विनाकारण फिरताना आढळल्यास वाहन जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:15 IST2021-02-25T04:15:17+5:302021-02-25T04:15:17+5:30
अमरावती : लॉकडाऊन असतानाही नागरिक विनामास्क विनाकारण फिरताना आढळून येत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक पावले उचलली जात ...

विनाकारण फिरताना आढळल्यास वाहन जप्त
अमरावती : लॉकडाऊन असतानाही नागरिक विनामास्क विनाकारण फिरताना आढळून येत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक पावले उचलली जात असून, गुरुवारपासून विनाकारण दुचाकी, चारचाकी वाहनांतून फिरताना आढळून आल्यास वाहन चालकांवर गुन्हा नोंदवून वाहन जप्त करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी दिली.
आरती सिंह यांनी बुधवारी शहर हद्दीतील अनेक नाकाबंदी पॉइंट व फिक्स पाइंटला भेटी देऊन स्वत: काही वाहन चालकांना थांबवून कसून चौकशी केली.
तपासणीदरम्यान त्यांच्या असे निदर्शनास आले की, यापूर्वीच्या लॉकडाऊनपेक्षा सध्या राबविण्यात येत असलेल्या लॉकडाऊनमध्ये न्यायालय, एमआयडीसी, सर्व शासकीय कार्यालये, रेल्वे, बसेस, तसेच हॉटेलमधून पार्सल सुविधा सुरू ठेवण्याची सवलत प्रशासनाने दिली आहे. मात्र, या व्यतिरिक्तही इतर नागरिक हे जास्त संख्येने घराबाहेर पडून सवलतींचा गौरफायदा घेताना आढळून आले आहे. नागरिक विनाकारण लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहे. त्यामुळे आला विनाकारण रस्त्यावर वाहन चालक आढळून आल्यास त्यांचे वाहन जप्त करा, तसेच दंड वसूल करण्यात येईल, तसेच भारतीय दंड विधान, आपत्ती व्यवस्थापन कायदा, तसेच साथरोग अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी विनाकारण कुणीही घराबाहेर पडू नये, प्रशासनाला मदत करावी, असे आवाहनही यावेळी पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी केले.