शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू ; अध्यापनाला पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:33 IST

कोरोनाची धास्ती कायम, पालकांकडून ‘नो रिस्क’, शाळांमध्ये लसीनंतर गर्दी वाढण्याचे संकेत अमरावती : शासन निर्णयानुसार नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा ...

कोरोनाची धास्ती कायम, पालकांकडून ‘नो रिस्क’, शाळांमध्ये लसीनंतर गर्दी वाढण्याचे संकेत

अमरावती : शासन निर्णयानुसार नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू झाल्या आहे. मात्र, सोमवारी ९ दिवसानंतरही शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वाढ झालेली नाही. कोरोना नियमावलींचे पालन करीत शिक्षकांची अध्यापनाची तयारी आहे. तथापि, पालकांकडून ‘नो रिस्क’ म्हणत ऑफलाईन अभ्यासक्रमाला नकारघंटा कायम आहे.

जिल्ह्यात नववी ते बारावी या वर्गाची ५४८ शाळा व कनिष्ठ महाविद्यालये सुरू झाल्याची नोंद शिक्षण विभागाकडे आहे. शाळांमध्ये इंग्रजी, गणित व विज्ञान विषयांच्या ऑफलाईन अध्यापनाला प्राधान्य दिले जात आहे. दिवसाआड वर्ग शिकवणी होत असल्यामुळे शाळांमध्ये कोरोना नियमावलींचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेण्यात येत आहे. शहरी व ग्रामीण भागात शाळांमध्ये शिक्षकांची उपस्थिती असली तरी विद्यार्थ्यांचा अध्यापनाला प्रतिसाद नाही, हे वास्तव आहे. शाळेच्या प्रवेशद्धारावरच सॅनिटायझर, स्क्रिनिंग तपासणी, हॅन्डवॉश अशा वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. वर्गात फिजिकल डिस्टन्स पाळत जात आहे. मात्र, पालकांच्या मनात कोराेनाची धास्ती कायम असल्याने तूर्त मुलांना शाळा नको, अशी भावना आहे. नववी ते बारावीपर्यंतच्या एकूण ५४८ शाळांमध्ये १ लाख ५५ हजार विद्यार्थी असून, विद्यार्थ्यांची उपस्थिती १० टक्क्यांपेक्षा अधिक नाही, हे चित्र आहे.

------------------------

कोरोना नियमावलींचे पालन करुन शाळा सुरू करण्यात आली. मात्र. अद्याप पालकांचा ऑफलाईन अभ्यासक्रमाला फारसा प्रतिसाद नाही. पालकांकडून संमतीपत्राला नकार असून, कोरोनाची धास्ती कायम आहे.

- के.बी. इंगळे, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद मुलींची शाळा.

--------------------

शाळांमध्ये वर्ग शिकवणीतून लवकर अभ्यासक्रम लक्षात येतो. घरी शाळेचे वातावरण मिळत नाही, हे खरे आहे. ऑफलाईन अभ्यासक्रमातून चांगल्या पदध्तीने ज्ञानार्जन होत आहे. शिक्षकांचे उत्तम मार्गदर्शन मिळत आहे.

- कोमल थोरात, विद्यार्थिनी.