आठवड्यात दोन टक्के क्षेत्रात खरिपाची पेरणी

By Admin | Updated: July 24, 2015 00:14 IST2015-07-24T00:14:58+5:302015-07-24T00:14:58+5:30

या आठवड्याला १९ जुलैपासून पावसाला सुरुवात झाली असली तरी दमदार पाऊस नसल्यामुळे २२ जुलैअखेर केवळ १.९० टक्केच क्षेत्रात पेरणी झाली आहे.

Sowing of Kharipi in two percent area of ​​the week | आठवड्यात दोन टक्के क्षेत्रात खरिपाची पेरणी

आठवड्यात दोन टक्के क्षेत्रात खरिपाची पेरणी

खरीप २०१५ : उशिरा पाऊस, पेरणीमुळे सरासरी उत्पन्नात येणार घट
अमरावती : या आठवड्याला १९ जुलैपासून पावसाला सुरुवात झाली असली तरी दमदार पाऊस नसल्यामुळे २२ जुलैअखेर केवळ १.९० टक्केच क्षेत्रात पेरणी झाली आहे. ही ८४.३१ टक्केवारी आहे. मागील आठवड्यात १५ जुलैअखेर ८२.४१ टक्के पेरणी झाली होती. जिल्ह्यात सर्वाधिक ९६ टक्के पेरणी दर्यापूर व भातकुली तालुक्यात झाली आहे. यंदाच्या हंगामात उशिरा पाऊस व त्यामुळे उशिरा झालेली पेरणी यामुळे सोयाबीनच्या सरासरी उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात खरिपाचे ७ लाख १४ हजार ९५० हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी ६ लाख २ हजार ७९० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक २ लाख ८९ हजार ८१५ हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झाली आहे. १ लाख ६९ हजार ३१८ हेक्टर क्षेत्रात कापसाची पेरणी झाली आहे. ९० हजार ९७६ हेक्टर तुरीचे क्षेत्र आहे.
धारणी तालुक्यात ४२ हजार ३१६ हेक्टर, चिखलदरा २२ हजार ५३८ हेक्टर, अमरावती ४८ हजार १०५, भातकुली ४७ हजार ३९९ हेक्टर, नांदगाव खंडेश्वर ५३ हजार १९२ हेक्टर, चांदूररेल्वे ३५ हजार ६७१ हेक्टर, तिवसा ३७ हजार ४०९ हेक्टर, मोर्शी ५१ हजार ९५ हेक्टर, वरूड ४३ हजार ४११ हेक्टर, दर्यापूर ५९ हजार ५८८ हेक्टर, अंजनगाव सुर्जी ३६ हजार ४१२ हेक्टर, अचलपूर ३८ हजार ७९४ हेक्टर, चांदूरबाजार ३९ हजार ५३४ हेक्टर, धामणगाव रेल्वे ४७ हजार ३२६ हेक्टर, अशी एकूण ६ लाख २ हजार ७९० हेक्टर क्षेत्रामध्ये पेरणी झालेली आहे.

Web Title: Sowing of Kharipi in two percent area of ​​the week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.