शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

अमरावतीच्या आरटीओत सन्नाटा, ‘तो’ दलाल पसार, तीन अधिकारी अटकेत

By गणेश वासनिक | Updated: May 3, 2024 22:08 IST

चोरीच्या ट्रकची बनावट कागदपत्रांद्वारे नोंदणी प्रकरण, १६ वाहनांचे चेसीस नंबर बदलण्यात आल्याची माहिती

अमरावती : चाेरीच्या ट्रकची बनावट कागदपत्रांद्वारे नोंदणी करून विक्रीप्रकरणी येथील आरटीओच्या गुडबुकमध्ये असलेला ‘तो’ दलाल पसार झाल्याची विश्वसनीय माहिती आहे. नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अमरावती येथील तीन आरटीओंच्या अधिकाऱ्यांना गुरुवारी अटक केली आहे. आतापर्यंत अमरावती आरटीओत १६ वाहनांचे चेसीस नंबर बदलण्यात आल्याची माहिती आहे. याप्रकरणाशी निगडीत आठ वाहनांचे थेट कनेक्शन असलेला दलाल याचा पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून शोध सुरू आहे.अरुणाचल, उत्तर प्रदेश, नागालँड, दिल्ली आणि हरयाणा आदी ठिकाणी चोरलेल्या वाहनांचे चेसीस नंबर बदलून बनावट कागदपत्रांद्वारे अमरावती, नागपूर येथील आरटीओ अधिकाऱ्यांच्या मदतीने हा गोरखधंदा सुरू होता. विशेष दलालांमार्फत चोरीच्या ट्रकची बनावट कागदपत्रांद्वारे नोंदणी करताना ते ट्रक अमरावती आरटीओत प्रत्यक्षात कधीच हजर राहत नव्हते. मात्र, ॲपवर ऑनलाइन नोंदणी दर्शविली जात होती. त्यामुळे ‘त्या’ दलालांकडून आरटीओ अधिकाऱ्यांना ‘जी फॉर्म’ म्हटले की, डोळेझाक करून हे चोरीचे वाहन नोंदणी केले जात होते. यात आरटीओतील कार्यालयीन कर्मचारी ते आरटीओ अधिकारी अशी साखळी असल्याची माहिती आहे.

...असे उघड झाले अमरावती, नागपूर आरटीओ कनेक्शननवी मुंबई गुन्हे शाखेने ४ मार्च २०२४ रोजी मुंबई येथील ट्रक टर्मिनल परिसरात धाडसत्र राबविले. येेथे संशयास्पद ट्रक क्रमांक एमएच ४० सीएम १५६७ आणि एमएच ४० सीएम ३०९८ या क्रमांकाच्या चारचाकी वाहनांचे चेसीस, इंजीन क्रमांकाची तपासणी केली असता या वाहनांचे मालक कमलेश गोपाल मंगे व नीरव ठक्कर हे असल्याचे पुढे आले. त्यामुळे या दोघांनाही मुंबई येथील बेलापूर पोलिस ठाण्यात चाैकशीसाठी बोलावले असता ही वाहने सचिन नवघणे आणि जावेद मणीयार यांना विकल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पाेलिसांनी टाटा कंपनीच्या तज्ञ्जांकडून या वाहनांची तपासणी केली. ही वाहने बाहेरून टाटा कंपनीची असली तरी या वाहनांचे चेसीस नंबर बदलून बनावट कागदपत्रांद्वारे नोंदणी करण्यात आली, असा धक्कादायक अभिप्राय टाटा कंपनीच्या तज्ञ्जांनी दिला. मुंबई पोलिसांनी दोन महिन्यांच्या तपासानंतर ही वाहने अमरावती, नागपूर आरटीओत नोंदणी झाल्याचे उघडकीस आणले. दरम्यान, नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहा सदस्यीय पथक २४ एप्रिल रोजी नागपूर आरटीओत चौकशीसाठी आल्याची माहिती आहे.

मुंबईत बयानासाठी बोलावले, आरटीओच्या तीन अधिकाऱ्यांना अटकनवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक तपासासाठी नागपूर येथील आरटीओ कार्यालयात १७ एप्रिल रोजी आले होते. याप्रकरणाशी संबंधित अमरावती येथील आरटीओ अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी ३० एप्रिल रोजी बयाण नोंदविण्यासाठी मोटर वाहन निरीक्षक गणेश वरूठे, सहायक परिवहन अधिकारी भाग्यश्री पाटील आणि सहायक मोटर निरीक्षक सिद्धार्थ ठोके यांना बोलावले असता तिघांंनाही मुंबईत अटक केली. 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसAmravatiअमरावती