शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

आदिवासी योजना घोटाळ्यातील दोषींवर एसआयटीची करडी नजर, लवकरच फौजदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 19:28 IST

आदिवासी योजनेत घोटाळा झाल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईसाठी विशेष कार्य पथकाने (एसआयटी) सन २००३ ते ३१ मार्च २००९ या कालावधीत कार्यरत प्रकल्प अधिकाऱ्यांची यादी मागविली आहे.

अमरावती - आदिवासी योजनेत घोटाळा झाल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईसाठी विशेष कार्य पथकाने (एसआयटी) सन २००३ ते ३१ मार्च २००९ या कालावधीत कार्यरत प्रकल्प अधिकाऱ्यांची यादी मागविली आहे. त्यानुसार आदिवासी विकास विभाग कामाला लागला आहे. बुधवार, ११ जुलै रोजी अपर आयुक्त कार्यालयस्तरावर महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.  

माजी न्यायमूर्ती एम.जी.गायकवाड समितीने ‘ट्रायबल’मध्ये सहा हजार कोटींचा घोटाळा झाल्याप्रकरणी एकूण ४७६ दोषींवर गुन्हे दाखल करण्याची शिफारस यापूर्वी राज्य शासनाकडे केली आहे. या घोटाळ्यात कारवाईपासून बचाव करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालय आणि नागपूर खंडपीठात दोन वेगवेगळ्या याचिका सादर करण्यात आल्या आहेत. मात्र, आदिवासी योजनांमध्ये घोटाळेबाज अधिकाऱ्यांची हयगय नको, अशी भूमिका राज्य शासनाने घेतली आहे. त्याअनुषंगाने माजी न्या.गायकवाड समितीच्या शिफारशींची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी निवृत्त आयएएस अधिकारी पी.डी. करंदीकर यांची समिती नेमली आहे. करंदीकर समितीच्या मदतीसाठी ‘एसआयटी’ने आदिवासी विकास विभागाच्या ठाणे, नाशिक, अमरावती व नागपूर अपर आयुक्त कार्यालयस्तरावर सेवानिवृत्त लेखापरीक्षकांची नियुक्ती केली आहे. या अधिकाऱ्यांकडे घोटाळ्यातील दोषींवर पोलिसात फौजदारी दाखल करण्याची जबाबदारी सोपविली आहे. पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी प्रकल्प अधिकारी किंवा सहायक प्रकल्प अधिकारी अशाप्रकारे नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिसात फौजदारी दाखल करताना आदिवासी योजनेत घोटाळेबाज अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई व्हावी, यासाठी एसआयटीचे पथक काम करीत आहे. तर, घोटाळाप्रकरणी चौकशी समितीप्रमुख माजी न्यायमूर्ती गायकवाड यांनी दोषी असलेल्या ४७६ अधिकाऱ्यांची यादी शासनाकडे अहवालाद्वारे सादर केली आहे. त्यामुळे यादीत दोषींची नावे ‘क्रॉस चेकींग’ करण्यासाठी एसआयटीने चारही अपर आयुक्त कार्यालयस्तरावरील प्रकल्पनिहाय सन २००३ ते २००९ या नऊ वर्षाच्या कालावधीत कार्यरत प्रकल्प अधिकारी, लेखाधिकारी आदींची यादी मागविली आहे. त्यानुसार ‘ट्रायबल’ने यादी गोळा करण्याची जोरदार तयारी चालविल्याचे दिसून येते.अकोला प्रकल्पातील दोषींवर लवकरच फौजदारीआदिवासी योजना घोटाळ्यात ४७६ जणांचा समावेश असल्याचे चौकशी समितीने शिक्कामोर्तब केले आहे. यात पहिल्या टप्प्यात चंद्रपूर, गडचिरोली व घोडेगाव (पुणे) येथील चार अधिकाऱ्यांवर पोलिसात फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत. आता दुसऱ्या टप्प्यात अकोला प्रकल्प कार्यालयांतर्गत दोषींवर फौजदारीची तयारी एसआयटीने चालविल्याची माहिती आहे. अकोला येथील प्रभारी प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांच्याकडे दोषींविरुद्ध पोलिसात तक्रार नोंदविण्याची जबाबदारी आहे.

एसआयटीचे मायक्रो प्लॅनिंगआदिवासी योजनेत घोटाळा झाल्याप्रकरणी माजी न्यायमूर्ती एम.जी गायकवाड यांच्या शिफारशीनुसार दोषींवर कठोर कारवाईसाठी विशेष चौकशी पथकाने मायक्रो प्लॅनिंग चालविले आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालय आणि नागपूर खंडपीठात सादर याचिकेच्या निर्णयाकडे एसआयटीचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारCrimeगुन्हा