शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
6
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
7
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
8
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
9
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
10
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
11
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
12
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
13
भारतासाठी T20I मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ फिरकीपटू!
14
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
15
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
16
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
17
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
18
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
19
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी

सोयाबीनला फुटले ‘कोंब’

By admin | Updated: October 5, 2015 00:27 IST

अपुऱ्या पावसामुळे संकटात सापडलेल्या मेळघाटातील आदिवासी शेतकऱ्यांवर नवीन अरीष्ट कोसळले आहे.

मेळघाटातील आदिवासींसमोर दुहेरी संकट : तालुका कृषी विभाग झोपेतचिखलदरा : अपुऱ्या पावसामुळे संकटात सापडलेल्या मेळघाटातील आदिवासी शेतकऱ्यांवर नवीन अरीष्ट कोसळले आहे. शेतात सोयाबीनला कोंब फुटल्याने शेतकरी हवालदील झाले असून कृषी विभाग मात्र झोपेचे सोंग घेऊन असल्याचे संतापजनक चित्र आहे. चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ-चुरणी परिसरात जवळपास ३५० हेक्टर शेतजमीनीवर आदिवासींनी सोयाबीनची पेरणी केली होती. हे सोयाबीन पीक कापणीला आले असताना उभ्या पिकातील सोयाबीन शेंगामध्ये दाण्यांना अचानक कोंब फुटू लागले आहे. पूर्वीच कमी प्रमाणात पाऊ स झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट पूर्णत: कोलमडले आहेत. अशात सोयाबीनला कोंब फुटू लागल्याने संकट ओढावले आहे.कोंबामुळे घटकाटकुंभ परिसरातील सोयाबीनला कोंब फुटू लागल्याने एकूण उत्पन्नात घट होणार आहे. त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांना त्याचा चांगलाच आर्थिक फटका बसणार आहे. या परिस्थितीतसुध्दा आता घाबरलेल्या शेतकऱ्यांनी कापणीला सुरुवात केली असल्याचे काटकुंभ येथील गणेश राठोड, सुधीर मालवीय, शे. इसराईल, राम नोने, चिकाट, सद्दू सुबाजी बेठके, शालीकराम कास्देकरसह आदी शेतकऱ्यांनी सांगितले. काटकुंभ परिसरातील कायलारी पाचडोंगरी, कन्हेरी, तोरणवाडी, बामदेही, कोरडीसह आदी गावांना याची झळ पोहचली. या कोंबामुळे नुकसान होणार असून भरपाई देण्याची मागणी युवक काँग्रेसचे पीयूश मालवीय, राहुल येवलेंसह आदिंनी केली आहे. काटकुंभ परिसरात सोयाबीन शेंगातील दाण्यांना कोंब फुटल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. त्यासंदर्भात कृषी तज्ज्ञांसोबत चर्चा करून त्यांना परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी बोलावण्यात येणार आहे.- गणेश माझेवार, प्रभारी तालुका कृषी अधिकारी चिखलदरा.चार महिन्यांपूर्वी पेरणी झाली आहे. पीक कापणीला आल्याने असा प्रकार होऊ शकतो. आपण सोमवारी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करू व नंतर कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन शेतकऱ्यांना उपाययोजना सांगू.- संजय ठाकरे, मंडळ अधिकारी, काटकुंभ.परिसरातील सोयाबीन पीक धोक्यात आले असताना कृषी विभागाचा हलगर्जीपणा व कुठलेय मार्गदर्शन नसल्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.- गणेश राठोड, शेतकरी, काटकुंभ.कृषी विभागाचे दुर्लक्षया संपूर्ण प्रकाराबद्दल कृषी विभागाचे अधिकारी पूर्णत: अनभिज्ञ असल्याचे आढळून आले. खुद्द शेतकरी गणेश राठोड यांनी परिसरात सोयाबीन पिकाला कोंब फुटत असल्याची माहिती दिल्यावर येण्याचे सौजन्यसुध्दा दाखविण्यात आले नाही. तीन दिवसांपासून प्रभारी तालुका कृषी अधिकारी गणेश माझेवार, कृषी अधिकारी ठाकरे फिरकलेच नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.