विमा कंपन्यांकडून होणारी शेतकऱ्यांची लूट थांबवा
By Admin | Updated: September 1, 2016 00:21 IST2016-09-01T00:21:42+5:302016-09-01T00:21:42+5:30
तालुक्यात यंदा झालेली अतिवृष्टी व अंखड आठवडाभर बरसलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी हानी झाली.

विमा कंपन्यांकडून होणारी शेतकऱ्यांची लूट थांबवा
मागणी : दर्यापूर काँग्रेस कमिटीचे निवेदन
दर्यापूर : तालुक्यात यंदा झालेली अतिवृष्टी व अंखड आठवडाभर बरसलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी हानी झाली. सततच्या पावसामुळे जमीन देखील खरडून गेली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला असला तरी विमा कंपन्यांनी संपर्कासाठी दिलेल्या भ्रमणध्वनीवर कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. विमा कंपन्यांनी चालविलेली शेतकऱ्यांची लूट तातडीने थांबवावी, अशी मागणी स्थानिक काँग्रेस कमिटीने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
सततच्या पावसामुळे तालुक्यातील शेती खरडून गेली आहे. परिणामी शेतात साचलेल्या पाण्यामुळे कपाशी व मूगाचे पीक जळून गेले आहे. शासन निर्देशांनसार शेतकऱ्यांनी ६०ते ६२ कोटी रूपयांचा खरीप विमा काढला आहे.शासनाच्या नियम व अटींनुसार नुकसान झाल्यापासून दोन दिवसांमध्ये याबाबतचा अहवाल किंवा माहिती कंपनीला कळविणे अनिवार्य आहे. परंतु यासाठी बाधित शेतकऱ्यांनी कंपनीसोबतस संपर्क केला असला विमा कंपनीकडून दिलेला भ्रमणध्वनीक्रमांकांवर कोणताच प्रतिसाद मिळत नाही. कृषी अधिकारी कार्यालयाकडूनही उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. यामुळे शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची ही हानी थांबविण्याची मागणी काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर भारसाकळे, सुनील गावंडे, सरचिटणीस अभिजित देवके, शशांक धर्माळे, अमोल धर्माळे, गुडड्डू गावंडे, विलास टाले, रामभाऊ साखरे, पप्पू होले, सुभाष गावंडे, बबन देशमुख आदींनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)