निवाऱ्यातील सात तरुण पळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 05:00 IST2020-04-17T05:00:00+5:302020-04-17T05:00:33+5:30
दुपारपासूनच पळण्याच्या बेतात होते. त्यांनी आपल्या गावावरून चारचाकी वाहन बोलावले होते. त्यांच्यावर देखरेख ठेवणाऱ्या यंत्रणेतील कर्मचारी झोपी गेल्यानंतर त्यांनी डाव साधला. या घटनेनंतर महसूल यंत्रणेत खळबळ उडाली.

निवाऱ्यातील सात तरुण पळाले
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कंपनी बंद झाल्याने जालना येथे कार्यरत ११ युवक मजूर आपल्या गावी गोंदिया येथे पायी निघाले होते. त्यांना तिवसा येथे ताब्यात घेऊन जिल्हा परिषद शाळेत ठेवण्यात आले होते. ते बुधवारी रात्री ९.४० च्या सुमारास कौल फोडून पसार झाले. येथे निगराणीकरिता असलेल्या पोलिसांना त्यांनी चकमा दिला.
१३ एप्रिल रोजी त्यांना तिवसा तहसील प्रशासनाने येथील जिल्हा परिषद शाळेत ठेवले. तेथेच त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली होती. पैकी सात युवकांनी खोलीवरील कवेलू फोडून पळ काढला. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली. महसूल यंत्रणेने या घटनेची दखल घेतली आहे.
पळून गेलेली मुले शेल्टर होममध्ये क्वारंटाईन नव्हती. एका वाहनात पाचपेक्षा अधिक जणांना प्रवास करता येत नसल्याने त्यांना येथे ठेवण्यात आले होते. परवानगी नंतर त्यांना सोडले असते.
- वैभव फरतारे, तहसीलदार तिवसा
पोलिसांना चकमा
सदर युवक दुपारपासूनच पळण्याच्या बेतात होते. त्यांनी आपल्या गावावरून चारचाकी वाहन बोलावले होते. त्यांच्यावर देखरेख ठेवणाऱ्या यंत्रणेतील कर्मचारी झोपी गेल्यानंतर त्यांनी डाव साधला. या घटनेनंतर महसूल यंत्रणेत खळबळ उडाली.