शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

सोशल अलर्ट; खबरदार, अफवा पसरवाल तर..! शहर पोलीस सतर्क

By प्रदीप भाकरे | Updated: June 8, 2023 12:44 IST

सोशल पोस्टवर सायबर वॉच

अमरावती : कोल्हापूर येथे झालेल्या घटनेच्या अनुषंगाने काही समाज कंटक हे हेतुपुरस्पर त्या घटनेच्या अनुषंगाने सोशल मिडीयावर खोटया अफवा प्रसारित करुन जातीय, धार्मिक तणाव निर्माण करुन येथील जातीय सलोखा नाहीसा करुन शहरातील शांतता भंग करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या पार्श्वभूमिवर शहर पोलिसांनी सोशल अलर्ट जाहिर केला आहे.

पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेडडी यांनी अमरावतीकरांनी खोटया अफवांवर विश्वास ठेऊ नये, अे आवाहन केले आहे. कुणीही कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणारे, शांतता भंग करणारे किंवा दोन धर्मामध्ये तेढ पसविणारे आक्षेपार्ह मॅसेज, इमेजेस, व्हीडिओज अपलोड करू नयेत. घटनेची व माहितीची शहानिशा न करता ते व्हॉट्सअप, फेसबुक, ट्वीटर, इन्स्टाग्राम व इतर सोशल मिडीया माध्यमांवर पोस्ट अथवा प्रसारित करणे, त्याला लाईक किंवा शेअर करणे अशा अफवेवर विवादीत टिप्पणी किंवा कमेंट्स करणे अशा बेकायदेशिर कृती करु नये, असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.

तर कठोर कार्यवाही

अशा कोणत्याही पोस्टमुळे दोन व्यक्ति, समाज, धर्म, पंथ अशांच्या भावना दुखावुन समाजात तणाव निर्माण होऊन कोणतीही अनुचित घटना घडल्यास ती पोस्ट करणा-या इसमाविरूध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४०, भारतीय दंड संहिता कलम ५०५, १५३ (अ), २९५(अ) व इतर कलमांप्रमाणे कठोर कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल.

ग्रुप ॲडमिनलाही समज

सोशल मिडीयावरील कार्यान्वीत ग्रुप ॲडमिन व अकाउंट धारकांना देखील त्यासंबंधाने महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ६८ प्रमाणे समज देण्यात आली आहे. अमरावतीकरांनी शहरामध्ये शांतता व सामाजिक सलोखा राखण्यासाठी पोलीस दलास सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAmravatiअमरावती