शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

सोशल अलर्ट; खबरदार, अफवा पसरवाल तर..! शहर पोलीस सतर्क

By प्रदीप भाकरे | Updated: June 8, 2023 12:44 IST

सोशल पोस्टवर सायबर वॉच

अमरावती : कोल्हापूर येथे झालेल्या घटनेच्या अनुषंगाने काही समाज कंटक हे हेतुपुरस्पर त्या घटनेच्या अनुषंगाने सोशल मिडीयावर खोटया अफवा प्रसारित करुन जातीय, धार्मिक तणाव निर्माण करुन येथील जातीय सलोखा नाहीसा करुन शहरातील शांतता भंग करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या पार्श्वभूमिवर शहर पोलिसांनी सोशल अलर्ट जाहिर केला आहे.

पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेडडी यांनी अमरावतीकरांनी खोटया अफवांवर विश्वास ठेऊ नये, अे आवाहन केले आहे. कुणीही कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणारे, शांतता भंग करणारे किंवा दोन धर्मामध्ये तेढ पसविणारे आक्षेपार्ह मॅसेज, इमेजेस, व्हीडिओज अपलोड करू नयेत. घटनेची व माहितीची शहानिशा न करता ते व्हॉट्सअप, फेसबुक, ट्वीटर, इन्स्टाग्राम व इतर सोशल मिडीया माध्यमांवर पोस्ट अथवा प्रसारित करणे, त्याला लाईक किंवा शेअर करणे अशा अफवेवर विवादीत टिप्पणी किंवा कमेंट्स करणे अशा बेकायदेशिर कृती करु नये, असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.

तर कठोर कार्यवाही

अशा कोणत्याही पोस्टमुळे दोन व्यक्ति, समाज, धर्म, पंथ अशांच्या भावना दुखावुन समाजात तणाव निर्माण होऊन कोणतीही अनुचित घटना घडल्यास ती पोस्ट करणा-या इसमाविरूध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४०, भारतीय दंड संहिता कलम ५०५, १५३ (अ), २९५(अ) व इतर कलमांप्रमाणे कठोर कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल.

ग्रुप ॲडमिनलाही समज

सोशल मिडीयावरील कार्यान्वीत ग्रुप ॲडमिन व अकाउंट धारकांना देखील त्यासंबंधाने महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ६८ प्रमाणे समज देण्यात आली आहे. अमरावतीकरांनी शहरामध्ये शांतता व सामाजिक सलोखा राखण्यासाठी पोलीस दलास सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAmravatiअमरावती