शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

शिंदे-फडणवीस सरकार अस्थिर; नाना पटोलेंची भाजपवर सडकून टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2022 12:20 IST

कार्यकर्त्यांनी आता खमकेपणाने पुढे यावे, असे आवाहन पटोले यांनी केले. 

अमरावती : राज्यातील एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे सरकार अस्थिर आहे. एकाच मंत्र्यांकडे सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद आहे. यावरून सरकारची अवस्था स्पष्ट होत आहे, असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली.

काँग्रेसचे खासदार व नेते राहुल गांधी सध्या भारत दौऱ्यावर असून ही पदयात्रा लवकरच महाराष्ट्रात पोहोचणार आहे. पदयात्रेच्या पूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी अमरावती येथे आढावा बैठक घेतली. या वेळी त्यांनी बंडखोर शिवसेना नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर टीका केली.

पटोले पुढे बोलताना म्हणाले, राहुल गांधी यांच्या पदयात्रेमुळे आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांना मशिद, मदरशात जावे लागले. यावरून भारत जोडो पदयात्रा यशस्वी झाल्याचे हे द्योतक आहे. भाजपचा आयटी सेल, मोदी मीडियाला उत्तर देण्यासाठी काँग्रेस आता सक्षम होत आहे. कार्यकर्त्यांनी आता खमकेपणाने पुढे यावे, असे आवाहन पटोले यांनी केले. 

या वेळी मंचावर माजी पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर, आ. बळवंत वानखडे, आ. वजाहत मिर्झा, माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, माजी आ. वीरेंद्र जगताप, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, शहराध्यक्ष बबलू शेखावत, किशोर बोरकर, माजी महापौर विलास इंगोले, डॉ. अंजली ठाकरे आदी उपस्थित होते.

लोकसभा, बडनेरा विधानसभा काँग्रेसकडे

लोकसभा, बडनेरा विधासभेच्या जागांवर काँग्रसेचे उमेदवार असतील, मनपा निवडणुकीसाठी शहराचे सर्वेक्षण करून तिकीट वाटप केले जाईल, असे पटोले म्हणाले.

पालकमंत्री की स्पायडरमॅन ?

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्याचे पालकमंत्रिपद आहेत. ते 'स्पायडरमॅन'सारखे काम करणार आहेत का, असा प्रश्नही त्यांनी केला.

टॅग्स :PoliticsराजकारणNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस