शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
4
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
5
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
6
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
7
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
8
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
9
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
10
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
11
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
12
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
13
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
14
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
15
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
16
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
17
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
18
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
19
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
20
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर

सरसंघचालकांना पाण्यात पाहणारे शरद पवार मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शक कसे?, नाना पटोलेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2017 19:24 IST

मालेगाव बॉम्बस्फोटात सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव गोवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी पोलिसांवर दबाब आणल्याचा धक्कादायक मुद्दा त्या प्रकरणातील आरोपी सुधाकर चतुर्वेदी याने एका मुलाखतीत स्पष्ट केला होता. त्याच पवारांचे कर्जमाफी व समृद्धी महामार्गासाठी मार्गदर्शन घेतल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीच्या सभेत जाहीर केले होते. यावर भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी टीका केली आहे.

अमरावती - मालेगाव बॉम्बस्फोटात सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव गोवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी पोलिसांवर दबाब आणल्याचा धक्कादायक मुद्दा त्या प्रकरणातील आरोपी सुधाकर चतुर्वेदी याने एका मुलाखतीत स्पष्ट केला होता. त्याच पवारांचे कर्जमाफी व समृद्धी महामार्गासाठी मार्गदर्शन घेतल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीच्या सभेत जाहीर केले होते. या एकूणच संशयास्पद प्रकाराबाबत देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खुलासा करावा, अशी मागणी भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी येथे 'लोकमत'शी बोलताना केली.

एका कार्यक्रमानिमित्त शनिवारी नाना पटोले हे अमरावतीत आले असताना त्यांनी भाजपाला हा घरचा अहेर दिला.  सरसंघचालक हे सन्मानाचे पद आहे. अगदी जवाहरलाल नेहरूंपासून श्रीकांत जिचकारांपर्यंत सर्वांनीच वेळोवेळी जाहीर वक्तव्य करून सरसंघचालकांचा गौरव केला आहे. भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता हा स्वयंसेवक असतो. ‘परिवार’ ही पक्षाची संकल्पना आहे. अशा व्यवस्थेत मुख्यमंत्र्यांचे विधान गंभीर आहे. 

अमरावतीच्या सभेत मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीसाठी शरद पवारांचा सल्ला घेतल्याचे सांगितले. आता १२ तारखेला पवार कर्जमाफीविरुद्ध मोर्चा काढताहेत. अमरावतीच्या मंचावरच पवारांनी फसव्या कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांना खडे बोल का सुनावले नाहीत? सरकारला कुणी फसविले, असा माझा मुख्यमंत्र्यांना जाहीर सवाल असल्याचे पटोले म्हणाले. आपण पूर्वीपासूनच ही कर्जमाफी फसवी असल्याचे सांगत आलो आहे. राज्य विचारावर चालायला पाहिजे; येथे तर सगळा संभ्रम आहे. त्यामुळे शेतक-यांच्या फसवणुकीसाठी भागीदारी कुणाची, असा टोला पटोले यांनी शासनाला लगावला.

बॅन असलेली कीटकनाशके राज्यात  कशी ?देशात ९३ कीटकनाशकांवर बॅन असताना राज्यात ती दाखल होतात कशी, विकली जातात कशी,  असा सवाल खा. पटोलेंनी उपस्थित केला. कीटकनाशकांच्या विषबाधेने ३४ शेतक-यांचा मृत्यू झाल्याच्या शासकीय आकडा आहे. प्रत्यक्षात २०० पेक्षा अधिक बळी गेले आहेत. शासननियुक्त ‘एसआयटी’ हादेखील एक फार्स आहे. विषबाधेची चौकशी करणा-या एसआयटीमध्ये या विषयाचा एकही तज्ज्ञ नाही. मृतांच्या वैद्यकीय परीक्षणात कीटकनाशकांचे अंश आढळत नाहीत. हा कुणाला वाचविण्याचा प्रकार आहे, असा सवाल पटोलेंनी केला.

श्वेतपत्रिका काढा, पारदर्शी कारभार दाखवा!राज्यात ९६ लाख शेतकरी कर्जमाफीचे लाभार्थी आहेत. त्यांची ३४ हजार कोटींची कर्जमाफी होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी जाहीर केले. प्रत्यक्षात चार हजार शेतक-यांनाच याचा लाभ मिळाला. कर्जमाफीसाठीचा पैसा जनतेचाच आहे. त्याचा विनियोग त्याच कारणासाठी व्हायला पाहिजे. हा निधी कर्मचा-यांचा पगार किंवा इतर कामासाठी नाही. त्यामुळे शासनाने या पैशांच्या विनियोगाची श्वेतपत्रिका काढावी व पारदर्शी कारभार दाखवावा, असे आवाहन पटोले यांनी केले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाMohan Bhagwatमोहन भागवत