासन समितीद्वारे आता यामधील किती पात्र अन् अपात्र, याची चिरफाड होईलही. त्या कुटुंबाला ३० हजारांचा धनादेश व ७० हजारांची मुदत ठेव; तीदेखील तहसीलदार व शेतकऱ्यांच्या नावे देण्यात येईल. परंतु, ज्या मायमाउलीच्या कपाळाचं कुंकू पुसलं गेलं, तिच्या जगण्याला उभारी कोण देणार, हा प्रश्न मात्र तीन दशकांपासून अद्यापही कायम आहे.मुख्यमंत्री म्हणून सूत्रे स्वीकारताच देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्रची घोषणा केली होती. मात्र, या चार वर्षात शेतकरी आत्महत्या घटना थांबलेल्या नाहीत. शासकीय योजनांचा लाभ लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचतच नाहीत. मुळात योजना राबविणारी यंत्रणा पारदर्शीपणे काम करीत नसल्याचे खरा शेतकरी लाभापासून वंचित राहिला आहे. दरवर्षी कर्जाचा डोंगर वाढताच आहे. यंदा जानेवारी महिन्यात १९, फेब्रुवारी महिन्यात १८ व मार्च महिन्यात २४ कर्जबाजारी शेतकऱ्यांनी मृत्यूचा घोट घेतला. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा हा डाग निघणार कधी, असा बळीराजाचा सवाल आहे.शेतकरी आत्महत्यांची नोंद शासनस्तरावर सन २००१ पासून घेण्यात येत आहे. तेव्हापासून ३१ मार्च २०१९ या कालावधीत एकूण ३६२४ शेतकरी आत्महत्या झाल्या. यापैकी १५६३ आत्महत्या पात्र, तर १९९६ प्रकरणे अपात्र व ६५ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.

आतापर्यत विदर्भ व मराठवाड्यातील ५८०० गावांना भेटी दिल्यात. ‘मिशन’द्वारे शासनाला शिफारस करते; धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नाही. शेतकरी आरोग्य व शेतकरी अन्न सुरक्षा या योजना सुरू करण्यास यश आले, अजून एकात्मिक शेतकरी वाचवा योजना सुरू झालेली नाही. ‘डोक्याला इजा व उपचार पायाला’ अशी शासनाची स्थिती आहे.- किशोर तिवारी, अध्यक्ष शेतकरी स्वावलंबन मिशन

ही शेतकऱ्यांची आत्महत्या नव्हे, तर खूनच आहे. याबाबतचा गुन्हा सरकारवर दाखल करायला पाहिजे. पिकांना ५० टक्के नफ्यासह हमीभाव नाहीत. पिकांच्या आयात धोरणाबाबतही दुजाभाव आहे. सर्व पाप काँग्रेस सरकारचे म्हणून मोदी सरकार ढकलू पाहत आहे. मात्र, या सरकारलादेखील पाच वर्र्षे मिळाली. अद्याप शेतमजुरीचे दर शासन ठरवू शकलेले नाही.- विजय जावंधिया, शेतकरी नेते.तज्ज्ञांना अपेक्षित आहे,‘केम’ प्रकल्पात केवळ लिखापोती. योजनेच्या लाभापासून खरा लाभार्थी वंचित. कोट्यवधीच्या घोटाळ्यांचा आरोप.शेतकरी स्वावलंबन मिशन फक्त शासनाला शिफारस करणार; कुठलाही धोरणात्मक निर्णयाचा अधिकार नाही.कृषी विभागाच्या योजना खºया गरजू शेतकºयांपर्यंत पोहोचल्याच नाही. अन्य विभागांच्या योजनेतही हीच स्थिती.२३ जानेवारी २००६ पासून मृत शेतकºयांना वारसांना मिळणाºया एक लाखाच्या मदतनिधीत अद्याही वाढ नाही.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या