शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

बँकेत सोशल डिस्टन्सची ऐसीतैशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2020 5:00 AM

बारा दिवसांपासून संपूर्ण राज्यासह देशभरात कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने 'लॉकडाऊन' घोषित केले आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण व्यापारी केंद्रे बंद आहे. तरीही नागरिकांना आपल्या जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी पैशांची गरज भासते, यासाठी त्यांना बँकांचा आधार घ्यावा लागतो. निराधार, गरीब लोकांच्या खात्यात शासनाकडून जमा झालेला पैसा तसेच पेन्शनर यांचा महिन्याचा पगार अगदी वेळेत त्यांच्या बँक खात्यात जमा होतो.

ठळक मुद्देव्यवस्थापन झोपेत । जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला खो

लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता सोशल डिस्टन्स हा एक महत्त्वाचा उपाय असल्याने संपूर्ण देशात त्याला अंवलब होत आहे. अंजनगांव सूर्जी शहरात मात्र स्टेट बँक, सेंट्रल बँकेत 'सोशल डिस्टन्स'चे नागरिकाना पडल्याने धोका टाळण्याच्या दृष्टीने येथे नियम कठोर करणे गरजेचे आहे.बारा दिवसांपासून संपूर्ण राज्यासह देशभरात कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने 'लॉकडाऊन' घोषित केले आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण व्यापारी केंद्रे बंद आहे. तरीही नागरिकांना आपल्या जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी पैशांची गरज भासते, यासाठी त्यांना बँकांचा आधार घ्यावा लागतो. निराधार, गरीब लोकांच्या खात्यात शासनाकडून जमा झालेला पैसा तसेच पेन्शनर यांचा महिन्याचा पगार अगदी वेळेत त्यांच्या बँक खात्यात जमा होतो. त्यासाठी त्यांना बँकेत येणे गरजेचे असते. अंजनगाव सूर्जी शहरात स्टेट बँक व महाराष्ट्र बँक या दोन्ही बँका जवळ-जवळ असल्याने सकाळीच काही निराधारांची गर्दी बँक परिसरात वाढत आहे. त्यातही स्टेट बँकेत व सेंट्रल बँकेत शनिवारी ग्राहकांची मोठी रांग लागली. ती पहील्या माळ्यावरून खालपर्यंत होती. रांगेत कुठेही अंतर नसून एक दुसऱ्यांना अगदी जवळ ऊभे रहावे लागल्याने एखाद्या व्यक्तीस संसर्ग असल्यास विस्फोटक परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यासाठी पोलीस प्रशासनाने या बाबीकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.बँक कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोकामहाराष्ट्र बँक आणि स्टेट बँक यांची परिस्थिती जवळपास सारखीच आहे. नागरिकांना अजूनही कोरोना व्हायरसचे गांभीर्य लक्षात येत नसल्याने बँक कर्मचाऱ्यांच्यासुद्धा जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन्ही बँक ग्राहकांची गर्दी वाढल्याने पोलीस प्रशासनाचा सहकार्य का घेत नाही, असा प्रश्न जनतेत चर्चिला जात आहे. स्टेट बँकेच्या व सेंट्रल बँकेच्या व्यवस्थापकांनी ग्राहकांची प्रचंड गर्दी वाढल्याचे दिसत असताना आवश्यक त्या उपायोजना करण्याची गरज होती. परंतु सदर अधिकाºयांनी ही बाब गंभीरतेने का घेतली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :bankबँक