शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

सोफियाची वाहतूक शेतकऱ्यांचा कर्दनकाळ

By admin | Updated: December 13, 2014 00:39 IST

शेतकऱ्यांसाठी ‘वरदान’ असा गाजावाजा करणारी इंडिया बुल्स कंपनी आता शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरत आहे.

नांदगाव पेठ : शेतकऱ्यांसाठी ‘वरदान’ असा गाजावाजा करणारी इंडिया बुल्स कंपनी आता शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. रेल्वे लाईनसाठी सुरू झालेल्या कामाकरिता होणाऱ्या सोफियाच्या वाहतुकीने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जात आहे. मात्र, कंपनीने याबाबत काहीच दखल न घेतल्याने पीडित शेतकऱ्यांनी गुरुवारी नांदगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.सोफिया ऊर्जा प्रकल्पासाठी रेल्वे लाईनचे काम सध्या युध्दस्तरावर सुरू आहे. वलगाव, टाकळी, नांदुरा, खानापूर, कठोरा येथील शेतकऱ्यांच्या शेतामधून रेल्वेमार्ग गेला आहे. या रेल्वे मार्गाची जमीन सोफिया कंपनीने अधिग्रहीत केली. मात्र आजूबाजूची शेती सोफियाच्या भरधाव मालवाहू वाहनांच्या धुळीमुळे नष्ट होत आहे. धूळ बसलेल्या पिकांची वाढ होत नाही. पर्यायाने ती कोमेजून जात आहे. नैसर्गिक आपत्तीत आधीच शेतकरी हवालदील झाला आहे. त्यात सोफियाची ही मनमानी त्यांच्या तोंडाजवळ आलेला घास हिरावून घेत आहे.टाकळी व नांदुरा परिसरातील मौजे खानापूर शेतसर्वे ५७/४, ५७/१, ५८/२, ५२/२, ६१/२, १०१/२, ११६/२, असे शेतशिवारातील पीडित शेतकऱ्यांची शेती आहे. शेतीजवळूनच विनापरवानगी सोफियाने कच्चा रस्ता काढला. शेतीतून रस्ता असल्याने कोणतीही वाहतूक झाली तरी केवळ धूळच उडते व ती शेतमालावर येऊन बसते. जीवाचे रान करुन शेतीत सोने पिकवले आणि या सोन्यावर सोफियाने घाण करुन टाकली आहे. पर्यायाने तोंडाजवळ आलेले पीक उद्ध्दस्त होत असल्याचे पाहूनही दखल न घेतल्यामुळे अन्यायग्रस्त शेतकरी रामराव सोनवणे, किशोर आवारे, मारोतराव तायडे, संजय काटे, अविनाश वाळेकर, अनिल सावरकर, रामकृष्ण श्रावण हाडोळे, संजय राऊत, गजानन बोबडे, रघुनाथ सावरकर आदींनी नांदगाव पेठ पोलीस ठाणे गाठून सोफिया कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात तक्रार केली आहे. (वार्ताहर)