शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

श्रीनिवास रेड्डींचा अखेर तात्पुरत्या कारागृहात १४ दिवस मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2021 23:24 IST

न्यायालयाच्या आदेशानुसार श्रीनिवास रेड्डी यांना शनिवार, १ मे रोजी उशिरा सायंकाळी येथील कारागृहात आणण्यात आले. तत्पूर्वी त्यांची कोविड चाचणी करून निगेटिव्ह अहवाल असल्याबाबतचे प्रमाणपत्र पोलिसांनी कारागृह प्रशासनाला दिले. कोविड नियमांनुसार कारागृहात येणाऱ्या प्रत्येक बंदीजनांना किमान १४ दिवस तात्पुरत्या कारागृहात क्वारंटाईन ठेवावे लागते. रेड्डी यांनाही अंध विद्यालयात क्वारंटाईन ठेवले आहे.

ठळक मुद्देव्हीआयपी लवाजामा संपला, सामान्य कैद्यासारखी वागणूक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बहुचर्चित दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी अटकेतील आरोपी निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना अखेर १४ दिवस तात्पुरत्या कारागृहात मुक्काम करावा लागणार आहे. धारणी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी मुकुंद गाडे यांच्या नायालयाने १ मे रोजी रेड्डींना १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत रेड्डी हे मध्यवर्ती कारागृहाच्या नियंत्रणात राहणार आहेत.न्यायालयाच्या आदेशानुसार श्रीनिवास रेड्डी यांना शनिवार, १ मे रोजी उशिरा सायंकाळी येथील कारागृहात आणण्यात आले. तत्पूर्वी त्यांची कोविड चाचणी करून निगेटिव्ह अहवाल असल्याबाबतचे प्रमाणपत्र पोलिसांनी कारागृह प्रशासनाला दिले. कोविड नियमांनुसार कारागृहात येणाऱ्या प्रत्येक बंदीजनांना किमान १४ दिवस तात्पुरत्या कारागृहात क्वारंटाईन ठेवावे लागते. रेड्डी यांनाही अंध विद्यालयात क्वारंटाईन ठेवले आहे. तात्पुरत्या कारागृहात १४ दिवसांचा कालावधी झाल्यानंतर पुन्हा कोविड चाचणी करून मध्यवर्ती कारागृहात पाठविण्याची नियमावली आहे. परंतु, मेळघाट व्याघ्रचे क्षेत्र संचालकपदी कार्यरत असताना रेड्डी यांचा रूतबा, दरारा काही औरच होता. त्यांचा आदेश हा वनाधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी शिरसावध असायचा. मात्र, दीपाली प्रकरणात रेड्डी यांना २९ एप्रिल रोजी पहाटे ६ वाजता अटक करून धारणी पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यानुसार रेड्डी यांचे दोन दिवस धारणी पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्येच गेले. मात्र, पोलीस कोठडी संपताच न्यायालयाने १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली व रेड्डी यांची थेट कारागृहात रवानगी झाली. येथील अंध विद्यालयात साकारण्यात आलेल्या तात्पुरत्या कारागृहात शनिवारी सायंकाळी  रेड्डींना आणले. सामान्य कैद्यासारखे राहावे लागणार आहे. जेवण, पाणी हे स्वत:च्या हाताने घ्यावे लागेल. आता ‘ना नाेकर, ना चाकर’ केवळ कैदी म्हणून येथे बंदिस्त आहेत. सूर्योदय ते सूर्यास्त दिनचर्या ही रेड्डींना अन्य बंदीजनांसारखी घालवावी लागत आहे.  

शरीरावरील खुणा, डाग, जन्मत: वर्ण तपासलेन्यायालयाच्या आदेशानुसार धारणी पोलिसांनी श्रीनिवास रेड्डींना येथील अंध विद्यालयात साकारलेल्या तात्पुरत्या कारागृहात बंदीजन म्हणून आणले. कारागृहाचे शिपाई, हवालदार यांनी न्यायालयीन आदेश बघितल्यानंतर रेड्डींची कारागृहाच्या रेकॉर्डवर आराेपी म्हणून नोंद केली. त्यानंतर त्यांच्या शरीरावरील खुणा, डाग, जन्मत: असलेले वर्ण आदींंची बारकाईने तपासणी करताना तशा नोंदी घेतल्या. त्यानंतर जेवणासाठी ॲल्युमिनियमचे ताट आणि पाणी पिण्यासाठी ग्लास देण्यात आले. सामान्य कैद्यासारखे रविवारी रांगेत उभे राहून सकाळचे जेवणदेखील रेड्डींनी घेतले, अशी माहिती जेल सूत्रांकडून मिळाली.

कारागृहात आराेपी म्हणून येणारी प्रत्येक व्यक्ती ही आमच्यासाठी समान असते. मग ती राजकीय असो, अधिकारी असाे, वा व्हीआयपी त्यांना कैदी म्हणून समान वागणूक दिली जाते. श्रीनिवास रेड्डी यांना शनिवारी सायंकाळी उशिरा आणले गेले. अंध विद्यालयात तात्पुरत्या कारागृहात सामान्य कैद्यांमध्ये ठेवण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने तेथे सीसीटीव्ही कॅमेेरे बसविले आहेत. - रमेश कांबळे, अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह अमरावती

 

टॅग्स :Deepali chavanदीपाली चव्हाणforest departmentवनविभाग