शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

शिंदे-फडणवीस सरकार अस्थिर; नाना पटोलेंची भाजपवर सडकून टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2022 12:20 IST

कार्यकर्त्यांनी आता खमकेपणाने पुढे यावे, असे आवाहन पटोले यांनी केले. 

अमरावती : राज्यातील एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे सरकार अस्थिर आहे. एकाच मंत्र्यांकडे सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद आहे. यावरून सरकारची अवस्था स्पष्ट होत आहे, असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली.

काँग्रेसचे खासदार व नेते राहुल गांधी सध्या भारत दौऱ्यावर असून ही पदयात्रा लवकरच महाराष्ट्रात पोहोचणार आहे. पदयात्रेच्या पूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी अमरावती येथे आढावा बैठक घेतली. या वेळी त्यांनी बंडखोर शिवसेना नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर टीका केली.

पटोले पुढे बोलताना म्हणाले, राहुल गांधी यांच्या पदयात्रेमुळे आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांना मशिद, मदरशात जावे लागले. यावरून भारत जोडो पदयात्रा यशस्वी झाल्याचे हे द्योतक आहे. भाजपचा आयटी सेल, मोदी मीडियाला उत्तर देण्यासाठी काँग्रेस आता सक्षम होत आहे. कार्यकर्त्यांनी आता खमकेपणाने पुढे यावे, असे आवाहन पटोले यांनी केले. 

या वेळी मंचावर माजी पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर, आ. बळवंत वानखडे, आ. वजाहत मिर्झा, माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, माजी आ. वीरेंद्र जगताप, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, शहराध्यक्ष बबलू शेखावत, किशोर बोरकर, माजी महापौर विलास इंगोले, डॉ. अंजली ठाकरे आदी उपस्थित होते.

लोकसभा, बडनेरा विधानसभा काँग्रेसकडे

लोकसभा, बडनेरा विधासभेच्या जागांवर काँग्रसेचे उमेदवार असतील, मनपा निवडणुकीसाठी शहराचे सर्वेक्षण करून तिकीट वाटप केले जाईल, असे पटोले म्हणाले.

पालकमंत्री की स्पायडरमॅन ?

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्याचे पालकमंत्रिपद आहेत. ते 'स्पायडरमॅन'सारखे काम करणार आहेत का, असा प्रश्नही त्यांनी केला.

टॅग्स :PoliticsराजकारणNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस