सोयाबीनचे दर आवाक्याबाहेर
By Admin | Updated: June 11, 2014 22:59 IST2014-06-11T22:59:02+5:302014-06-11T22:59:02+5:30
खरीप २०१४ हंगाम सुरु होण्याअगोदरच सोयाबीन बियान्याच्या किंमतीमध्ये हजार रुपयापर्यंत वाढ झाली आहे. काळाबाजारात यापेक्षा दुप्पट दरात विक्री होत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत बियाणे कंपन्यांनी मोठ्या

सोयाबीनचे दर आवाक्याबाहेर
रोहिणीचा दगा, मृगात प्रतीक्षा : आर्थिक विवंचनेत शेतकरी
गजानन मोहोड - अमरावती
खरीप २०१४ हंगाम सुरु होण्याअगोदरच सोयाबीन बियान्याच्या किंमतीमध्ये हजार रुपयापर्यंत वाढ झाली आहे. काळाबाजारात यापेक्षा दुप्पट दरात विक्री होत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत बियाणे कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात भाववाढ केल्याने बाजारातील
सोयाबीन विकत घेणे शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर आहे. रोहिणी नक्षत्र पूर्णत: कोरडे गेले. त्यामुळे शेतकऱ्याला मृगात पावसाची प्रतीक्षा, वाढलेले भाव, शेतकऱ्यांची आर्थिक विवंचना यामुळे बियाणे बाजारातील वर्दळ मंदावली आहे.
परतीच्या पावसामुळे मागील वर्षीचे सोयाबीन खराब झाले. या सोयाबीनची उगवणशक्ती कमी झाली, बियाणे कंपन्याचे प्लॉट देखील खराब झाले. प्रमाणीकरणात ५० टक्क््यावर बियाणे नापास झाले. महाबीजसह अन्य कंपन्यांचा सोयाबीन पुरवठा कमी झाला.
महाराष्ट्राला सर्वाधिक सोयाबीनचा पुरवठा करणाऱ्या मध्यप्रदेशातील सोयाबीनदेखील पावसाने खराब झाल्याने सोयाबीनचा पुरवठा करण्यावर विपरीत परिणाम झाला. शेतकऱ्यांजवळील सोयाबीन संपले. बाजारात सोयाबीन उपलब्ध नाही हे हेरुन सोयाबीन
बियाणे उत्पादक कंपन्याद्वारा ‘अव्वाच्या सव्वा’ दराने बियाणे विक्री करण्यात येत आहे.
३५ किलोची राहणार बॅग
केंद्र सरकारने महाबीजला ६० ते ६९ टक्के उगवणशक्तीचे बियाणे विकण्याची परवानगी दिली आहे. या दर्जानुसार फक्त २ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध होत आहेत. या उगवणशक्तीच्या बियाण्याची बॅग ३२०५ किलो व यापेक्षा ५ टक्के उगवणशक्ती कमी
असलेल्या बियाण्याची बॅग ३५ किलोची राहणार आहे. मात्र किंमत ही ३० किलोची राहणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांची बैठक वांझोटी
जिल्ह्यात सोयाबीन बियाणे टंचाईचे सावटाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी २८ एप्रिल २०१४ रोजी सोयाबीन उत्पादक कंपन्यांची बैठक घेऊन उत्पादित बियाणे जिल्ह्यातच विकण्याचे आदेश या कंपन्यांना दिलेत. किमान १५ ते २०
हजार क्विंटल बियाणे उपलब्ध होऊ शकेल. प्रत्यक्षात या अन्य जिल्ह्यातदेखील सर्रास विक्री होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची बैठक वांझोटीच ठरली.