शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

आदिवासी योजना घोटाळ्यातील दोषींवर एसआयटीची करडी नजर, लवकरच फौजदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 19:28 IST

आदिवासी योजनेत घोटाळा झाल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईसाठी विशेष कार्य पथकाने (एसआयटी) सन २००३ ते ३१ मार्च २००९ या कालावधीत कार्यरत प्रकल्प अधिकाऱ्यांची यादी मागविली आहे.

अमरावती - आदिवासी योजनेत घोटाळा झाल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईसाठी विशेष कार्य पथकाने (एसआयटी) सन २००३ ते ३१ मार्च २००९ या कालावधीत कार्यरत प्रकल्प अधिकाऱ्यांची यादी मागविली आहे. त्यानुसार आदिवासी विकास विभाग कामाला लागला आहे. बुधवार, ११ जुलै रोजी अपर आयुक्त कार्यालयस्तरावर महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.  

माजी न्यायमूर्ती एम.जी.गायकवाड समितीने ‘ट्रायबल’मध्ये सहा हजार कोटींचा घोटाळा झाल्याप्रकरणी एकूण ४७६ दोषींवर गुन्हे दाखल करण्याची शिफारस यापूर्वी राज्य शासनाकडे केली आहे. या घोटाळ्यात कारवाईपासून बचाव करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालय आणि नागपूर खंडपीठात दोन वेगवेगळ्या याचिका सादर करण्यात आल्या आहेत. मात्र, आदिवासी योजनांमध्ये घोटाळेबाज अधिकाऱ्यांची हयगय नको, अशी भूमिका राज्य शासनाने घेतली आहे. त्याअनुषंगाने माजी न्या.गायकवाड समितीच्या शिफारशींची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी निवृत्त आयएएस अधिकारी पी.डी. करंदीकर यांची समिती नेमली आहे. करंदीकर समितीच्या मदतीसाठी ‘एसआयटी’ने आदिवासी विकास विभागाच्या ठाणे, नाशिक, अमरावती व नागपूर अपर आयुक्त कार्यालयस्तरावर सेवानिवृत्त लेखापरीक्षकांची नियुक्ती केली आहे. या अधिकाऱ्यांकडे घोटाळ्यातील दोषींवर पोलिसात फौजदारी दाखल करण्याची जबाबदारी सोपविली आहे. पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी प्रकल्प अधिकारी किंवा सहायक प्रकल्प अधिकारी अशाप्रकारे नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिसात फौजदारी दाखल करताना आदिवासी योजनेत घोटाळेबाज अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई व्हावी, यासाठी एसआयटीचे पथक काम करीत आहे. तर, घोटाळाप्रकरणी चौकशी समितीप्रमुख माजी न्यायमूर्ती गायकवाड यांनी दोषी असलेल्या ४७६ अधिकाऱ्यांची यादी शासनाकडे अहवालाद्वारे सादर केली आहे. त्यामुळे यादीत दोषींची नावे ‘क्रॉस चेकींग’ करण्यासाठी एसआयटीने चारही अपर आयुक्त कार्यालयस्तरावरील प्रकल्पनिहाय सन २००३ ते २००९ या नऊ वर्षाच्या कालावधीत कार्यरत प्रकल्प अधिकारी, लेखाधिकारी आदींची यादी मागविली आहे. त्यानुसार ‘ट्रायबल’ने यादी गोळा करण्याची जोरदार तयारी चालविल्याचे दिसून येते.अकोला प्रकल्पातील दोषींवर लवकरच फौजदारीआदिवासी योजना घोटाळ्यात ४७६ जणांचा समावेश असल्याचे चौकशी समितीने शिक्कामोर्तब केले आहे. यात पहिल्या टप्प्यात चंद्रपूर, गडचिरोली व घोडेगाव (पुणे) येथील चार अधिकाऱ्यांवर पोलिसात फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत. आता दुसऱ्या टप्प्यात अकोला प्रकल्प कार्यालयांतर्गत दोषींवर फौजदारीची तयारी एसआयटीने चालविल्याची माहिती आहे. अकोला येथील प्रभारी प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांच्याकडे दोषींविरुद्ध पोलिसात तक्रार नोंदविण्याची जबाबदारी आहे.

एसआयटीचे मायक्रो प्लॅनिंगआदिवासी योजनेत घोटाळा झाल्याप्रकरणी माजी न्यायमूर्ती एम.जी गायकवाड यांच्या शिफारशीनुसार दोषींवर कठोर कारवाईसाठी विशेष चौकशी पथकाने मायक्रो प्लॅनिंग चालविले आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालय आणि नागपूर खंडपीठात सादर याचिकेच्या निर्णयाकडे एसआयटीचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारCrimeगुन्हा