शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

संक्रांतीनिमित्त तीळ-गुळाचे दर वधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:08 IST

यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला, तोही ऐन तीळ सवंगणीच्या वेळेत सतत हजेरी लावल्याने उत्पादनावर मोठा परिणाम झाला. शेतकऱ्यांनी तर ...

यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला, तोही ऐन तीळ सवंगणीच्या वेळेत सतत हजेरी लावल्याने उत्पादनावर मोठा परिणाम झाला. शेतकऱ्यांनी तर तीळ पिकाची सवंगणीदेखील केली नाही. त्यामुळे यंदा बाजारपेठेत तीळाची आवक कमालीची घटली आहे. तसेच साखरेचे भाव वधारल्याने व दैनंदिन जीवनातील महत्त्वाचे घटक बनलेल्या साखरेला अधिक मागणी असल्याने गुळाचे उत्पादन कमी करण्यात आल्याचा परिणाम सध्याच्या मागणीवर दिसून येत आहे. संक्रातीला गुळाचा वापर वान वाटपात अधिक प्रमामात होत असल्याने प्रत्येक गृहिणी तीळ-गुळाची खरेदी करताना दिसत आहे. त्यातच कोरोनाने शिरकाव केल्याने वाहतूक खर्चाचा भार वाढल्याने दरवर्षीच्या तुलनेत यंदा तीळ, साखर व गुळाकरिता अधिक किंमत मोजावी लागत असल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

बॉक्स

तीळाचे दर १३५ रुपये प्रतिकिलो

तीळाचे पीक विशेषत: गुजरात आणि मध्यप्रदेशात अधिक प्रमाणात होते. महाराष्ट्रात काहीच भागात तीळाचे उत्पादन घेण्यात येते, मात्र ते घरगुती वापरापुरतेच उत्पादन होत असल्याने ग्राहकांची मागणी पूर्ण करण्याकरिता गुजरात व मध्यप्रदेशातून तीळाची आयात केली जाते. मात्र यंदा कोरोनामुळे वाहतुकीचा खर्च वाढल्याने मागील वर्षीच्या तुलनेत २ ते ५ रुपये अधिक दर वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

गुळाचे भाव ५० रुपये प्रतिकिलो

सध्या साखरेचा सर्रास वापर होत असल्याने गुळाची मागणी कमी झाली होती. मात्र, १० वर्षांपासून मधुमेहाच्या आजारात वाढ झाल्याने अनेकांनी साखरेचा चहा व साखरेपासून बनविलेल्या खाद्यपदार्थांकडे नाईलाजाने पाठ फिरविली आहे. त्यामुळे पर्याय म्हणून विना केमिकलचा गूळ मधुमेहींकरिता उपयोगी ठरल्याने बहुतांश घरांत गुळाचा वापर व्हायला लागला. त्यामुळे संक्रांतीत वाढत्या मागणीनुसार गुळाचे दर मागील वर्षी ४० रुपये, तर यंदा ५० रुपयांवर पोहचले आहे.

साखरेला मागणी अधिक म्हणून भावात तेजी

साखरेचा प्रत्येक घरात प्रत्येक गोडधोड बनविताना वापर केला जात असल्याने मागणी अधिक आहे. त्यामुळे घाऊक बाजारात ३८ रुपये प्रतिकिलो, तर किरकोळ दुकानांत ४० ते ४२ रुपये दर आहे. मागील वर्षीच्या तुलनेत साखरदेखील ५-७ रुपयांनी वधारलेली असल्याचे किराणा व्यापारी सतीश पटेल यांनी सांगितले.

कोट

गत वर्षीच्या तुलनेत भाव स्थिर असले तरी कोरोना काळात अनेकांचा रोजगार हिरावल्याने पाहिजे तरी मागणी नाही. १० किलो घेणारा ग्राहक ५ किलोच नेत असल्याने जीवनावश्यक जरी असले तरी बजेटअभावी खरेदीत ग्राहक हात आखडता घेत असल्याचे चित्र आहे.

- मंगेश निशाण,

व्यापारी, ओम किराणा स्टोअर्स

--

यंदा कोरोनाच्या संकटाने हातघाईस आलो. कुटुंबातील कर्ता व्यक्तीचा रोजगार हिरावल्याने पैशाची आवक कमी व त्यातच महागाई वाढल्याने गतवर्षीच्या तुलनेत तीळसंक्रांतीचे वान वाटपात हात आखडता घेणार आहे. खरेदीदेखील कमीच करावी लागेल.

- पल्लवी देखमुख, गृहिणी, अर्जूननगर