शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

शहरात सात फिडरचे होणार खासगीकरण

By admin | Updated: April 27, 2015 00:01 IST

वीजचोरी, गळती रोखण्यासाठी राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाने नवे धोरण आखले आहे. ..

वीज गळती रोखणार : वीजचोरी रोखण्यासाठी खासगी व्यवस्थापकअमरावती : वीजचोरी, गळती रोखण्यासाठी राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाने नवे धोरण आखले आहे. त्यानुसार अमरावतीत सात फिडरचे खासगीकरण होणार असून वीजचोरी आणि गळती रोखण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण केली जाणार आहे. नवीन धोरणामुळे वीजचोरट्यांवर अंकुश लावण्याच्या दृष्टीने कठोर स्वरुपाचे गुन्हे नोंदविण्याचे अधिकार बहाल करण्यात आले आहेत.मागील आठवड्यात राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वीजचोरी, गळतीवर उपाययोजना करण्यासाठी वीज पारेषण, वीज वितरण कंपनीच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक बोलविली. थकीत देयकांबाबत यावेळी चिंंता व्यक्त केली. वीजचोरी रोखण्यात ऊर्जा खात्याला फारशे यश मिळाले नसल्याचे शल्यदेखील त्यांनी व्यक्त केले. संपूर्ण राज्यातील वीजचोरी, गळतीच्या अहवालाची आकडेवारी घेत असताना अमरावतीत सात फिडरवरील वीजचोरी आणि गळती रोखण्यात दोन वर्षांपासून अपयश येत असल्याचे ना. बावनकुळे यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे वीजचोरी, गळतीचे धोरण आखताना अमरावती येथील सातही फिडरचे व्यवस्थापनाचे काम खासगी व्यवस्थापनाकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार या सातही फिडरवर सुरू असलेली वीजचोरी, गळती रोखण्याची जबाबदारी शासन खासगी व्यवस्थापनाकडे सोपविणार आहे. या सात फिडरवर नियंत्रणाची जबाबदारी सोपविण्यासाठी निविदा मागविल्या असून तशी जाहिरात देखील प्रसिध्द झाली आहे. बेरोजगार संस्थांना फिडरच्या नियंत्रणाची जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून येथील मुस्लिमबहुल भागात वीज देयकापोटी कोट्यवधी रुपये थकीत आहेत. वारंवार नोटीस अथवा सूचना देऊनही या भागातील ग्राहक देयके अदा करीत नसल्याचे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. काही अधिकाऱ्यांच्या मते शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. कारण वीजचोरी आणि गळती होणाऱ्या भागात कर्तव्य बजावणे धोक्याचे ठरते तर फिडरची जबाबदारी खासगी व्यक्तींकडे सोपविणे म्हणजे कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे विकेंद्रीकरण करण्याचा डाव असल्याची शंका काही अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. शहराच्या पश्चिमेकडील भागातील रहिवाशांवर खासगी वीज सेवा घेण्याचा प्रसंग लवकरच ओढवणार असल्याची चिन्हे आहेत. भाजीबाजार व कडबीबाजारातील दोन केंद्रांवर आतापर्यंत एक कोटी रुपयांचे वीज देयक थकीत असल्याची माहिती आहे. वीज वितरण कंपनीत मनुष्यबळाचा अभाव ही नित्याचीच बाब असून ग्राहकांच्या तक्रारी, देखभाल, दुरुस्ती आणि देयकांच्या वसुलीची कामे अधिकाऱ्यांना करावी लागत आहेत.या सात फिडरचे होणार खासगीकरणवीजचोरी, गळतीचे प्रमाण रोखण्यात शहरातील सात फिडरला अपयश आले आहे. या फिडरचे नियंत्रण आता खासगी व्यवस्थापनाकडे सोपविले जाणार आहे. यात चित्रा, ताज, नवसारी, भाजीबाजार, न्यू ताज, पाटीपुरा व लोणटेक या फिडर्सचा समावेश राहणार आहे. हल्ली ही प्रक्रिया निविदा स्वरुपात असली तरी याबाबत शासनादेश आल्याची माहिती आहे. त्यामुळे वीज चारट्यांना वठणीवर आणण्यासाठी शासनाने खासगीकरणाची वााट शोधली असल्याचे दिसून येते.शासनाने वीजचोरी, गळती रोखण्यासाठी धोरण ठरविले आहे. अद्याप शासन निर्णयाची प्रत पोहोचली नाही. मात्र, याविषयीची मार्गदर्शक तत्त्वे प्राप्त झाली आहेत. फिडरनिहाय खासगी व्यवस्थापकाची नियुक्ती करुन वीजचोरी पकडणे, देयकांची वसुली आणि दर्शनी भागात वीज मीटर बसविण्याची जबाबदारी दिली जाईल. हा सर्व प्रकार लोकसहभागातून केला जाणार आहे.- दिलीप घुगल,अधीक्षक अभियंता,वीज वितरण कंपनी.