शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात दुष्काळ शुल्कमाफी प्रक्रियेला वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 18:05 IST

प्रवेशित विद्यार्थ्यांच्या यादीची चाचपणी : परीक्षा विभागाकडून प्राचार्यांना पत्र

अमरावती : राज्यात उद्भवलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर शासनाने दुष्काळग्रस्त भागासाठी विविध सवलती जाहीर केल्या आहेत. त्याअनुषंगाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्कदेखील माफ करण्याचे धोरण लागू केले आहे. उच्च व शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफी देण्यासंदर्भात कार्यवाही आरंभली आहे. प्राचार्यांना पत्र पाठवून दुष्काळग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत कळविले आहे.

२३ आॅक्टोबर २०१८ रोजी शासनाने खरीप हंगामातील ट्रीगर- २ लागू झालेल्या १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करून काही सवलती लागू केल्या आहेत. यात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी ही सवलत समाविष्ट केली आहे. यात विद्यापीठे, तंत्रशिक्षण मंडळ आदींमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीची सवलत मिळणार आहे. त्यानुसार अमरावती विद्यापीठाने महसूल व वनविभागाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी देण्याकरिता युद्धस्तरावर कार्यवाही चालविली आहे. किंबुहना शासन निर्णयापूर्वी परीक्षा शुल्क आकारले असल्यास ती रक्कम परत करण्यासाठीची कार्यवाही महाविद्यालयांना करावी लागणार आहे. अमरावती विद्यापीठाने तालुकानिहाय महाविद्यालयांना पत्र पाठवून विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीदेणेबाबत अवगत केले आहे. परीक्षा शुल्कमाफीचा लाभ किती विद्यार्थ्यांनी घेतला, ही आकडेवारी महाविद्यालयातून मागविली जाणार आहे. अमरावती विद्यापीठांतर्गत पाचही जिल्ह्यांत पाच लाखांचावर प्रवेशित विद्यार्थीसंख्या असून, दुष्काळसदृश तालुक्यांना याचा लाभ मिळेल, हे विशेष.

२८ तालुक्यांतील विद्यार्थ्यांना मिळणार लाभ अमरावती विद्यापीठांतर्गत पाचही जिल्ह्यांत जाहीर झालेल्या २८ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीचा लाभ मिळणार आहे. यात अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, चिखलदरा, मोर्शी, वरूड व अंजनगाव सूर्जी, बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव, लोणार, नांदुरा, संग्रामपूर, शेगाव, मलकापूर, मोताळा व सिंदखेड राजा, अकोला जिल्ह्यातील अकोला, बाळापूर, बार्शी टाकळी, मूर्तिजापूर, तेल्हारा, यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव, दारव्हा, कळंब, केळापूर, महागाव, मारेगाव, राळेगाव, उमरखेड व यवतमाळ तर वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यांचा समावेश आहे.

 

उच्च व शिक्षण सहसंचालकांकडून प्राप्त पत्रांचा आधार घेत दुष्काळग्रस्त भागातील प्रवेशित विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केले जाणार आहे. प्राचार्यांना तशा सूचना पत्राद्वारे देण्यात आल्या असून, खरीप हंगामातील दुष्काळसदृश तालुक्यांतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.- हेमंत देशमुख,संचालक, परीक्षा व मूल्यांकन विभाग

टॅग्स :droughtदुष्काळ