शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
3
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
5
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
6
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
7
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
8
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
9
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
10
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
11
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
12
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
13
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
14
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
15
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
16
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
17
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
18
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
19
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
20
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!

चिखलदऱ्यात पाच वर्षात पाऊणशे पर्यटकांचे अपघाती निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 16:36 IST

विदर्भाचे एकमेव पर्यटनस्थळ चिखलदरा येथे अलीकडच्या काळात विविध पॉइंटवर आत्महत्या आणि अपघातात पर्यटकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. मागील पाच वर्षांत ५० पर्यटकांनी आत्महत्या केल्या, तर जवळपास ७५ अपघाती मृत्यू झाले.

ठळक मुद्देआत्महत्येची पन्नाशी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले सुरक्षेचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनरेंद्र जावरेअमरावती : विदर्भाचे एकमेव पर्यटनस्थळ चिखलदरा येथे अलीकडच्या काळात विविध पॉइंटवर आत्महत्या आणि अपघातात पर्यटकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. मागील पाच वर्षांत ५० पर्यटकांनी आत्महत्या केल्या, तर जवळपास ७५ अपघाती मृत्यू झाले. एकट्या भीमकुंड पॉइंटवरून २० जणांनी उडी घेऊन जीवन संपविले. त्यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपालिकेला सुरक्षा रक्षकांना तैनात करण्याचे आणि सूचनाफलक लावण्याचे आदेश दिले.समुद्र सपाटीपासून ३६०० फूट उंचावर असलेले चिखलदरा पर्यटनस्थळ संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या पर्यटनस्थळाला मध्यप्रदेश, दिल्ली, राजस्थान, गुजरात आदी राज्यांतील पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. आॅगस्ट ते फेब्रुवारी या काळात चिखलदरा पर्यटनस्थळ हिरवेगार असल्याने या काळात पर्यटकांची संख्या सर्वाधिक राहते. गगनचुंबी उंच पहाडावर धो-धो कोसळणाºया धबधब्यांचा मनमोहन नजारा, आल्हाददायक वातावरण येणाऱ्या पर्यटकांना मोहित करणारे ठरते. परिवार आणि मित्रमंडळासोबत आलेले पर्यटक संपूर्ण चिखलदरा पालथा घालतात. दुसरीकडे कौटुंबिक वाद किंवा इतर समस्यांनी ग्रासलेल्यांनी येथील उंच कड्यांवरून स्वत:ला झोकून देऊन आत्महत्या केल्याचा प्रकार बरेचदा उघडकीस आला आहे. काहींनी जंगलात झाडांना गळफास घेऊन तसेच विष प्राशूनसुद्धा आत्महत्या केली. भीमकुंड दरी आणि डोह, सक्कर तलाव, पंचबोल पॉइंट, गाविलगड किल्ल्यातील मच्छी तलाव, पारस तलावात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत.

सर्व पॉइंट व्याघ्र प्रकल्पाच्या अखत्यारीतपूर्वी चिखलदरा नगरपरिषदेच्या अखत्यारीत असलेले सर्व पॉइंट नंतर वनविभाग व आता मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अखत्यारीत आले आहेत. पूर्वीपासूनच या पॉइंटवर दरीच्या काठावर लोखंडी सुरक्षा कठडे आहेत. तथापि, धोकादायक असलेल्या या पॉइंटवर फलक बेपत्ता आहेत, सुरक्षा गार्ड नाहीत. पावसाळा सुरू होताच भीमकुंड, पंचबोल, देवी पॉइंट, गाविलगड, गोराघाट पॉइंट, जत्राडोह येथे पर्यटक गर्दी करीत आहेत. यामुळे तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी चिखलदरा नगरपालिकेला एका पत्राद्वारे दिले.कुठे गेली वनव्यवस्थापन समिती?धोकादायक पॉइंटवर वनविभागाच्यावतीने एक वनरक्षक, एक सुरक्षा रक्षक शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशी तैनात करण्यात येत होते. मात्र, तेही दिसेनासे झाले आहेत. व्याघ्र प्रकल्प अंतर्गत असलेल्या या पॉइंटची संपूर्ण जबाबदारी ग्राम विकास समिती व संयुक्त वनव्यवस्थापन समितीवर आहे. त्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधीसुद्धा दिला जातो. तथापि, त्या निधीतही वनकर्मचाऱ्यांनी अध्यक्षांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणात घोळ केला. परिणामी समितीचे सदस्य येत नसल्याची माहिती आहेभीमकुंड, पंचबोलवर सर्वाधिक आत्महत्याभीमाने कीचकाचा वध केल्यानंतर रक्ताने माखलेले हात ज्या कुंडात धुतले, त्या कुंडाला भीमकुंड असे नाव आहे. एका आवाजाला प्रतिसाद देणारा पंचबोल पॉइंट व इतरही पॉइंटचे अंतर शहरापासून दोन ते पाच किलोमीटर आहे. पॉइंटवर सुट्टीचे दिवस वगळता वर्दळ राहत नाही. या निवांतपणाची संधी साधून भीमकुंड पॉइंटच्या दरीत किमान २०, पंचबोलच्या दरीत १०, इतर ठिकाणी जवळपास ५० पर्यटकांनी आत्महत्या, तर अपघाताने ७५ च्या जवळपास पर्यटकांनी जीव गमावला.पर्यटनस्थळावरील विविध पॉइंटवर शनिवार-रविवारसह सुटीच्या दिवशी सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. सेल्फी फोटो घेताना खबरदार करणारे सुरक्षा फलक लावण्यात आले आहेत. सर्वच पॉइंटवर लोखंडी कठडे आहेत.सूर्यकांत पिदुरकर, मुख्याधिकारी, नगर परिषद, चिखलदरा

टॅग्स :Chikhaldaraचिखलदरा