शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पश्चिम विदर्भातील ४६९ लघुप्रकल्पांत सात टक्के पाणीसाठा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 19:37 IST

जलसंपदा विभागाच्या साप्ताहिक अहवालानुसार पश्चिम विदर्भातील ४६९ लघु प्रकल्पांमध्ये फक्त ७.०४ टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने ज्या लघु प्रकल्पांमधून संबंधित गावांना पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्यात येतोे.

अमरावती - जलसंपदा विभागाच्या साप्ताहिक अहवालानुसार पश्चिम विदर्भातील ४६९ लघु प्रकल्पांमध्ये फक्त ७.०४ टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने ज्या लघु प्रकल्पांमधून संबंधित गावांना पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्यात येतोे, त्या शेकडो गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. भविष्यात सदर प्रकल्प पूर्ण भरले नाहीत, तर यंदा सिंचनाची स्थितीसुद्धा बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ४६९ धरणांचा प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा हा ११००.७८ दलघमी आहे. पण, यंदा उन्हाचा पारा ४६ अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याने व पाण्याची मागणीसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात सतत घट झाली असून, उपयुक्त पाणीसाठा हा ७७.५२ दलघमी एवढा आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला होता. यंदा चांगल्या अपेक्षित पावसाची प्रतीक्षा आहे.  २४ मध्यम प्रकल्पांत १७ टक्के पाणीसाठालघु प्रकल्पांसारखीच मध्यम प्रकल्पांचीसुद्धा स्थिती यंदा बिकट आहे. बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार विभागातील २४ मध्यम प्रकल्पांमध्ये फक्त १६.५७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील तीन प्रकल्पांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे, तर दोन प्रकल्पांमध्ये आठ टक्क्यांपेक्षा कमी साठा आहे. अकोला तीन व वाशीम जिल्ह्यातील एका प्रकल्पांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा असल्याने स्थिती बिकट आहे.

टॅग्स :Vidarbhaविदर्भwater scarcityपाणी टंचाई