शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

शासकीय कार्यालयात सन्नाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 6:00 AM

देशासह राज्यात कोरोनाबाधित व संशयितांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्याचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. काही कठोर निर्णय घेण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्य शासनाने राज्यातील शासकीय कार्यालयांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या सुरुवातीला ५० टक्के, त्यानंतर ७५ टक्के आता तर ९५ टक्क्यांनी घटली आहे.

ठळक मुद्देपाच टक्केच उपस्थिती : अभ्यागतांसह नागरिकांना बंदी, सर्वत्र शुकशुकाट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शासकीय कार्यालयांतील अधिकारी- कर्मचाऱ्यांची संख्या ५ टक्क्यांवर आणली. नागरिक आणि अभ्यागतांना कार्यालयात बंदी घातली आहे. त्यामुळे सोमवार, २३ मार्चपासून शासकीय कार्यालयांमध्ये सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे. शासकीय कार्यालयांतील गर्दी ओसरल्याने जिल्हा प्रशासनाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.देशासह राज्यात कोरोनाबाधित व संशयितांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्याचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. काही कठोर निर्णय घेण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्य शासनाने राज्यातील शासकीय कार्यालयांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या सुरुवातीला ५० टक्के, त्यानंतर ७५ टक्के आता तर ९५ टक्क्यांनी घटली आहे. एका दिवसात केवळ ५ टक्के कर्मचारी उपस्थित राहतील, असे नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून पाच टक्के उपस्थितीच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. कार्यालयांमध्ये केवळ ५ टक्के उपस्थिती ठेवण्याबाबत निर्देश जिल्हा प्रशासनाकडून संबंधित अधिकाºयांना देण्यात आले आहे. हे कार्यालयातील महत्त्वाच्या व प्रलंबित कामे पार पाडण्यासाठी रोटेशन पद्धतीने अधिकारी, कर्मचाºयांना उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आली आहे. काही अधिकारी, कर्मचाºयांना 'वर्क फ्रॉम होम'ची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे कार्यालयातील गर्दी कमी झाल्याचे चित्र आहे. दुसरीकडे संपूर्ण राज्यात ३१ मार्चपर्यंत जमाबंदी करण्यात आल्याने शासकीय कार्यालयामध्ये कामानिमित्त येणाºया नागरिकांची संख्या रोडावली आहे. जमावबंदी उठेपर्यंत कोणतेही काम होणार नसल्याने नागरिकांनी घरी थांबणे पसंत केले होते. त्यातच एसटी महामंडळाने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. दरम्यान ३१ मार्चपर्यंत शासकीय कार्यालयांमध्ये ५ टक्के उपस्थिती राहणार आहे. अनावश्यक कामानिमित्त नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसGovernmentसरकार