शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पंर एसटीमध्येच प्रहारचा ठिय्या

By admin | Updated: May 29, 2014 01:33 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या बसची दुरावस्था पाहता प्रवाशांचे अक्षरश: बेहाल होत आहे.

अमरावती : राज्य परिवहन महामंडळाच्या बसची दुरावस्था पाहता प्रवाशांचे अक्षरश: बेहाल होत आहे. ही व्यवस्था सुधारण्याकरिता प्रहार संघटनेने लढा उभारला असून याकरिता बुधवारी वलगाव येथील पेढीनदीवर पंर झालेल्या एसटीमध्येच ठिय्या मांडून एसटी महामंडळाला वेठीस धरले. त्यामुळे ऑगस्ट महिन्यापर्यंत सर्व सोईसुविधा पुरविण्याचे आश्‍वासन महामंडळाने प्रहार कार्यकर्त्याना दिल्यावरच आंदोलन मागे घेण्यात आले.

राज्य परिवहन महामंडळात एसटी वाहनाची दुरवस्था पाहता अनेक अडचणीचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. एसटीची अवस्था बघता प्रवाशांना जीव धोक्यात टाकून प्रवास करावा लागत आहे. भंगार एसटीमधूनच गेल्या कित्येक दिवसांपासून महामंडळ आपली वेळ मारुन नेत प्रवाशांच्या सोईसुविधांकडे दुर्लक्ष केले जात आहे. भंगार अवस्थेतील काही एसटींना खिडकी अथवा काचा नाहीत. काही एसटीमध्ये खुच्र्या सुस्थितीत नाहीत. चालक, वाहकांची कमतरता असतानाही नियुक्त्या केल्या जात नाहीत, अश्या समस्यामुळे प्रवासी कटांळले आहे. परतवाडा व चादुरबाजार आगारात एसटी बसेसचा दर्जा सुधारणे, रिक्त पदे भरणे व काही मार्गावर फेर्‍या वाढविणे अश्या मागण्या प्रहारने केल्या होत्या.

ऑगस्ट अखेरपर्यंत कारवाई करण्याचे आश्‍वासन

अमरावती : या मागणीकरिता प्रहार संघटनेने २७ मे पासून डेरा आंदोलन करण्याची भूमिका दर्शविली होती. या पार्शभुमीवर बुधवारी अांदोलनाच्या तयारीत असणार्‍या प्रहार कार्यकर्त्याना वलगाव येथील पेढी नदीच्या पुलावर शेगाव-बम्हपुरी ही एसटी बंद अवस्थेत दिसली.

ही एसटी पंर झाली होती तसेच त्यामध्ये चाक बदलविण्यासाठी दुसरी स्टेपनी एसटीमध्ये नसल्याचे प्रहार कार्यकर्त्यांना दिसून आले. त्यामुळे प्रहार सघंटनेनेचे संस्थापक बच्चू कडू व जिल्हा प्रमुख छोटु महाराज वसु यांनी त्या बंद एसटीमध्येच ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. एसटीमधील सर्व प्रवाश्याना प्रहार कार्यकर्त्यानी स्वत:च्या वाहनावर बसवून अमरावती बसस्थानकापर्यंत पोहचविण्यात आले. दुपारी १२ वाजता भर उन्हात एसटीमध्ये ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले. प्रहार कार्यकर्त्यानी एसटीवर चढून घोषणाबाजी करीत प्रहारचे झेंडे फडकाविले. महामडळांच्या भोंगळ कारभारावर घोषणाबाजी करीत प्रहार कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरु ठेवले होते.त्यामुळे वलगाव मार्गावरील वाहतुक ठप्प झाली होती. या आंदोलनाची भनक महाराष्ट्र राज्य मार्ग परीवहन महामंडळाच्या अधिकार्‍यांना लागताच प्रादेशिक व्यवस्थापक,प्रादेशिक अभियंता, विभाग नियंत्रक व यंत्र अभियंता यांनी आंदोलनस्थळी भेट देवून बच्चु कडु यांच्याशी चर्चा केली.यावेळी बच्चू कडू यांनी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक वि.ना. मोरे यांच्याशी मोबाईलवर संपर्क करुन आपल्या मागण्या पुर्तेतेकरिता आश्‍वासन मागितले. तब्बल ४ वाजेपर्यंत हे ठिय्या आंदोलन पेढीनदीच्या पुलावर सुरुच होते. यादरम्यान महामंडळाच्या अधिकार्‍यांनी ठिय्या आंदोलन स्थळावर भेट देवून बच्चु कडु यांच्याशी चर्चा केली. जुन महिन्यातील विधीमंडळाच्या अधिवेशनात घेण्यात येणार्‍या बैठकीत आपल्याशी चर्चा करण्यात येईल असे आश्‍वासन बच्चु क़डु यांना देण्यात आले.त्यावेळी चादुरबाजार व परतवाडा आगारातील काही समस्या सुधारण्याचे आश्‍वासन अधिकार्‍यांनी दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात प्रहारचे धीरज जयस्वाल, मंगेश देशमुख, शंभु मालठाणे, गजानन भुगुल, जोगेंद्र मोहोड, राजेश वाटाळे, सुरेश शेंडे, भारत उगले, राजेश उगले, धर्मपाल जगराळे, चंदु खेडकर, अतुल काळे, मोहन गवई, अजु पठाण, रवी जंवजाळ,नंदु काळे, दीपक भोगांळे, अनिकेत वसु, प्रफुल नवघरे, सागर घनसांडे, सालेम शहा, बबलु माहोरे, विनोद डोळस, मनोज तसरे, भास्कर सासुतकर आदीचा सहभाग होता.