शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

मनाईहुकूम झुगारून खासदारांची मेळघाटात ‘पेरणी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 23:03 IST

खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी दिवसभर मेळघाटातील २० पेक्षा अधिक गावांचा दौरा केला. व्याघ्र प्रकल्पाच्या संबंधित आदिवासींच्या सर्व अडचणी ऐकून जागेवरच सोडविण्याचा प्रयत्न केला. यात सेमाडोह येथे गुरांच्या चराईचा प्रश्न तात्काळ निकाली काढण्याचे आदेश उपस्थित वनाधिकाऱ्यांना दिले.

ठळक मुद्दे२० गावांचा दौरा : आदिवासींच्या समस्या ‘आॅन दी स्पॉट’ सोडविल्या

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी दिवसभर मेळघाटातील २० पेक्षा अधिक गावांचा दौरा केला. व्याघ्र प्रकल्पाच्या संबंधित आदिवासींच्या सर्व अडचणी ऐकून जागेवरच सोडविण्याचा प्रयत्न केला. यात सेमाडोह येथे गुरांच्या चराईचा प्रश्न तात्काळ निकाली काढण्याचे आदेश उपस्थित वनाधिकाऱ्यांना दिले. तेथीलच व्याघ्र प्रकल्पाने मनाई केलेल्या जमिनीवर पेरणी केली. मनाईहुकूम झुगारून खासदारांनी पेरणी केल्याने आदिवासी शेतकऱ्यांना बळ मिळाले. कावडाझिरी येथील वाघाच्या हल्ल्यात जखमी मुलीला सव्वा लाख रुपयांचा धनादेश दिला.खासदार नवनीत राणा सोमवारी वन, व्याघ्र प्रकल्पांसह महसूल आणि संबंधित विभागाच्या अधिकाºयांना घेऊन धारणी व चिखलदरा तालुक्यातील विविध गावांत पोहोचल्या. वन आणि अन्य प्रकल्पासंदर्भात आदिवासींनी त्यांच्या समस्या राणा यांच्यासमोर मांडल्या. मांडल्या. आदिवासींसाठी अडचण ठरणाऱ्या समस्या निकाली काढण्यासाठी दिल्ली येथे वरिष्ठ अधिकाºयांची बैठकीत आवाज उचलण्याची ग्वाही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. आदिवासी गावांचे पुनर्वसन करण्यात आले. दहा लाख रुपये घ्या आणि कुठेही जा, या कायद्यातून आदिवासींचे जीवनमान कसे उंचावणार, असा सवाल त्यांनी केला. सेमाडोह येथील आदिवासींना तब्बल सात किलोमीटर दूर अंतरावर चराईसाठी जंगल देण्यात आले. इतक्या दूर अंतरावर चराई शक्य नाही, असे बजावत त्यांना लगतच चराईची सुविधा देण्याचे निेर्देश नवनीत राणा यांनी दिले.धनादेश वाटपगत आठवड्यात वाघिणीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या संगीता राधेश्याम दावर या आठ वर्षीय चिमुकलीला सव्वा लक्ष रुपयांचा धनादेश देण्यात आला. तेलंगणा येथील एका कंपनीत विद्युत धक्कयाने मरण पावलेल्या अचलपूर तालुक्यातील काळविट गावातील दिनेश संतू चाकोने (१९) यांच्या परिवाराला दोन लाख रुपये मदत रोख स्वरुपात दिली.राणा आणि वाघिणीचे सात किलोमीटर अंतरब्रह्मपुरी येथून डोलार जंगलात सोडण्यात आलेल्या वाघिणीची दहशत परिसरात आहे. नवनीत राणा यांनी दौरा केला. तेव्हा ई-वन वाघीण केवळ सात किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती होती. त्यामुळे वनाधिकाऱ्यांची चांगली धावपळ झाली. सदर वाघिणीला ट्रॅप करण्यासाठी व्याघ्र प्रकल्पाने प्रयत्न सुरू केल्याचे सांगण्यात आले.व्याघ्र आणि वन विभागासंदर्भात आदिवासींच्या समस्या निकाली काढण्यात येणार आहेत. काहींवर तोडगा काढण्यात आला. वाघिणीला ट्रॅप करण्यासाठी पाच दिवसापासून संबंधित विभाग कार्यरत आहे. दिल्ली येथे एक बैठक लावून उर्वरित समस्या निकाली काढण्यात येईल.- नवनीत राणाखासदार, अमरावती