शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
5
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
6
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
7
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
8
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
9
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
10
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
11
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
12
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
13
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
14
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
15
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
16
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
17
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
18
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
19
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
20
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख

शहरातील सात रस्ते पुन्हा फोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 01:26 IST

कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर झालेले रस्ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महावितरण, भुयारी गटार योजना व रिलायन्स यांनी त्यांच्या उपक्रमासाठी फोडलेत. दुरुस्तीचे तीनतेरा झाले असताना, आता शासनाच्या महानेट प्रकल्पासाठी शहरातील सात रस्ते २८३० मीटरपर्यंत फोडण्यात येणार असल्याने चांगल्या रस्त्यांची पुन्हा वाट लागणार आहे.

ठळक मुद्देतीन किमीची लागणार वाट : एमजीपी, महावितरण, रिलायन्सनंतर महानेट रस्त्यांच्या मुळावर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर झालेले रस्ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महावितरण, भुयारी गटार योजना व रिलायन्स यांनी त्यांच्या उपक्रमासाठी फोडलेत. दुरुस्तीचे तीनतेरा झाले असताना, आता शासनाच्या महानेट प्रकल्पासाठी शहरातील सात रस्ते २८३० मीटरपर्यंत फोडण्यात येणार असल्याने चांगल्या रस्त्यांची पुन्हा वाट लागणार आहे.कित्येक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर शहरातील रस्त्यांना आता कुठे चांगले दिवस आले असताना, पुन्हा दृष्ट लागली आहे. शहराचा विकास करायचा असेल, तर चांगल्या रस्त्यांची वाट लावणे हेच समीकरण अलीकडे अमरावतीच्या वाट्याला आहे. मागील चार वर्षांत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची अमृत योजना, महावितरणद्वारे भूमिगत केबल, रिलायन्स कंपनीचे फायबर आॅप्टिक केबल, भुयारी गटार योजना त्यांनी चांगल्या रस्त्यांचे तीनतेरा वाजविलेत. दुरुस्तीवर महापालिकेने कितपत लक्ष दिले, हा संशोधनाचा विषय आहे. नागरिकांना किमान रस्त्याची तरी सुविधा राहणार की नाही, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. या कामानंतर एकदाचा उसासा नागरिकांनी टाकला नाही तोच पुन्हा महानेट प्रकल्पाच्या फायबर आॅप्टिक केबलसाठी शहरातील सात रस्त्यांची वाट लागणार आहे.जिल्हा मुख्यालय ग्रामीण विभागाला जोडण्यासाठी शासनाचा महत्त्वपूर्ण प्रकल्प असल्याचे सांगत आणि शासकीय अध्यादेशाचा आधार घेत महापालिकेने रस्ते फोडून फायबर आॅप्टिक केबल टाकण्यासाठी सामंजस्य करार करून टाकला. यामध्ये सभागृहाला विश्वासात घेतले गेले नाही. एमओयू कसा आहे, याची माहितीदेखील सभागृहासमोर नीटपणे सांगता आलेली नाही, असा आरोप मंगळवारच्या आमसभेत सदस्यांकडून झालेत. त्यामुळे विकासाच्या नावावर फोडण्यासाठी शहरातील चांगले रस्ते दानातच द्यायचे काय, हा प्रश्न निर्माण झाला आहे. असे जर होत असेल, तर फोडलेले रस्ते पूर्ववत करण्यासाठी महापालिका प्रशासन कितपत गंभीर आहे, याची प्रचिती अमरावतीकरांना या चार वर्षात आलेली आहे.फोडलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे, असे शहर अभियंत्यांनी सभागृहाला सांगितले. विशेष म्हणजे, यावर सदस्यांनीच अविश्वास दाखविला. पूर्वानुभवदेखील तसाच आहे. यापूर्वी डांबरी व काँक्रीट रस्ते फोडल्यानंतर काँक्रीटने बुजविलेत. मात्र, ही बांधकामाची यंत्रणा नसल्यानेच मजुराद्वारे केवळ खड्ड्यांमध्ये काँक्रीट टाकण्याचा प्रकार झाला. त्यावर पाणी कधी टाकण्यातच आलेले नाही. त्यामुळे पुन्हा काँक्रीट उखडून ‘जैसे थे’ परिस्थिती झालेली आहे. याबाबत महापालिकेच्या कोणत्याही अभियंत्याने कधीही जाब विचारल्याचे ऐकीवात नाही.महानेट प्रकल्पासाठी फोडण्यात येणाऱ्या रस्त्यांसाठी तरी महापालिकेने सजग राहून रस्ते पूर्ववत करणे महत्वाचे आहे, अशी भावना शहरवासीयांमध्ये व्याप्त आहे.प्रशासन म्हणते, राज्य शासनाची मुभामहानेट प्रकल्पासाठी राज्य शासनाने भूमिगत केबल टाकण्यासाठी परवानगी देण्यापासून सूट दिली असल्याचे शहर अभियंता रवींद्र पवार यांनी स्पष्ट केले. रस्ते खोदण्याच्या किंवा केबल टाकण्याच्या पाच दिवसाआधी पूर्व महापालिका प्रशासनाला सांगण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या अख्यतारीतील वन विभाग सोडता सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाना लागू असल्याचे जीआरमध्ये स्पष्ट केले असल्याची बाबदेखील शहर अभियंत्यांनी स्पष्ट केली. अमरावती शहरातील रस्ते फोडण्याचे काम स्टरलाईट टेक लि. ही कंपनी करणार आहे.मात्र, रस्ते पूर्ववत केले नाही, तर या कंपनीला कश्या प्रकारे दंडित करणार, ही बाब कुठे आलीच नाही.या रस्त्यांवर होणार खोदकामतहसील कार्यालय ते पशुवैद्यकीय कार्यालयदरम्यान उजव्या बाजूने ७० मीटरपशुवैद्यकीय कार्यालय ते सफील रोडच्या दरम्यान उजव्या बाजूचे १४० मीटरसफील रोड ते टांगा पडाव चौकदरम्याचे अंतरात टाव्या बाजूला २२५ मीटरपशुवैद्यकीय कार्यालय ते प्रभात टॉकीज चौकाचे उजव्या बाजूला ८० मीटरप्रभात टॉकीज चौक ते चित्रा टॉकीज चौकादरम्यान उजव्या बाजूला ८० मीटरइर्विन चौक ते गर्ल्स हायस्कूल दरम्यानचे उजव्या बाजूला १०७० मीटरगर्ल्स हायस्कूल चौक ते बियाणी चौकाचे दरम्यान डाव्या बाजूला १०७५ मीटर

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा