शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
2
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
3
कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार
4
Tanya Mittal : एका रात्रीत सर्व सोनं, ३ आयफोन विकायची आली वेळ; तान्या मित्तलचा मोठा खुलासा, म्हणाली...
5
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
6
टिंडरवरच्या मैत्रिणीला भेटायला गेला अन् तरुणासोबत मोठा गेम झाला! पोस्ट लिहीत म्हणाला...
7
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
8
आज रात्री किती वाजता दिसणार चंद्रग्रहण, कधी असेल ग्रहणाचा स्पर्श, मध्य आणि मोक्षकाळ, जाणून घ्या  
9
रात्री Wifi बंद करायला हवं का? ९९% लोकांना माहित नाहीत फायदे, समजल्यावर तुम्हीही...
10
मिनेसोटात हेलिकॉप्टरचा भीषण अपघात, एअरपोर्टजवळ 'आर६६' हेलिकॉप्टर जळून खाक; प्रवाशांचा मृत्यू
11
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
12
"पुढच्या वर्षी सुनेला घेऊनच विसर्जनाला येणार...", लेकाच्या लग्नाला आदेश बांदेकरांचा ग्रीन सिग्नल
13
सोने खरेदीचा विचार करताय? थांबा! सोन्याने गाठला नवीन उच्चांक, आठवड्यात ३,९०० रुपयांची वाढ
14
गरिबीचं भीषण वास्तव! खाण्यासाठी पैसे नव्हते, जन्मदात्या आई-वडिलांनी मुलाला ५० हजारांना विकलं
15
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
16
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन
17
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
18
डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड!
19
'अमेरिकेने आपल्यावर ५० % कर लादला, भारताने ७५ % लादावा', केजरीवालांचे केंद्राला आवाहन
20
हृतिक रोशनची ही हीरोईन वयाच्या ३९ व्या वर्षीच बनली होती आजी, एकेकाळी रंगली होती अफेअरची चर्चा

- तर बगाजी सागर धरणात जलसमाधी घेऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 05:00 IST

वरूड बगाजी येथील १० ते १२ शेतकऱ्यांची २० ते २५ एकर जमीन येरली शिवारात येते. निम्नवर्धा प्रकल्पाने सन २०१३ मध्ये येथे पुलाचे बांधकाम करताना उतार भाग सोडून टेकडीवर पूल बांधला. त्यामुळे या पुलातून पाणी न जाता या भागातील शेतकºयांच्या शेतात दरवर्षी पावसाचे पाणी साचत आहे. दरवर्षी येथील शेतकरी आशेने पेरणी करतात. मात्र पाण्यामुळे उगविलेले पीक सडते. बांधलेल्या पुलावर आजपर्यंत अनेक वेळा खर्च करून बिल काढण्यात आले.

ठळक मुद्देसात वर्षांपासून शेतात पाणी : टेकडीवर बांधला पूल, पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडविल्याचाही परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : निम्नवर्धा प्रकल्प कार्यालयाने चुकीच्या ठिकाणी पूल बांधल्यामुळे सात वर्षांपासून शेतात पाणी साचत असल्याने वरूड बगाजी येथील शेतकऱ्यांनी बगाजी सागर धरणातच जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे.वरूड बगाजी येथील १० ते १२ शेतकऱ्यांची २० ते २५ एकर जमीन येरली शिवारात येते. निम्नवर्धा प्रकल्पाने सन २०१३ मध्ये येथे पुलाचे बांधकाम करताना उतार भाग सोडून टेकडीवर पूल बांधला. त्यामुळे या पुलातून पाणी न जाता या भागातील शेतकऱ्यांच्या शेतात दरवर्षी पावसाचे पाणी साचत आहे. दरवर्षी येथील शेतकरी आशेने पेरणी करतात. मात्र पाण्यामुळे उगविलेले पीक सडते. बांधलेल्या पुलावर आजपर्यंत अनेक वेळा खर्च करून बिल काढण्यात आले. मात्र पुलाची अवस्था अद्यापही जैसे थे आहे. याच भागात काही शेतकऱ्यांनी नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडवल्यामुळे अन्य शेतीचे नुकसान होत आहे. या तक्रारीची दखल विभागीय आयुक्तांनी घेतली. मात्र निम्नवर्धा प्रकल्पाने आदेशाची अंमलबजावणी केली नसल्याने शेतकऱ्यांनी बगाजी सागर धरणात जलसमाधी घेण्याचा इशारा ओंकार काष्टे, चंद्रशेखर भनारकर, नामदेव काष्टे, एकनाथ काष्टे, रामाजी पचाकरे, रामदास पचारे, अरविंद धोटे, कैलाश मोहनकर, सदाशिव पचारे, विनोद झोपाटे, उमेश म्हात्रे यांनी दिला.शेतकरी देशोधडीलाउताराला न बांधता, टेकड्यावर बांधण्यात आलेल्या पुलामुळे पाणी शेतात शिरून पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतीचा मोठा भाग हा दरवर्षी नापेर राहतो. शेतकऱ्यांना या भागात उत्पादन तर घेता येत नाहीच, जागा कायमस्वरूपी बाधित होण्याची चिन्हे आहेत. शेतकºयांना प्रकल्प प्रशासन देशोधडीला लावत असल्याचा आरोप होत आहे.निम्न वर्धा प्रकल्प प्रशासनाने टेकडीच्या ठिकाणी पूल बांधला. त्यामुळे माझ्यासह १० शेतकऱ्यांच्या २५-३० एकरांत सात वर्षांपासून पाणी साचत आहे. समस्येवर सात दिवसांत तोडगा काढला नाही, तर आम्ही बगाजी सागर धरणातच जलसमाधी घेऊ.- ओंकार काष्टे, शेतकरी, वरूडया भागातील पुलाची निर्मिती सात वर्षांपूर्वी झाली. विभागीय आयुक्तांच्या आदेशानंतर दुसरा रस्ता काढून देण्याबाबत आम्ही प्रयत्न करीत आहोत.- रवींद्र वऱ्हाडे, कार्यकारी अभियंतानिम्न वर्धा प्रकल्प, वर्धा

टॅग्स :DamधरणFarmerशेतकरी