शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

- तर बगाजी सागर धरणात जलसमाधी घेऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 05:00 IST

वरूड बगाजी येथील १० ते १२ शेतकऱ्यांची २० ते २५ एकर जमीन येरली शिवारात येते. निम्नवर्धा प्रकल्पाने सन २०१३ मध्ये येथे पुलाचे बांधकाम करताना उतार भाग सोडून टेकडीवर पूल बांधला. त्यामुळे या पुलातून पाणी न जाता या भागातील शेतकºयांच्या शेतात दरवर्षी पावसाचे पाणी साचत आहे. दरवर्षी येथील शेतकरी आशेने पेरणी करतात. मात्र पाण्यामुळे उगविलेले पीक सडते. बांधलेल्या पुलावर आजपर्यंत अनेक वेळा खर्च करून बिल काढण्यात आले.

ठळक मुद्देसात वर्षांपासून शेतात पाणी : टेकडीवर बांधला पूल, पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडविल्याचाही परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : निम्नवर्धा प्रकल्प कार्यालयाने चुकीच्या ठिकाणी पूल बांधल्यामुळे सात वर्षांपासून शेतात पाणी साचत असल्याने वरूड बगाजी येथील शेतकऱ्यांनी बगाजी सागर धरणातच जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे.वरूड बगाजी येथील १० ते १२ शेतकऱ्यांची २० ते २५ एकर जमीन येरली शिवारात येते. निम्नवर्धा प्रकल्पाने सन २०१३ मध्ये येथे पुलाचे बांधकाम करताना उतार भाग सोडून टेकडीवर पूल बांधला. त्यामुळे या पुलातून पाणी न जाता या भागातील शेतकऱ्यांच्या शेतात दरवर्षी पावसाचे पाणी साचत आहे. दरवर्षी येथील शेतकरी आशेने पेरणी करतात. मात्र पाण्यामुळे उगविलेले पीक सडते. बांधलेल्या पुलावर आजपर्यंत अनेक वेळा खर्च करून बिल काढण्यात आले. मात्र पुलाची अवस्था अद्यापही जैसे थे आहे. याच भागात काही शेतकऱ्यांनी नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडवल्यामुळे अन्य शेतीचे नुकसान होत आहे. या तक्रारीची दखल विभागीय आयुक्तांनी घेतली. मात्र निम्नवर्धा प्रकल्पाने आदेशाची अंमलबजावणी केली नसल्याने शेतकऱ्यांनी बगाजी सागर धरणात जलसमाधी घेण्याचा इशारा ओंकार काष्टे, चंद्रशेखर भनारकर, नामदेव काष्टे, एकनाथ काष्टे, रामाजी पचाकरे, रामदास पचारे, अरविंद धोटे, कैलाश मोहनकर, सदाशिव पचारे, विनोद झोपाटे, उमेश म्हात्रे यांनी दिला.शेतकरी देशोधडीलाउताराला न बांधता, टेकड्यावर बांधण्यात आलेल्या पुलामुळे पाणी शेतात शिरून पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतीचा मोठा भाग हा दरवर्षी नापेर राहतो. शेतकऱ्यांना या भागात उत्पादन तर घेता येत नाहीच, जागा कायमस्वरूपी बाधित होण्याची चिन्हे आहेत. शेतकºयांना प्रकल्प प्रशासन देशोधडीला लावत असल्याचा आरोप होत आहे.निम्न वर्धा प्रकल्प प्रशासनाने टेकडीच्या ठिकाणी पूल बांधला. त्यामुळे माझ्यासह १० शेतकऱ्यांच्या २५-३० एकरांत सात वर्षांपासून पाणी साचत आहे. समस्येवर सात दिवसांत तोडगा काढला नाही, तर आम्ही बगाजी सागर धरणातच जलसमाधी घेऊ.- ओंकार काष्टे, शेतकरी, वरूडया भागातील पुलाची निर्मिती सात वर्षांपूर्वी झाली. विभागीय आयुक्तांच्या आदेशानंतर दुसरा रस्ता काढून देण्याबाबत आम्ही प्रयत्न करीत आहोत.- रवींद्र वऱ्हाडे, कार्यकारी अभियंतानिम्न वर्धा प्रकल्प, वर्धा

टॅग्स :DamधरणFarmerशेतकरी