शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

शहरात सात फिडरचे होणार खासगीकरण

By admin | Updated: April 27, 2015 00:01 IST

वीजचोरी, गळती रोखण्यासाठी राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाने नवे धोरण आखले आहे. ..

वीज गळती रोखणार : वीजचोरी रोखण्यासाठी खासगी व्यवस्थापकअमरावती : वीजचोरी, गळती रोखण्यासाठी राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाने नवे धोरण आखले आहे. त्यानुसार अमरावतीत सात फिडरचे खासगीकरण होणार असून वीजचोरी आणि गळती रोखण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण केली जाणार आहे. नवीन धोरणामुळे वीजचोरट्यांवर अंकुश लावण्याच्या दृष्टीने कठोर स्वरुपाचे गुन्हे नोंदविण्याचे अधिकार बहाल करण्यात आले आहेत.मागील आठवड्यात राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वीजचोरी, गळतीवर उपाययोजना करण्यासाठी वीज पारेषण, वीज वितरण कंपनीच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक बोलविली. थकीत देयकांबाबत यावेळी चिंंता व्यक्त केली. वीजचोरी रोखण्यात ऊर्जा खात्याला फारशे यश मिळाले नसल्याचे शल्यदेखील त्यांनी व्यक्त केले. संपूर्ण राज्यातील वीजचोरी, गळतीच्या अहवालाची आकडेवारी घेत असताना अमरावतीत सात फिडरवरील वीजचोरी आणि गळती रोखण्यात दोन वर्षांपासून अपयश येत असल्याचे ना. बावनकुळे यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे वीजचोरी, गळतीचे धोरण आखताना अमरावती येथील सातही फिडरचे व्यवस्थापनाचे काम खासगी व्यवस्थापनाकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार या सातही फिडरवर सुरू असलेली वीजचोरी, गळती रोखण्याची जबाबदारी शासन खासगी व्यवस्थापनाकडे सोपविणार आहे. या सात फिडरवर नियंत्रणाची जबाबदारी सोपविण्यासाठी निविदा मागविल्या असून तशी जाहिरात देखील प्रसिध्द झाली आहे. बेरोजगार संस्थांना फिडरच्या नियंत्रणाची जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून येथील मुस्लिमबहुल भागात वीज देयकापोटी कोट्यवधी रुपये थकीत आहेत. वारंवार नोटीस अथवा सूचना देऊनही या भागातील ग्राहक देयके अदा करीत नसल्याचे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. काही अधिकाऱ्यांच्या मते शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. कारण वीजचोरी आणि गळती होणाऱ्या भागात कर्तव्य बजावणे धोक्याचे ठरते तर फिडरची जबाबदारी खासगी व्यक्तींकडे सोपविणे म्हणजे कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे विकेंद्रीकरण करण्याचा डाव असल्याची शंका काही अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. शहराच्या पश्चिमेकडील भागातील रहिवाशांवर खासगी वीज सेवा घेण्याचा प्रसंग लवकरच ओढवणार असल्याची चिन्हे आहेत. भाजीबाजार व कडबीबाजारातील दोन केंद्रांवर आतापर्यंत एक कोटी रुपयांचे वीज देयक थकीत असल्याची माहिती आहे. वीज वितरण कंपनीत मनुष्यबळाचा अभाव ही नित्याचीच बाब असून ग्राहकांच्या तक्रारी, देखभाल, दुरुस्ती आणि देयकांच्या वसुलीची कामे अधिकाऱ्यांना करावी लागत आहेत.या सात फिडरचे होणार खासगीकरणवीजचोरी, गळतीचे प्रमाण रोखण्यात शहरातील सात फिडरला अपयश आले आहे. या फिडरचे नियंत्रण आता खासगी व्यवस्थापनाकडे सोपविले जाणार आहे. यात चित्रा, ताज, नवसारी, भाजीबाजार, न्यू ताज, पाटीपुरा व लोणटेक या फिडर्सचा समावेश राहणार आहे. हल्ली ही प्रक्रिया निविदा स्वरुपात असली तरी याबाबत शासनादेश आल्याची माहिती आहे. त्यामुळे वीज चारट्यांना वठणीवर आणण्यासाठी शासनाने खासगीकरणाची वााट शोधली असल्याचे दिसून येते.शासनाने वीजचोरी, गळती रोखण्यासाठी धोरण ठरविले आहे. अद्याप शासन निर्णयाची प्रत पोहोचली नाही. मात्र, याविषयीची मार्गदर्शक तत्त्वे प्राप्त झाली आहेत. फिडरनिहाय खासगी व्यवस्थापकाची नियुक्ती करुन वीजचोरी पकडणे, देयकांची वसुली आणि दर्शनी भागात वीज मीटर बसविण्याची जबाबदारी दिली जाईल. हा सर्व प्रकार लोकसहभागातून केला जाणार आहे.- दिलीप घुगल,अधीक्षक अभियंता,वीज वितरण कंपनी.