शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
2
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
3
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
4
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
5
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
6
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
7
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
8
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
9
VIDEO : टीम इंडियातील ब्युटीची 'मन की बात'; थेट PM मोदींना विचारला स्कीन केअर रुटीनसंदर्भातील प्रश्न
10
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
11
विश्वविजेत्या कन्यांचं Tata कडून खास सेलिब्रेशन...; संघातील प्रत्येक खेळाडूला देणार Sierra एसयूव्ही गिफ्ट! खास आहेत फीचर्स
12
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
13
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
14
Numerology: प्रत्येक स्त्री ही गृहलक्ष्मी असते; पण 'या' जन्मतारखेची स्त्री ठरते 'भाग्यलक्ष्मी'!
15
Physicswallah Ltd IPO: IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
16
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
17
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
18
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
19
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
20
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट

पाच कोटींचे बियाणे मातीमोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 05:01 IST

जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी ७ लाख २८ हजार हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यामध्ये सर्वाधिक ३ लाख २ हजार हेक्टरमध्ये सोयाबीनची पेरणी होणार आहे. विशेष म्हणजे, गतवर्षीचा कापूस अजूनही शेतकऱ्यांच्या घरी पडून असल्याने यंदा कापसाच्या तुलनेत किमान ३० ते ३५ हजार हेक्टरने सोयाबीनचे क्षेत्र वाढणार असल्याची कृषी विभागाची माहिती आहे. मात्र, पेरणीच्या सुरुवातीच्या काळातच काही कंपन्यांद्वारे उगवणशक्ती नसलेल्या काही लॉटचे बियाणे माथी मारल्यानेच शेतकऱ्यांचा घात झाला.

ठळक मुद्देसोयाबीनची दैना : महाबीजसह अन्य कंपन्यांनी लावली शेतकऱ्यांची वाट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : उगवणशक्ती नसलेले वांझोटे बियाणे महाबीजसह इतर कंपन्यांनी माथी मारल्याने शेतकऱ्यांना २० हजार हेक्टरमध्ये किमान पाच कोटींचा फटका बसला आहे. पेरणीच्या काळात आरिष्ट ओढवल्याने तातडीने नुकसानभरपाई किंवा पर्यायी बियाणे देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.रोहिणीत मान्सूनपूर्व सरी व लगेच मृगधारा कोसळल्याने शेतकºयांत आनंदाचे वातावरण पसरले होते. हवामान खात्यासह स्कायमेटनेदेखील सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज व्यक्त केला व जिल्ह्यासह विदर्भात मान्सून आल्याची सुखद वार्ता दिली. त्यामुळे पेरणीचा जोम वाढला. कमी पावसात, कमी दिवसांत येणारे कॅश क्राप या अर्थाने यंदा शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या ९३०५ या वाणाची पेरणी केली. यामध्ये बहुतांश क्षेत्रातील सोयाबीन उगवलेच नसल्याने त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आलेली आहे.जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी ७ लाख २८ हजार हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यामध्ये सर्वाधिक ३ लाख २ हजार हेक्टरमध्ये सोयाबीनची पेरणी होणार आहे. विशेष म्हणजे, गतवर्षीचा कापूस अजूनही शेतकऱ्यांच्या घरी पडून असल्याने यंदा कापसाच्या तुलनेत किमान ३० ते ३५ हजार हेक्टरने सोयाबीनचे क्षेत्र वाढणार असल्याची कृषी विभागाची माहिती आहे. मात्र, पेरणीच्या सुरुवातीच्या काळातच काही कंपन्यांद्वारे उगवणशक्ती नसलेल्या काही लॉटचे बियाणे माथी मारल्यानेच शेतकऱ्यांचा घात झाला. पाच कोटींचे बियाणे मातीमोल झाल्याने शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे. शेतकऱ्यांच्या लेखी तक्रारीनंतर कृषी विभागाद्वारे क्षेत्रभेटी व तालुकास्तरीय समितीद्वारे पाहणी सुरू झालेली आहे. या प्रक्रियेनंतर कंपन्यांद्वारे बियाणे मिळणार की यासाठी ग्राहक मंच्याकडे दाद मागावी लागणार, हा प्रश्न कायम आहे.महाबीजची ३० किलोची सोयाबीन बियाण्यांची बॅग ही २३४० रुपये या दराने विकली जाते. एका एकराला साधारणपणे एक बॅग बियाणे लागतेच. या अंदाजाने जिल्ह्यात सद्यस्थितीत १८ ते २० हजार बॅग बियाणे मातीमोल झाल्याने शेतकºयांचे साधारणपणे पाच कोटींचे नुकसान झाले आहे.तालुका समितीच्या अहवालाकडे लक्षशेतकºयांच्या बियाण्यासंदर्भात तक्रारी असतात. त्यासाठी तालुकास्तरावर उपविभागीय कृषी अधिकारी अध्यक्ष व पंचायत समितीचे कृषी अधिकारी सदस्य सचिव असलेली सात सदस्यीय समिती असते. या समितीत कृषी विद्यापीठाच्या संशोधन केंद्रांचे शास्त्रज्ञ, तालुका कृषी अधिकारी, विक्री केंद्राचा संचालक, तालुका कृषी अधिकारी व बियाणे कंपनीचा प्रतिनिधी असतो. या समितीद्वारे शेतकऱ्यांच्या तक्रारीची शहानिशा करण्यात येते. यामध्ये बियाणे सदोष असल्यास तडजोड किंवा कंपन्या दाद देत नसल्यास शेतकऱ्यांना ग्राहक मंचाचा पर्याय उपलब्ध आहे.उगवण न होण्याची प्रामुख्याने तीन कारणे आहेत. यासंदर्भात प्राप्त तक्रारींची तालुकास्तरीय समितीद्वारे पाहणी सुरू आहे. यामध्ये बियाणे सदोष निघाल्यास बियाणे कंपन्यांकडून परताव्यासाठी प्रयत्न करू.- विजय चवाळेजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती