शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

सोयाबीन आले काढणीला, पावसाचा धोका पिकाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 4:13 AM

फोटो - ओ २५ राजुरा (दोन कॉलम घेणे) फोटो कॅप्शन - ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनची गंजी वाळवण्याऐवजी शेतकरी बांधून ठेवत ...

फोटो - ओ २५ राजुरा (दोन कॉलम घेणे)

फोटो कॅप्शन - ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनची गंजी वाळवण्याऐवजी शेतकरी बांधून ठेवत आहेत. (छाया - सतीश बहुरूपी, राजुरा बाजार)

काढलेल्या सोयाबीनला कोंब फुटण्याची शक्यता, काही ठिकाणी सोंगणीलाही प्रारंभ झालेला नाही

अमरावती : जिल्हाभरात कुठे मुसळधार, तर कुठे रिमझिम पाऊस सातत्याने कोसळत आहे. ऑक्टोबर जवळ येत असतानाही पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. आता तर विजांच्या कडकडाटासह तो कोसळत आहे. त्यामुळे कापणीला आलेले सोयाबीन काढायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे.

१० हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाल्याने हर्षभरित झालेल्या शेतकऱ्यांना सोयाबीन काढणीची प्रतीक्षा लागली होती. शेंगाचे दाणे भरून हे पीक काढणीला आलेले असताना आता कापणी करून घेतल्यास हे पीक पावसाच्या माराने कुजणार किंवा शेतात तसेच उभे ठेवल्यास दाण्यांना कोंब फुटतील, अशी कुचंबणा शेतकऱ्यांपुढे आहे. या कालावधीत १० हजारांवर गेलेले दर चार हजारांवर स्थिरावले आहेत.

दरम्यान, रविवारी जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. अचलपूर तालुक्यात शुक्रवारी दुपारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अचलपूर नगरपालिका क्षेत्रातही धो-धो पाऊस कोसळला. मल्हारा, गौरखेडा धोतरखेडा, पथरोट, जवलापूर, भिलोनासह तालुक्यातील अन्य ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. अनेकांचे. सोयाबीन भिजले. सातत्याने कोसळत असलेल्या पावसामुळे कपाशीची बोंड सडायला सुरुवात झाली आहे. संत्रा पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. दर्यापूर तालुक्यात गुरुवारी व शुक्रवारीदेखील सुमारे दोन तास पाऊस कोसळला. याशिवाय तिवस्यात अर्धा तास, अचलपूर तालुक्यात दीड तास, अंजनगाव सुर्जी तालुक्यात तासभर पाऊस कोसळला. वरूड तालुक्यात राजुरा बाजारसह परिसरात अचानक काळेकुट्ट ढग दाटून १०-१५ मिनिटे जोरदार सरी कोसळल्या. धामणगाव रेल्वे तालुक्यात विजांच्या कडकडाटासह दमदार पावसाने हजेरी लावली. तळेगाव दशासर, कावली वसाड व अंजनसिंगी परिसरातही पाऊस कोसळला. चांदूर बाजार तालुक्यातही अर्धा तास पाऊस झाला. चांदूर रेल्वे तालुक्यात ढगाळ वातावरण होेते. मुसळधार पाऊस कोसळेल, अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, तुरळक सरी कोसळून पाऊस बंद झाला. धारणी तालुक्यातही पावसाचे वातावरण कायम आहे. सोयाबीन सवंगणीची कामे सुरू असताना पाऊस व्यत्यय आणत आहे. शेतजमीन ओली झाल्याने मजुरांना सवंगणी अर्ध्यावर टाकून परतावे लागत आहे. त्यासोबतच उघड्यावर टाकलेल्या सोयाबीनच्या गंजी गोळा करून ती झाकण्याची कसरत शेतकऱ्यांना करावी लागत आहे.