शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

सोफियाची वाहतूक शेतकऱ्यांचा कर्दनकाळ

By admin | Updated: December 13, 2014 00:39 IST

शेतकऱ्यांसाठी ‘वरदान’ असा गाजावाजा करणारी इंडिया बुल्स कंपनी आता शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरत आहे.

नांदगाव पेठ : शेतकऱ्यांसाठी ‘वरदान’ असा गाजावाजा करणारी इंडिया बुल्स कंपनी आता शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. रेल्वे लाईनसाठी सुरू झालेल्या कामाकरिता होणाऱ्या सोफियाच्या वाहतुकीने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जात आहे. मात्र, कंपनीने याबाबत काहीच दखल न घेतल्याने पीडित शेतकऱ्यांनी गुरुवारी नांदगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.सोफिया ऊर्जा प्रकल्पासाठी रेल्वे लाईनचे काम सध्या युध्दस्तरावर सुरू आहे. वलगाव, टाकळी, नांदुरा, खानापूर, कठोरा येथील शेतकऱ्यांच्या शेतामधून रेल्वेमार्ग गेला आहे. या रेल्वे मार्गाची जमीन सोफिया कंपनीने अधिग्रहीत केली. मात्र आजूबाजूची शेती सोफियाच्या भरधाव मालवाहू वाहनांच्या धुळीमुळे नष्ट होत आहे. धूळ बसलेल्या पिकांची वाढ होत नाही. पर्यायाने ती कोमेजून जात आहे. नैसर्गिक आपत्तीत आधीच शेतकरी हवालदील झाला आहे. त्यात सोफियाची ही मनमानी त्यांच्या तोंडाजवळ आलेला घास हिरावून घेत आहे.टाकळी व नांदुरा परिसरातील मौजे खानापूर शेतसर्वे ५७/४, ५७/१, ५८/२, ५२/२, ६१/२, १०१/२, ११६/२, असे शेतशिवारातील पीडित शेतकऱ्यांची शेती आहे. शेतीजवळूनच विनापरवानगी सोफियाने कच्चा रस्ता काढला. शेतीतून रस्ता असल्याने कोणतीही वाहतूक झाली तरी केवळ धूळच उडते व ती शेतमालावर येऊन बसते. जीवाचे रान करुन शेतीत सोने पिकवले आणि या सोन्यावर सोफियाने घाण करुन टाकली आहे. पर्यायाने तोंडाजवळ आलेले पीक उद्ध्दस्त होत असल्याचे पाहूनही दखल न घेतल्यामुळे अन्यायग्रस्त शेतकरी रामराव सोनवणे, किशोर आवारे, मारोतराव तायडे, संजय काटे, अविनाश वाळेकर, अनिल सावरकर, रामकृष्ण श्रावण हाडोळे, संजय राऊत, गजानन बोबडे, रघुनाथ सावरकर आदींनी नांदगाव पेठ पोलीस ठाणे गाठून सोफिया कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात तक्रार केली आहे. (वार्ताहर)