शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

पाच कोटींचे बियाणे मातीमोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 05:01 IST

जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी ७ लाख २८ हजार हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यामध्ये सर्वाधिक ३ लाख २ हजार हेक्टरमध्ये सोयाबीनची पेरणी होणार आहे. विशेष म्हणजे, गतवर्षीचा कापूस अजूनही शेतकऱ्यांच्या घरी पडून असल्याने यंदा कापसाच्या तुलनेत किमान ३० ते ३५ हजार हेक्टरने सोयाबीनचे क्षेत्र वाढणार असल्याची कृषी विभागाची माहिती आहे. मात्र, पेरणीच्या सुरुवातीच्या काळातच काही कंपन्यांद्वारे उगवणशक्ती नसलेल्या काही लॉटचे बियाणे माथी मारल्यानेच शेतकऱ्यांचा घात झाला.

ठळक मुद्देसोयाबीनची दैना : महाबीजसह अन्य कंपन्यांनी लावली शेतकऱ्यांची वाट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : उगवणशक्ती नसलेले वांझोटे बियाणे महाबीजसह इतर कंपन्यांनी माथी मारल्याने शेतकऱ्यांना २० हजार हेक्टरमध्ये किमान पाच कोटींचा फटका बसला आहे. पेरणीच्या काळात आरिष्ट ओढवल्याने तातडीने नुकसानभरपाई किंवा पर्यायी बियाणे देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.रोहिणीत मान्सूनपूर्व सरी व लगेच मृगधारा कोसळल्याने शेतकºयांत आनंदाचे वातावरण पसरले होते. हवामान खात्यासह स्कायमेटनेदेखील सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज व्यक्त केला व जिल्ह्यासह विदर्भात मान्सून आल्याची सुखद वार्ता दिली. त्यामुळे पेरणीचा जोम वाढला. कमी पावसात, कमी दिवसांत येणारे कॅश क्राप या अर्थाने यंदा शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या ९३०५ या वाणाची पेरणी केली. यामध्ये बहुतांश क्षेत्रातील सोयाबीन उगवलेच नसल्याने त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आलेली आहे.जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी ७ लाख २८ हजार हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यामध्ये सर्वाधिक ३ लाख २ हजार हेक्टरमध्ये सोयाबीनची पेरणी होणार आहे. विशेष म्हणजे, गतवर्षीचा कापूस अजूनही शेतकऱ्यांच्या घरी पडून असल्याने यंदा कापसाच्या तुलनेत किमान ३० ते ३५ हजार हेक्टरने सोयाबीनचे क्षेत्र वाढणार असल्याची कृषी विभागाची माहिती आहे. मात्र, पेरणीच्या सुरुवातीच्या काळातच काही कंपन्यांद्वारे उगवणशक्ती नसलेल्या काही लॉटचे बियाणे माथी मारल्यानेच शेतकऱ्यांचा घात झाला. पाच कोटींचे बियाणे मातीमोल झाल्याने शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे. शेतकऱ्यांच्या लेखी तक्रारीनंतर कृषी विभागाद्वारे क्षेत्रभेटी व तालुकास्तरीय समितीद्वारे पाहणी सुरू झालेली आहे. या प्रक्रियेनंतर कंपन्यांद्वारे बियाणे मिळणार की यासाठी ग्राहक मंच्याकडे दाद मागावी लागणार, हा प्रश्न कायम आहे.महाबीजची ३० किलोची सोयाबीन बियाण्यांची बॅग ही २३४० रुपये या दराने विकली जाते. एका एकराला साधारणपणे एक बॅग बियाणे लागतेच. या अंदाजाने जिल्ह्यात सद्यस्थितीत १८ ते २० हजार बॅग बियाणे मातीमोल झाल्याने शेतकºयांचे साधारणपणे पाच कोटींचे नुकसान झाले आहे.तालुका समितीच्या अहवालाकडे लक्षशेतकºयांच्या बियाण्यासंदर्भात तक्रारी असतात. त्यासाठी तालुकास्तरावर उपविभागीय कृषी अधिकारी अध्यक्ष व पंचायत समितीचे कृषी अधिकारी सदस्य सचिव असलेली सात सदस्यीय समिती असते. या समितीत कृषी विद्यापीठाच्या संशोधन केंद्रांचे शास्त्रज्ञ, तालुका कृषी अधिकारी, विक्री केंद्राचा संचालक, तालुका कृषी अधिकारी व बियाणे कंपनीचा प्रतिनिधी असतो. या समितीद्वारे शेतकऱ्यांच्या तक्रारीची शहानिशा करण्यात येते. यामध्ये बियाणे सदोष असल्यास तडजोड किंवा कंपन्या दाद देत नसल्यास शेतकऱ्यांना ग्राहक मंचाचा पर्याय उपलब्ध आहे.उगवण न होण्याची प्रामुख्याने तीन कारणे आहेत. यासंदर्भात प्राप्त तक्रारींची तालुकास्तरीय समितीद्वारे पाहणी सुरू आहे. यामध्ये बियाणे सदोष निघाल्यास बियाणे कंपन्यांकडून परताव्यासाठी प्रयत्न करू.- विजय चवाळेजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती