शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

सरसंघचालकांना पाण्यात पाहणारे शरद पवार मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शक कसे?, नाना पटोलेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2017 19:24 IST

मालेगाव बॉम्बस्फोटात सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव गोवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी पोलिसांवर दबाब आणल्याचा धक्कादायक मुद्दा त्या प्रकरणातील आरोपी सुधाकर चतुर्वेदी याने एका मुलाखतीत स्पष्ट केला होता. त्याच पवारांचे कर्जमाफी व समृद्धी महामार्गासाठी मार्गदर्शन घेतल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीच्या सभेत जाहीर केले होते. यावर भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी टीका केली आहे.

अमरावती - मालेगाव बॉम्बस्फोटात सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव गोवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी पोलिसांवर दबाब आणल्याचा धक्कादायक मुद्दा त्या प्रकरणातील आरोपी सुधाकर चतुर्वेदी याने एका मुलाखतीत स्पष्ट केला होता. त्याच पवारांचे कर्जमाफी व समृद्धी महामार्गासाठी मार्गदर्शन घेतल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीच्या सभेत जाहीर केले होते. या एकूणच संशयास्पद प्रकाराबाबत देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खुलासा करावा, अशी मागणी भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी येथे 'लोकमत'शी बोलताना केली.

एका कार्यक्रमानिमित्त शनिवारी नाना पटोले हे अमरावतीत आले असताना त्यांनी भाजपाला हा घरचा अहेर दिला.  सरसंघचालक हे सन्मानाचे पद आहे. अगदी जवाहरलाल नेहरूंपासून श्रीकांत जिचकारांपर्यंत सर्वांनीच वेळोवेळी जाहीर वक्तव्य करून सरसंघचालकांचा गौरव केला आहे. भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता हा स्वयंसेवक असतो. ‘परिवार’ ही पक्षाची संकल्पना आहे. अशा व्यवस्थेत मुख्यमंत्र्यांचे विधान गंभीर आहे. 

अमरावतीच्या सभेत मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीसाठी शरद पवारांचा सल्ला घेतल्याचे सांगितले. आता १२ तारखेला पवार कर्जमाफीविरुद्ध मोर्चा काढताहेत. अमरावतीच्या मंचावरच पवारांनी फसव्या कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांना खडे बोल का सुनावले नाहीत? सरकारला कुणी फसविले, असा माझा मुख्यमंत्र्यांना जाहीर सवाल असल्याचे पटोले म्हणाले. आपण पूर्वीपासूनच ही कर्जमाफी फसवी असल्याचे सांगत आलो आहे. राज्य विचारावर चालायला पाहिजे; येथे तर सगळा संभ्रम आहे. त्यामुळे शेतक-यांच्या फसवणुकीसाठी भागीदारी कुणाची, असा टोला पटोले यांनी शासनाला लगावला.

बॅन असलेली कीटकनाशके राज्यात  कशी ?देशात ९३ कीटकनाशकांवर बॅन असताना राज्यात ती दाखल होतात कशी, विकली जातात कशी,  असा सवाल खा. पटोलेंनी उपस्थित केला. कीटकनाशकांच्या विषबाधेने ३४ शेतक-यांचा मृत्यू झाल्याच्या शासकीय आकडा आहे. प्रत्यक्षात २०० पेक्षा अधिक बळी गेले आहेत. शासननियुक्त ‘एसआयटी’ हादेखील एक फार्स आहे. विषबाधेची चौकशी करणा-या एसआयटीमध्ये या विषयाचा एकही तज्ज्ञ नाही. मृतांच्या वैद्यकीय परीक्षणात कीटकनाशकांचे अंश आढळत नाहीत. हा कुणाला वाचविण्याचा प्रकार आहे, असा सवाल पटोलेंनी केला.

श्वेतपत्रिका काढा, पारदर्शी कारभार दाखवा!राज्यात ९६ लाख शेतकरी कर्जमाफीचे लाभार्थी आहेत. त्यांची ३४ हजार कोटींची कर्जमाफी होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी जाहीर केले. प्रत्यक्षात चार हजार शेतक-यांनाच याचा लाभ मिळाला. कर्जमाफीसाठीचा पैसा जनतेचाच आहे. त्याचा विनियोग त्याच कारणासाठी व्हायला पाहिजे. हा निधी कर्मचा-यांचा पगार किंवा इतर कामासाठी नाही. त्यामुळे शासनाने या पैशांच्या विनियोगाची श्वेतपत्रिका काढावी व पारदर्शी कारभार दाखवावा, असे आवाहन पटोले यांनी केले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाMohan Bhagwatमोहन भागवत