जिल्हा कचेरीसमोर बूट पॉलीस आंदोलन
By Admin | Updated: May 14, 2014 02:00 IST2014-05-13T23:09:12+5:302014-05-14T02:00:44+5:30
पोलीस विभागातील आजी माजी वैद्यकीय रजेतील मृत पोलीस कर्मचाऱ्यांसह दिवंगत पोलीस, होमगार्डस व पोलीस पाटील यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात होऊन त्यांच्या परिवाराला आत्मसन्मान देण्यात यावा

जिल्हा कचेरीसमोर बूट पॉलीस आंदोलन
अमरावती : पोलीस विभागातील आजी माजी वैद्यकीय रजेतील मृत पोलीस कर्मचार्यांसह दिवंगत पोलीस, होमगार्डस व पोलीस पाटील यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात होऊन त्यांच्या परिवाराला आत्मसन्मान देण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी मंगळवारी जिल्हा कचेरीसमोर आत्मसन्मान चेतना फाउंडेशनच्यावतीने बूट पॉलीस अभियान राबवून शासनाचे लक्ष वेधले. दरम्यान आंदोलन कर्त्यांंच्यावतीने जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांना निवेदन नेण्यात आले आहे.
आत्मसन्मान चेतना फाउंडेशनच्या प्रमुख मागण्यांमध्ये पोलीस विभागातील आजी माजी वैद्यकीय रजेतील मृत पोलीस कर्मचार्यांसह दिवंगत पोलीस, होमगार्ड्स व पोलीस पाटील यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात होऊन त्यांच्या परिवाराला आत्मसन्मान देण्यात यावा तसेच सेवानवृत्त पोलिसांना कुटुंब आरोग्य योजना लागू करावी या मागण्यांसाठी आत्मसन्मान चेतना फाउंडेशनच्या वतीने शासनाकडे लढा सुरू आहे. याच विषयावर लक्ष वेधण्यासाठी यापूर्वीही नागपूर हिवाळी अधिवेशना दरम्यान गुहमंत्री आर. आर. पाटील यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र मागण्यांबाबत शासन स्तरावरून कुठलीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे वरील मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आत्मसन्मान चेतना फाउंडेशनच्या विनयपूर्वक चरण पादुका सेवा (बूट पॉलीस करून अभिनव आंदोलनाने) शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्यामार्फत राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांना पाठविण्यात आले आहे. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माधव कारेगावकर, उपाध्यक्ष सहदेव नेतनराव, सचिव युवराज कराळे, सल्लागार सुधाकर जवंजाळ, सुदाम गवई, संघटक त्र्यंबक कारेगावकर, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)