शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

विद्यापीठात दुष्काळ शुल्कमाफी प्रक्रियेला वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 18:05 IST

प्रवेशित विद्यार्थ्यांच्या यादीची चाचपणी : परीक्षा विभागाकडून प्राचार्यांना पत्र

अमरावती : राज्यात उद्भवलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर शासनाने दुष्काळग्रस्त भागासाठी विविध सवलती जाहीर केल्या आहेत. त्याअनुषंगाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्कदेखील माफ करण्याचे धोरण लागू केले आहे. उच्च व शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफी देण्यासंदर्भात कार्यवाही आरंभली आहे. प्राचार्यांना पत्र पाठवून दुष्काळग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत कळविले आहे.

२३ आॅक्टोबर २०१८ रोजी शासनाने खरीप हंगामातील ट्रीगर- २ लागू झालेल्या १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करून काही सवलती लागू केल्या आहेत. यात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी ही सवलत समाविष्ट केली आहे. यात विद्यापीठे, तंत्रशिक्षण मंडळ आदींमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीची सवलत मिळणार आहे. त्यानुसार अमरावती विद्यापीठाने महसूल व वनविभागाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी देण्याकरिता युद्धस्तरावर कार्यवाही चालविली आहे. किंबुहना शासन निर्णयापूर्वी परीक्षा शुल्क आकारले असल्यास ती रक्कम परत करण्यासाठीची कार्यवाही महाविद्यालयांना करावी लागणार आहे. अमरावती विद्यापीठाने तालुकानिहाय महाविद्यालयांना पत्र पाठवून विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीदेणेबाबत अवगत केले आहे. परीक्षा शुल्कमाफीचा लाभ किती विद्यार्थ्यांनी घेतला, ही आकडेवारी महाविद्यालयातून मागविली जाणार आहे. अमरावती विद्यापीठांतर्गत पाचही जिल्ह्यांत पाच लाखांचावर प्रवेशित विद्यार्थीसंख्या असून, दुष्काळसदृश तालुक्यांना याचा लाभ मिळेल, हे विशेष.

२८ तालुक्यांतील विद्यार्थ्यांना मिळणार लाभ अमरावती विद्यापीठांतर्गत पाचही जिल्ह्यांत जाहीर झालेल्या २८ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीचा लाभ मिळणार आहे. यात अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, चिखलदरा, मोर्शी, वरूड व अंजनगाव सूर्जी, बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव, लोणार, नांदुरा, संग्रामपूर, शेगाव, मलकापूर, मोताळा व सिंदखेड राजा, अकोला जिल्ह्यातील अकोला, बाळापूर, बार्शी टाकळी, मूर्तिजापूर, तेल्हारा, यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव, दारव्हा, कळंब, केळापूर, महागाव, मारेगाव, राळेगाव, उमरखेड व यवतमाळ तर वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यांचा समावेश आहे.

 

उच्च व शिक्षण सहसंचालकांकडून प्राप्त पत्रांचा आधार घेत दुष्काळग्रस्त भागातील प्रवेशित विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केले जाणार आहे. प्राचार्यांना तशा सूचना पत्राद्वारे देण्यात आल्या असून, खरीप हंगामातील दुष्काळसदृश तालुक्यांतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.- हेमंत देशमुख,संचालक, परीक्षा व मूल्यांकन विभाग

टॅग्स :droughtदुष्काळ