शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

पंर एसटीमध्येच प्रहारचा ठिय्या

By admin | Updated: May 29, 2014 01:33 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या बसची दुरावस्था पाहता प्रवाशांचे अक्षरश: बेहाल होत आहे.

अमरावती : राज्य परिवहन महामंडळाच्या बसची दुरावस्था पाहता प्रवाशांचे अक्षरश: बेहाल होत आहे. ही व्यवस्था सुधारण्याकरिता प्रहार संघटनेने लढा उभारला असून याकरिता बुधवारी वलगाव येथील पेढीनदीवर पंर झालेल्या एसटीमध्येच ठिय्या मांडून एसटी महामंडळाला वेठीस धरले. त्यामुळे ऑगस्ट महिन्यापर्यंत सर्व सोईसुविधा पुरविण्याचे आश्‍वासन महामंडळाने प्रहार कार्यकर्त्याना दिल्यावरच आंदोलन मागे घेण्यात आले.

राज्य परिवहन महामंडळात एसटी वाहनाची दुरवस्था पाहता अनेक अडचणीचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. एसटीची अवस्था बघता प्रवाशांना जीव धोक्यात टाकून प्रवास करावा लागत आहे. भंगार एसटीमधूनच गेल्या कित्येक दिवसांपासून महामंडळ आपली वेळ मारुन नेत प्रवाशांच्या सोईसुविधांकडे दुर्लक्ष केले जात आहे. भंगार अवस्थेतील काही एसटींना खिडकी अथवा काचा नाहीत. काही एसटीमध्ये खुच्र्या सुस्थितीत नाहीत. चालक, वाहकांची कमतरता असतानाही नियुक्त्या केल्या जात नाहीत, अश्या समस्यामुळे प्रवासी कटांळले आहे. परतवाडा व चादुरबाजार आगारात एसटी बसेसचा दर्जा सुधारणे, रिक्त पदे भरणे व काही मार्गावर फेर्‍या वाढविणे अश्या मागण्या प्रहारने केल्या होत्या.

ऑगस्ट अखेरपर्यंत कारवाई करण्याचे आश्‍वासन

अमरावती : या मागणीकरिता प्रहार संघटनेने २७ मे पासून डेरा आंदोलन करण्याची भूमिका दर्शविली होती. या पार्शभुमीवर बुधवारी अांदोलनाच्या तयारीत असणार्‍या प्रहार कार्यकर्त्याना वलगाव येथील पेढी नदीच्या पुलावर शेगाव-बम्हपुरी ही एसटी बंद अवस्थेत दिसली.

ही एसटी पंर झाली होती तसेच त्यामध्ये चाक बदलविण्यासाठी दुसरी स्टेपनी एसटीमध्ये नसल्याचे प्रहार कार्यकर्त्यांना दिसून आले. त्यामुळे प्रहार सघंटनेनेचे संस्थापक बच्चू कडू व जिल्हा प्रमुख छोटु महाराज वसु यांनी त्या बंद एसटीमध्येच ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. एसटीमधील सर्व प्रवाश्याना प्रहार कार्यकर्त्यानी स्वत:च्या वाहनावर बसवून अमरावती बसस्थानकापर्यंत पोहचविण्यात आले. दुपारी १२ वाजता भर उन्हात एसटीमध्ये ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले. प्रहार कार्यकर्त्यानी एसटीवर चढून घोषणाबाजी करीत प्रहारचे झेंडे फडकाविले. महामडळांच्या भोंगळ कारभारावर घोषणाबाजी करीत प्रहार कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरु ठेवले होते.त्यामुळे वलगाव मार्गावरील वाहतुक ठप्प झाली होती. या आंदोलनाची भनक महाराष्ट्र राज्य मार्ग परीवहन महामंडळाच्या अधिकार्‍यांना लागताच प्रादेशिक व्यवस्थापक,प्रादेशिक अभियंता, विभाग नियंत्रक व यंत्र अभियंता यांनी आंदोलनस्थळी भेट देवून बच्चु कडु यांच्याशी चर्चा केली.यावेळी बच्चू कडू यांनी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक वि.ना. मोरे यांच्याशी मोबाईलवर संपर्क करुन आपल्या मागण्या पुर्तेतेकरिता आश्‍वासन मागितले. तब्बल ४ वाजेपर्यंत हे ठिय्या आंदोलन पेढीनदीच्या पुलावर सुरुच होते. यादरम्यान महामंडळाच्या अधिकार्‍यांनी ठिय्या आंदोलन स्थळावर भेट देवून बच्चु कडु यांच्याशी चर्चा केली. जुन महिन्यातील विधीमंडळाच्या अधिवेशनात घेण्यात येणार्‍या बैठकीत आपल्याशी चर्चा करण्यात येईल असे आश्‍वासन बच्चु क़डु यांना देण्यात आले.त्यावेळी चादुरबाजार व परतवाडा आगारातील काही समस्या सुधारण्याचे आश्‍वासन अधिकार्‍यांनी दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात प्रहारचे धीरज जयस्वाल, मंगेश देशमुख, शंभु मालठाणे, गजानन भुगुल, जोगेंद्र मोहोड, राजेश वाटाळे, सुरेश शेंडे, भारत उगले, राजेश उगले, धर्मपाल जगराळे, चंदु खेडकर, अतुल काळे, मोहन गवई, अजु पठाण, रवी जंवजाळ,नंदु काळे, दीपक भोगांळे, अनिकेत वसु, प्रफुल नवघरे, सागर घनसांडे, सालेम शहा, बबलु माहोरे, विनोद डोळस, मनोज तसरे, भास्कर सासुतकर आदीचा सहभाग होता.