शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पाच कोटींचे बियाणे मातीमोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 05:01 IST

जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी ७ लाख २८ हजार हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यामध्ये सर्वाधिक ३ लाख २ हजार हेक्टरमध्ये सोयाबीनची पेरणी होणार आहे. विशेष म्हणजे, गतवर्षीचा कापूस अजूनही शेतकऱ्यांच्या घरी पडून असल्याने यंदा कापसाच्या तुलनेत किमान ३० ते ३५ हजार हेक्टरने सोयाबीनचे क्षेत्र वाढणार असल्याची कृषी विभागाची माहिती आहे. मात्र, पेरणीच्या सुरुवातीच्या काळातच काही कंपन्यांद्वारे उगवणशक्ती नसलेल्या काही लॉटचे बियाणे माथी मारल्यानेच शेतकऱ्यांचा घात झाला.

ठळक मुद्देसोयाबीनची दैना : महाबीजसह अन्य कंपन्यांनी लावली शेतकऱ्यांची वाट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : उगवणशक्ती नसलेले वांझोटे बियाणे महाबीजसह इतर कंपन्यांनी माथी मारल्याने शेतकऱ्यांना २० हजार हेक्टरमध्ये किमान पाच कोटींचा फटका बसला आहे. पेरणीच्या काळात आरिष्ट ओढवल्याने तातडीने नुकसानभरपाई किंवा पर्यायी बियाणे देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.रोहिणीत मान्सूनपूर्व सरी व लगेच मृगधारा कोसळल्याने शेतकºयांत आनंदाचे वातावरण पसरले होते. हवामान खात्यासह स्कायमेटनेदेखील सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज व्यक्त केला व जिल्ह्यासह विदर्भात मान्सून आल्याची सुखद वार्ता दिली. त्यामुळे पेरणीचा जोम वाढला. कमी पावसात, कमी दिवसांत येणारे कॅश क्राप या अर्थाने यंदा शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या ९३०५ या वाणाची पेरणी केली. यामध्ये बहुतांश क्षेत्रातील सोयाबीन उगवलेच नसल्याने त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आलेली आहे.जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी ७ लाख २८ हजार हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यामध्ये सर्वाधिक ३ लाख २ हजार हेक्टरमध्ये सोयाबीनची पेरणी होणार आहे. विशेष म्हणजे, गतवर्षीचा कापूस अजूनही शेतकऱ्यांच्या घरी पडून असल्याने यंदा कापसाच्या तुलनेत किमान ३० ते ३५ हजार हेक्टरने सोयाबीनचे क्षेत्र वाढणार असल्याची कृषी विभागाची माहिती आहे. मात्र, पेरणीच्या सुरुवातीच्या काळातच काही कंपन्यांद्वारे उगवणशक्ती नसलेल्या काही लॉटचे बियाणे माथी मारल्यानेच शेतकऱ्यांचा घात झाला. पाच कोटींचे बियाणे मातीमोल झाल्याने शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे. शेतकऱ्यांच्या लेखी तक्रारीनंतर कृषी विभागाद्वारे क्षेत्रभेटी व तालुकास्तरीय समितीद्वारे पाहणी सुरू झालेली आहे. या प्रक्रियेनंतर कंपन्यांद्वारे बियाणे मिळणार की यासाठी ग्राहक मंच्याकडे दाद मागावी लागणार, हा प्रश्न कायम आहे.महाबीजची ३० किलोची सोयाबीन बियाण्यांची बॅग ही २३४० रुपये या दराने विकली जाते. एका एकराला साधारणपणे एक बॅग बियाणे लागतेच. या अंदाजाने जिल्ह्यात सद्यस्थितीत १८ ते २० हजार बॅग बियाणे मातीमोल झाल्याने शेतकºयांचे साधारणपणे पाच कोटींचे नुकसान झाले आहे.तालुका समितीच्या अहवालाकडे लक्षशेतकºयांच्या बियाण्यासंदर्भात तक्रारी असतात. त्यासाठी तालुकास्तरावर उपविभागीय कृषी अधिकारी अध्यक्ष व पंचायत समितीचे कृषी अधिकारी सदस्य सचिव असलेली सात सदस्यीय समिती असते. या समितीत कृषी विद्यापीठाच्या संशोधन केंद्रांचे शास्त्रज्ञ, तालुका कृषी अधिकारी, विक्री केंद्राचा संचालक, तालुका कृषी अधिकारी व बियाणे कंपनीचा प्रतिनिधी असतो. या समितीद्वारे शेतकऱ्यांच्या तक्रारीची शहानिशा करण्यात येते. यामध्ये बियाणे सदोष असल्यास तडजोड किंवा कंपन्या दाद देत नसल्यास शेतकऱ्यांना ग्राहक मंचाचा पर्याय उपलब्ध आहे.उगवण न होण्याची प्रामुख्याने तीन कारणे आहेत. यासंदर्भात प्राप्त तक्रारींची तालुकास्तरीय समितीद्वारे पाहणी सुरू आहे. यामध्ये बियाणे सदोष निघाल्यास बियाणे कंपन्यांकडून परताव्यासाठी प्रयत्न करू.- विजय चवाळेजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती