शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

राज्याच्या वनविभागाला आता स्वतंत्र ध्वज; सैन्यदल, सीबीआय, पोलिस यांच्यानंतर मिळाला बहुमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 20:21 IST

देशात ३३ टक्के वनाच्छादित क्षेत्र निर्माण करण्यासाठी वनविभागाचा महत्त्वाचा रोल आहे.

- गणेश वासनिक

अमरावती : देशाचे तीनही सैन्यदल, सीबीआय व पोलीस विभागानंतर राज्याच्या वनविभागाला स्वतंत्र ध्वज मिळणार आहे. त्यामुळे वनविभागाची नवी ओळख निर्माण होणार आहे. वनविभाग वने आणि वन्यजिवांचे संरक्षण करण्यासह पर्यावरण आणि जैवविविधता अबाधित ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

देशात ३३ टक्के वनाच्छादित क्षेत्र निर्माण करण्यासाठी वनविभागाचा महत्त्वाचा रोल आहे. याशिवाय पर्यटनक्षेत्रातही कमालीची कामगिरी बजावत आहे. जंगलाचे वैभव संपन्न ठेवण्यासाठी वनाधिकारी, वनकर्मचारी मोलाची भूमिका बजावतात. स्वतंत्र ध्वज मिळणार असल्याने वनविभागाच्या शिरपेचात मानाच तुरा खोवला आहे.

हिरव्या, लाल रंगाचा आहे ध्वज

वनविभागाचा ध्वज हा हिरव्या, लाल रंगाचा आहे. यात राजमुद्रा आणि वनविभागाचे ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ हे ब्रीद वाक्य अंकित आहे. १९८८ च्या राष्ट्रीय वननीतीमध्ये हिरवा रंग हा ‘सिम्बॉल’ वनविभागाला प्राप्त झाला. लाल रंग म्हणजे ‘धरती माता’. या धरतीमुळेच सर्व जण श्वास घेतात. ध्वजात ‘रिफ्लेक्ट’ रंग हा गोल्डन असून, वने, पाणी, हवा, वन्यजिवांचे संरक्षण या सोनेरी कामगिरीसाठी हा रंग ठेवण्यात आला आहे.

डीएफओ ते पीसीसीएफ यांच्या वाहनांवर असेल ध्वज

उपवनसंरक्षक (डीएफओ) ते प्रधान मुख्य वनसंरक्षक (पीसीसीएफ) या आयएफएस अधिकाऱ्यांच्या वाहनांवर ध्वज लावण्यात येणार आहे. शासकीय कार्यालयात देशाचा तिरंगा आणि वनविभागाचा ध्वज असे दोन्ही लावण्यात येतील. वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना कार्यालयात टेबलवर हा ध्वज लावण्याची मुभा असणार आहे.वनविभागाला आता स्वतंत्र ध्वजामुळे नवी ओळख मिळणार आहे. ड्रेस कोड, कॅडरबेस, शिस्तीचा हा विभाग आहे. स्वतंत्र ध्वज असावा, यासाठी सातत्याने प्रयत्न केले. लवकरच या ध्वजाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात येईल.- संजय राठोड, वनमंत्री, महाराष्ट्र.

टॅग्स :forest departmentवनविभागforestजंगलMaharashtraमहाराष्ट्रAmravatiअमरावती