शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
4
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
5
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
6
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
7
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
8
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
9
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
10
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
12
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
13
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
14
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
15
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
16
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
17
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
18
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
19
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
20
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी

शहरात सात फिडरचे होणार खासगीकरण

By admin | Updated: April 27, 2015 00:01 IST

वीजचोरी, गळती रोखण्यासाठी राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाने नवे धोरण आखले आहे. ..

वीज गळती रोखणार : वीजचोरी रोखण्यासाठी खासगी व्यवस्थापकअमरावती : वीजचोरी, गळती रोखण्यासाठी राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाने नवे धोरण आखले आहे. त्यानुसार अमरावतीत सात फिडरचे खासगीकरण होणार असून वीजचोरी आणि गळती रोखण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण केली जाणार आहे. नवीन धोरणामुळे वीजचोरट्यांवर अंकुश लावण्याच्या दृष्टीने कठोर स्वरुपाचे गुन्हे नोंदविण्याचे अधिकार बहाल करण्यात आले आहेत.मागील आठवड्यात राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वीजचोरी, गळतीवर उपाययोजना करण्यासाठी वीज पारेषण, वीज वितरण कंपनीच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक बोलविली. थकीत देयकांबाबत यावेळी चिंंता व्यक्त केली. वीजचोरी रोखण्यात ऊर्जा खात्याला फारशे यश मिळाले नसल्याचे शल्यदेखील त्यांनी व्यक्त केले. संपूर्ण राज्यातील वीजचोरी, गळतीच्या अहवालाची आकडेवारी घेत असताना अमरावतीत सात फिडरवरील वीजचोरी आणि गळती रोखण्यात दोन वर्षांपासून अपयश येत असल्याचे ना. बावनकुळे यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे वीजचोरी, गळतीचे धोरण आखताना अमरावती येथील सातही फिडरचे व्यवस्थापनाचे काम खासगी व्यवस्थापनाकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार या सातही फिडरवर सुरू असलेली वीजचोरी, गळती रोखण्याची जबाबदारी शासन खासगी व्यवस्थापनाकडे सोपविणार आहे. या सात फिडरवर नियंत्रणाची जबाबदारी सोपविण्यासाठी निविदा मागविल्या असून तशी जाहिरात देखील प्रसिध्द झाली आहे. बेरोजगार संस्थांना फिडरच्या नियंत्रणाची जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून येथील मुस्लिमबहुल भागात वीज देयकापोटी कोट्यवधी रुपये थकीत आहेत. वारंवार नोटीस अथवा सूचना देऊनही या भागातील ग्राहक देयके अदा करीत नसल्याचे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. काही अधिकाऱ्यांच्या मते शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. कारण वीजचोरी आणि गळती होणाऱ्या भागात कर्तव्य बजावणे धोक्याचे ठरते तर फिडरची जबाबदारी खासगी व्यक्तींकडे सोपविणे म्हणजे कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे विकेंद्रीकरण करण्याचा डाव असल्याची शंका काही अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. शहराच्या पश्चिमेकडील भागातील रहिवाशांवर खासगी वीज सेवा घेण्याचा प्रसंग लवकरच ओढवणार असल्याची चिन्हे आहेत. भाजीबाजार व कडबीबाजारातील दोन केंद्रांवर आतापर्यंत एक कोटी रुपयांचे वीज देयक थकीत असल्याची माहिती आहे. वीज वितरण कंपनीत मनुष्यबळाचा अभाव ही नित्याचीच बाब असून ग्राहकांच्या तक्रारी, देखभाल, दुरुस्ती आणि देयकांच्या वसुलीची कामे अधिकाऱ्यांना करावी लागत आहेत.या सात फिडरचे होणार खासगीकरणवीजचोरी, गळतीचे प्रमाण रोखण्यात शहरातील सात फिडरला अपयश आले आहे. या फिडरचे नियंत्रण आता खासगी व्यवस्थापनाकडे सोपविले जाणार आहे. यात चित्रा, ताज, नवसारी, भाजीबाजार, न्यू ताज, पाटीपुरा व लोणटेक या फिडर्सचा समावेश राहणार आहे. हल्ली ही प्रक्रिया निविदा स्वरुपात असली तरी याबाबत शासनादेश आल्याची माहिती आहे. त्यामुळे वीज चारट्यांना वठणीवर आणण्यासाठी शासनाने खासगीकरणाची वााट शोधली असल्याचे दिसून येते.शासनाने वीजचोरी, गळती रोखण्यासाठी धोरण ठरविले आहे. अद्याप शासन निर्णयाची प्रत पोहोचली नाही. मात्र, याविषयीची मार्गदर्शक तत्त्वे प्राप्त झाली आहेत. फिडरनिहाय खासगी व्यवस्थापकाची नियुक्ती करुन वीजचोरी पकडणे, देयकांची वसुली आणि दर्शनी भागात वीज मीटर बसविण्याची जबाबदारी दिली जाईल. हा सर्व प्रकार लोकसहभागातून केला जाणार आहे.- दिलीप घुगल,अधीक्षक अभियंता,वीज वितरण कंपनी.